शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

Rajya Sabha : मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज कोण घेतं, 'जावई' का?; निर्मला सीतारामन यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 18:24 IST

Rajya Sabha : जावई हा काँग्रेसचा ट्रेडमार्क नाही, प्रत्येकाच्या घरी असतो, सीतारामन यांचा टोला

ठळक मुद्देजावई हा काँग्रेसचा ट्रेडमार्क नाही, प्रत्येकाच्या घरी असतो, सीतारामन यांचा टोलासरकारनं जावयासाठी युपीआय तयार केलं नाही, सीतारामन यांचं वक्तव्य

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी राज्यसभेत मुद्रा योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर निशाणा साधला. "मुद्रा योजनेअंतर्गत २७ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेची कर्ज देण्यात आली. ही कर्ज कोणी घेतली जावयानं का?," असं म्हणत सीतारामन यांनी हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात आला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधत जावई हा शब्द काँग्रेसचा ट्रेडमार्क नाही. जावई प्रत्येक घरात असतो परंतु काँग्रेससाठी जावई (दामाद) हे एक विशेषनाम आहे, असं म्हणत त्यांनी टोला लगावला.राज्यसभेतील चर्चेदरम्यान निर्मला सीतारामन यांनी डिजिटल ट्रान्झॅक्शनवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नालाही उत्तर दिलं. "ऑगस्ट २०१६ ते जानेवारी २०२० पर्यंत युपीआयद्वारे एकूण ३.६ लाख कोटी रूपयांचं ट्रान्झॅक्शन झालं आहे. युपीआयचा श्रीमंत व्यक्ती करत नाहीत. त्याचा वापर मध्यमवर्गीय व्यक्ती आणि छोटे व्यापारी करतात. ही लोकं कोण आहे. सरकारनं कोणाच्या जावयासाठी युपीआय तयार केलं नाही," असंही त्या यावेळी म्हणाल्या. जेव्हापासून नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली आहे तेव्हापासून मनरेगा योजनेतील त्रुटी दूर करण्याचं काम केलं आहे. सुरू आर्थिक वर्षामध्ये मनरेगा योजनेअंतर्गत १.११ लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. गरीबांवर महासाथीचा होणारा परिणाम कमी करण्यासाठी ही तरतूद करण्यात आली असून आतापर्यंत ९० हजार ४०० कोटी रूपयांची रक्कम वितरीत करण्यात आल्याचं त्या म्हणाल्या. "सरकारवर भांडवलदारांच्या संगनमताचा आरोप करणं चुकीचं आहे. गावांमध्ये रस्त्यांची निर्मिती, प्रत्येक गावात वीज, छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम टाकण्यासारख्या योजना गरीबांसाठी होत्या. त्या भांडवलदारांसाठी नव्हत्य़ा. अर्थव्यवस्थेत करण्यात आलेल्या तरतुदींमुळे आत्मनिर्भर भारताला चालना मिळणार आहे," असंही सीतारामन म्हणाल्या. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. पश्चिम बंगालकडून छोट्या आणि सीमांत शेकऱ्यांची यादी मिळाली नसल्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना २०२१-२२ अंतर्गत १० हजार कोटी रूपयांची तरतूद कमी करण्यात आली आहे. आमच्या कार्यकाळात तरतूद केलेल्या रकमेचा वापर वाढला असल्याचंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :nirmala sitharamanनिर्मला सीतारामनbudget 2021बजेट 2021Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस