शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Lockdown: रेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार; ३० तासांच्या प्रवासाला लागले तब्बल ४ दिवस, मजूर हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 08:49 IST

अलीकडेच रेल्वेच्या या ट्रेनने ३० तासांचा प्रवास करण्यासाठी तब्बल ४ दिवस लावले. त्यामुळे ४ दिवसांपासून भूक, पाणी आणि गरमीने मजूर आणखी हैराण झाले.

ठळक मुद्देप्रवासासाठी केवळ ३० तास लागत असताना रेल्वेचा ४ दिवसांचा प्रवास आश्चर्य व्यक्त करणारा आहे.रेल्वेच्या अशा अनागोंदी कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागला४ दिवसांच्या प्रवासात तहान-भूकेने आणि गरमीने मजूर झाले हैराण

समस्तीपूर – लॉकडाऊन काळात अडकलेल्या शेकडो प्रवासी मजुरांना आपापल्या राज्यात पोहचवण्यासाठी रेल्वेकडून विशेष श्रमिक ट्रेन सुरु आहेत. मात्र या ट्रेनबाबत अनेक घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या आहेत. रेल्वेच्या या भोंगळ कारभाराचा मजुरांना फटका बसत आहे. यातील काही ट्रेन्स उशिराने आपल्या निर्धारित स्टेशनवर पोहचत आहेत.

अलीकडेच रेल्वेच्या या ट्रेनने ३० तासांचा प्रवास करण्यासाठी तब्बल ४ दिवस लावले. त्यामुळे ४ दिवसांपासून भूक, पाणी आणि गरमीने मजूर आणखी हैराण झाले. काही ठिकाणी मजुरांनी रेल्वे प्रशासनाविरोधात गोंधळही केला. दिल्लीपासून बिहारच्या मोतिहारी येथे जाणारी ट्रेन ४ दिवसानंतर समस्तीपूर येथे पोहचली. या प्रवासासाठी केवळ ३० तास लागत असताना रेल्वेचा ४ दिवसांचा प्रवास आश्चर्य व्यक्त करणारा आहे.

मजुरांचं म्हणणं आहे की, त्यांना मोतिहारीचं तिकिट दिलं होतं. ही ट्रेन गेल्या ४ दिवसांपासून आम्हाला फिरवत आहे. अडचणीच्या काळात घरी पोहचणाऱ्या मजुरांना रेल्वेच्या अशा अनागोंदी कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ट्रेनमध्ये एक गरोदर महिला होती. तिला प्रसुतीवेदना सुरु झाल्यानंतर ट्रेनमधून उतरवण्यात आलं. मेडिकल सुविधेविना या महिलेने प्लॅटफॉर्मवरच मुलीला जन्म दिला. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी या महिलेला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

समस्तीपूरला पोहचणाऱ्या प्रवाशांनी सांगितले की,२२ तारखेपासून आमचा प्रवास सुरु झाला. या ४ दिवसात भूकेने, तहान लागलेल्याने आणि गरमीने मजूर हैराण झाले. मात्र ट्रॅक खाली नसल्याने मार्ग बदलला जात आहे, या मजुरांना खाण्या-पिण्याची सोय करता येईल असं रेल्वे प्रशासनाने सांगितले.

३६ तासाच्या प्रवासाला ७० तास

समस्तीपूर पोहचलेल्या आणखी एका ट्रेनमधील प्रवासाने पुण्याहून ट्रेन पकडली होती, २२ तारखेला ही ट्रेन निघाली. छत्तीसगड, ओडिसा, पश्चिम बंगाल मार्ग करत २५ मे रोजी ही ट्रेन दुपारी समस्तीपूर येथे पोहचली. या प्रवासाला ३६ तास लागतात तिथे ७० तासानंतर संपूर्ण भारताची सैर करुन समस्तीपूरला आणलं असं प्रवासी धर्मेंद्र यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे