शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

Lockdown: रेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार; ३० तासांच्या प्रवासाला लागले तब्बल ४ दिवस, मजूर हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 08:49 IST

अलीकडेच रेल्वेच्या या ट्रेनने ३० तासांचा प्रवास करण्यासाठी तब्बल ४ दिवस लावले. त्यामुळे ४ दिवसांपासून भूक, पाणी आणि गरमीने मजूर आणखी हैराण झाले.

ठळक मुद्देप्रवासासाठी केवळ ३० तास लागत असताना रेल्वेचा ४ दिवसांचा प्रवास आश्चर्य व्यक्त करणारा आहे.रेल्वेच्या अशा अनागोंदी कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागला४ दिवसांच्या प्रवासात तहान-भूकेने आणि गरमीने मजूर झाले हैराण

समस्तीपूर – लॉकडाऊन काळात अडकलेल्या शेकडो प्रवासी मजुरांना आपापल्या राज्यात पोहचवण्यासाठी रेल्वेकडून विशेष श्रमिक ट्रेन सुरु आहेत. मात्र या ट्रेनबाबत अनेक घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या आहेत. रेल्वेच्या या भोंगळ कारभाराचा मजुरांना फटका बसत आहे. यातील काही ट्रेन्स उशिराने आपल्या निर्धारित स्टेशनवर पोहचत आहेत.

अलीकडेच रेल्वेच्या या ट्रेनने ३० तासांचा प्रवास करण्यासाठी तब्बल ४ दिवस लावले. त्यामुळे ४ दिवसांपासून भूक, पाणी आणि गरमीने मजूर आणखी हैराण झाले. काही ठिकाणी मजुरांनी रेल्वे प्रशासनाविरोधात गोंधळही केला. दिल्लीपासून बिहारच्या मोतिहारी येथे जाणारी ट्रेन ४ दिवसानंतर समस्तीपूर येथे पोहचली. या प्रवासासाठी केवळ ३० तास लागत असताना रेल्वेचा ४ दिवसांचा प्रवास आश्चर्य व्यक्त करणारा आहे.

मजुरांचं म्हणणं आहे की, त्यांना मोतिहारीचं तिकिट दिलं होतं. ही ट्रेन गेल्या ४ दिवसांपासून आम्हाला फिरवत आहे. अडचणीच्या काळात घरी पोहचणाऱ्या मजुरांना रेल्वेच्या अशा अनागोंदी कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ट्रेनमध्ये एक गरोदर महिला होती. तिला प्रसुतीवेदना सुरु झाल्यानंतर ट्रेनमधून उतरवण्यात आलं. मेडिकल सुविधेविना या महिलेने प्लॅटफॉर्मवरच मुलीला जन्म दिला. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी या महिलेला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

समस्तीपूरला पोहचणाऱ्या प्रवाशांनी सांगितले की,२२ तारखेपासून आमचा प्रवास सुरु झाला. या ४ दिवसात भूकेने, तहान लागलेल्याने आणि गरमीने मजूर हैराण झाले. मात्र ट्रॅक खाली नसल्याने मार्ग बदलला जात आहे, या मजुरांना खाण्या-पिण्याची सोय करता येईल असं रेल्वे प्रशासनाने सांगितले.

३६ तासाच्या प्रवासाला ७० तास

समस्तीपूर पोहचलेल्या आणखी एका ट्रेनमधील प्रवासाने पुण्याहून ट्रेन पकडली होती, २२ तारखेला ही ट्रेन निघाली. छत्तीसगड, ओडिसा, पश्चिम बंगाल मार्ग करत २५ मे रोजी ही ट्रेन दुपारी समस्तीपूर येथे पोहचली. या प्रवासाला ३६ तास लागतात तिथे ७० तासानंतर संपूर्ण भारताची सैर करुन समस्तीपूरला आणलं असं प्रवासी धर्मेंद्र यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे