शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचारात भाजपा-काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 04:47 IST

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ आठ दिवस उरले आहेत. निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून काँग्रेस व भाजपने एकमेकांवरील हल्ले तीक्ष्ण केले आहेत.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ आठ दिवस उरले आहेत. निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून काँग्रेस व भाजपने एकमेकांवरील हल्ले तीक्ष्ण केले आहेत. दिवसेंदिवस दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक खडाजंगी होत आहे, व्यक्तिगत आरोपांच्या फैरी झडत आहेत.राज्यात काँग्रेस सरकार टिकवण्यासाठी लढत आहे तर भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ सभा घेण्याचे ठरवून सरकार आणि पक्षाची सगळी शक्ती या निवडणुकीसाठी पणाला लावली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने साम, दाम, दंड, भेदाचा मार्ग अवलंबून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लक्ष्य करून हल्ले सुरू केले आहेत.निवडणूक प्रचारात मोदी बंगळुरुला गार्बेज सिटी म्हणत असून त्याचा दोष राज्य सरकारला देत आहेत, सिद्धरामय्या यांनी बंगळुरूला गार्बेज सिटी बनवली, असा आरोप ते करीत आहेत. मोदी यांनी जनरल थिमय्या आणि जनरल करीअप्पा यांचे नाव घेऊन काँग्रेसवर हल्ला केला की, काँग्रेसने या दोघांचा अपमान केला होता. राहुल गांधी यांच्यावर वैयक्तिक हल्ला करण्यास मोदी विसरले नाहीत. अर्थात गांधीही मागे न राहता म्हणाले की, गार्डन सिटीला गार्बेज सिटी संबोधून मोदी यांनी बंगळुरूत राहणाऱ्यांचा अपमान केला आहे. बंगळुरू हा भारताचा गौरव असल्याचे राहुल गांधी म्हणाले.भाजपा नेत्यांकडून होत असलेले वैयक्तिक आरोप आणि वापरली जाणारी भाषा यावरून काँग्रेसने मोदी यांच्यावर चौफेर हल्ला चढविला आहे. निवडणूक आयोगाकडे भाजपच्या प्रचाराबद्दल तक्रारही नोंदविली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते मनु अभिषेक सिंघवी यांनी आरोप केला की, मोदी काँग्रेसवर हल्ला करण्याऐवजी या राज्याचा आणि तेथील जनतेचा अपमान करीत आहेत. पंतप्रधान मोदी खोटारडे आहेत. राज्याचा विकास त्यांना दिसत नाही; त्यांना गुन्हेगारी आणि दुराचारच दिसतो.आयटी हब त्यांना दिसत नाही. जनरल थिम्मया आणि करिअप्पा यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीवरून पंतप्रधानांचा इतिहास किती दुबळा आहे, हे दिसून येते. भाजप आणि मोदी राज्यांत मतविभाजन करून सांप्रदायिकता निर्माण करू पाहत आहेत.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाcongressकाँग्रेस