शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
7
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
8
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
9
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
10
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
11
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
12
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
13
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
14
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
15
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
16
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
17
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
18
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
19
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
20
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown: रेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार; ३० तासांच्या प्रवासाला लागले तब्बल ४ दिवस, मजूर हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 08:49 IST

अलीकडेच रेल्वेच्या या ट्रेनने ३० तासांचा प्रवास करण्यासाठी तब्बल ४ दिवस लावले. त्यामुळे ४ दिवसांपासून भूक, पाणी आणि गरमीने मजूर आणखी हैराण झाले.

ठळक मुद्देप्रवासासाठी केवळ ३० तास लागत असताना रेल्वेचा ४ दिवसांचा प्रवास आश्चर्य व्यक्त करणारा आहे.रेल्वेच्या अशा अनागोंदी कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागला४ दिवसांच्या प्रवासात तहान-भूकेने आणि गरमीने मजूर झाले हैराण

समस्तीपूर – लॉकडाऊन काळात अडकलेल्या शेकडो प्रवासी मजुरांना आपापल्या राज्यात पोहचवण्यासाठी रेल्वेकडून विशेष श्रमिक ट्रेन सुरु आहेत. मात्र या ट्रेनबाबत अनेक घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या आहेत. रेल्वेच्या या भोंगळ कारभाराचा मजुरांना फटका बसत आहे. यातील काही ट्रेन्स उशिराने आपल्या निर्धारित स्टेशनवर पोहचत आहेत.

अलीकडेच रेल्वेच्या या ट्रेनने ३० तासांचा प्रवास करण्यासाठी तब्बल ४ दिवस लावले. त्यामुळे ४ दिवसांपासून भूक, पाणी आणि गरमीने मजूर आणखी हैराण झाले. काही ठिकाणी मजुरांनी रेल्वे प्रशासनाविरोधात गोंधळही केला. दिल्लीपासून बिहारच्या मोतिहारी येथे जाणारी ट्रेन ४ दिवसानंतर समस्तीपूर येथे पोहचली. या प्रवासासाठी केवळ ३० तास लागत असताना रेल्वेचा ४ दिवसांचा प्रवास आश्चर्य व्यक्त करणारा आहे.

मजुरांचं म्हणणं आहे की, त्यांना मोतिहारीचं तिकिट दिलं होतं. ही ट्रेन गेल्या ४ दिवसांपासून आम्हाला फिरवत आहे. अडचणीच्या काळात घरी पोहचणाऱ्या मजुरांना रेल्वेच्या अशा अनागोंदी कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ट्रेनमध्ये एक गरोदर महिला होती. तिला प्रसुतीवेदना सुरु झाल्यानंतर ट्रेनमधून उतरवण्यात आलं. मेडिकल सुविधेविना या महिलेने प्लॅटफॉर्मवरच मुलीला जन्म दिला. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी या महिलेला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

समस्तीपूरला पोहचणाऱ्या प्रवाशांनी सांगितले की,२२ तारखेपासून आमचा प्रवास सुरु झाला. या ४ दिवसात भूकेने, तहान लागलेल्याने आणि गरमीने मजूर हैराण झाले. मात्र ट्रॅक खाली नसल्याने मार्ग बदलला जात आहे, या मजुरांना खाण्या-पिण्याची सोय करता येईल असं रेल्वे प्रशासनाने सांगितले.

३६ तासाच्या प्रवासाला ७० तास

समस्तीपूर पोहचलेल्या आणखी एका ट्रेनमधील प्रवासाने पुण्याहून ट्रेन पकडली होती, २२ तारखेला ही ट्रेन निघाली. छत्तीसगड, ओडिसा, पश्चिम बंगाल मार्ग करत २५ मे रोजी ही ट्रेन दुपारी समस्तीपूर येथे पोहचली. या प्रवासाला ३६ तास लागतात तिथे ७० तासानंतर संपूर्ण भारताची सैर करुन समस्तीपूरला आणलं असं प्रवासी धर्मेंद्र यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे