शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अवघ्या ५ टक्के व्याजाने लाखभर कर्ज; ‘विश्वकर्मा योजने’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 06:12 IST

३० लाख कुटुंबांना होणार थेट फायदा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशातील लाखो छोट्या व्यावसायिकांना कौशल्य प्रशिक्षणासह आर्थिक हातभार देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून ही योजना लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेद्वारे १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या ५ टक्के व्याजदराने उपलब्ध केले जाईल. सरकार या योजनेवर ५ वर्षांत १३ हजार कोटी रुपये खर्च करणार असून त्याचा ३० लाख कुटुंबांना त्याचा थेट फायदा होणार  आहे.

रेल्वेवाहतूक आणखी वेगवान होण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडीविषयक समितीने सात बहुपदरी रेल्वेमार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी ३२,५०० कोटी खर्च येणार आहे. तसेच शहरी बससेवांचा विस्तार करण्यासाठी मंत्रिमंडळाने पीएम ई-बससेवा योजनेला मंजुरी दिली.

३० लाख कुटुंबांना विश्वकर्मा योजनेद्वारे थेट फायदा होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. या योजनेंतर्गत बेसिक आणि ॲडव्हान्स असे दोन प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.

५.२५ लाख तरुणांना मिळणार नव्या स्किल्स

डिजिटल इंडिया या योजनेच्या विस्तारीकरणास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. या कामांसाठी १४,९०३ कोटी रुपये खर्च होतील. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले, डिजिटल इंडियाच्या विस्ताराद्वारे माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील ५.२५ लाख लोकांची कौशल्यवृद्धी केली जाणार आहे.

कुणाला फायदा? 

चर्मकार, गवंडी, सोनार, शिंपी, सुतार, शिल्पकार, जाळी तयार करणे, कुंभार, टेलर, लोहार यासह एकूण १८ पारंपरिक कामे करणाऱ्यांसाठी विश्वकर्मा योजना आणण्यात आली आहे.

कसा मिळेल योजनेचा लाभ?

प्रशिक्षणादरम्यान दररोज ५०० रुपये मानधनही दिले जाणार आहे. नवी साधने खरेदी करण्यासाठी सरकार १५ हजार रुपयांची मदत करणार आहे. कामगारांना १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. एक लाखाच्या मदतीनंतर पुढील टप्प्यात २ लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. याचवेळी सरकार ब्रँडिंग, ऑनलाइन मार्केट ॲक्सेस यासाठी मदत करेल. प्रथमच १८ पारंपरिक व्यापाऱ्यांचा समावेश केला आहे.

रेल्वे प्रवास होणार सुसाट

बहुपदरी रेल्वेमार्गामुळे एखाद्या एक्स्प्रेससाठी दुसऱ्या गाडीला सायडिंगला टाकण्याचे प्रमाण कमी होईल आणि रेल्वे प्रवास आणखी सुसाट होईल. तसेच देशातील रेल्वे जाळ्यांमध्ये आणखी २,३३९ किमी रेल्वेमार्गाची भर पडणार आहे. रेल्वे वाहतुकीची क्षमतावाढीसह गर्दी कमी होण्यास मदत होईल.

१६९ शहरांत धावणार १० हजार ई-बस

विविध शहरांतील बससेवेचा आवाका वाढविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘पीएम ई-बससेवा’ या योजनेला मंजुरी दिली. संघटित बस सेवा नसलेल्या शहरांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये १६९ शहरांमध्ये १० हजार ई-बस चालविल्या जातील. या योजनेसाठी ५२,६१३ कोटी रुपये खर्च येणार आहे.

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार