शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचारात भाजपा-काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 04:47 IST

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ आठ दिवस उरले आहेत. निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून काँग्रेस व भाजपने एकमेकांवरील हल्ले तीक्ष्ण केले आहेत.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ आठ दिवस उरले आहेत. निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून काँग्रेस व भाजपने एकमेकांवरील हल्ले तीक्ष्ण केले आहेत. दिवसेंदिवस दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक खडाजंगी होत आहे, व्यक्तिगत आरोपांच्या फैरी झडत आहेत.राज्यात काँग्रेस सरकार टिकवण्यासाठी लढत आहे तर भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ सभा घेण्याचे ठरवून सरकार आणि पक्षाची सगळी शक्ती या निवडणुकीसाठी पणाला लावली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने साम, दाम, दंड, भेदाचा मार्ग अवलंबून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लक्ष्य करून हल्ले सुरू केले आहेत.निवडणूक प्रचारात मोदी बंगळुरुला गार्बेज सिटी म्हणत असून त्याचा दोष राज्य सरकारला देत आहेत, सिद्धरामय्या यांनी बंगळुरूला गार्बेज सिटी बनवली, असा आरोप ते करीत आहेत. मोदी यांनी जनरल थिमय्या आणि जनरल करीअप्पा यांचे नाव घेऊन काँग्रेसवर हल्ला केला की, काँग्रेसने या दोघांचा अपमान केला होता. राहुल गांधी यांच्यावर वैयक्तिक हल्ला करण्यास मोदी विसरले नाहीत. अर्थात गांधीही मागे न राहता म्हणाले की, गार्डन सिटीला गार्बेज सिटी संबोधून मोदी यांनी बंगळुरूत राहणाऱ्यांचा अपमान केला आहे. बंगळुरू हा भारताचा गौरव असल्याचे राहुल गांधी म्हणाले.भाजपा नेत्यांकडून होत असलेले वैयक्तिक आरोप आणि वापरली जाणारी भाषा यावरून काँग्रेसने मोदी यांच्यावर चौफेर हल्ला चढविला आहे. निवडणूक आयोगाकडे भाजपच्या प्रचाराबद्दल तक्रारही नोंदविली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते मनु अभिषेक सिंघवी यांनी आरोप केला की, मोदी काँग्रेसवर हल्ला करण्याऐवजी या राज्याचा आणि तेथील जनतेचा अपमान करीत आहेत. पंतप्रधान मोदी खोटारडे आहेत. राज्याचा विकास त्यांना दिसत नाही; त्यांना गुन्हेगारी आणि दुराचारच दिसतो.आयटी हब त्यांना दिसत नाही. जनरल थिम्मया आणि करिअप्पा यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीवरून पंतप्रधानांचा इतिहास किती दुबळा आहे, हे दिसून येते. भाजप आणि मोदी राज्यांत मतविभाजन करून सांप्रदायिकता निर्माण करू पाहत आहेत.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाcongressकाँग्रेस