शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 15:38 IST

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काँग्रेसवर इतिहासाची भीती असल्याचा आरोप केला. त्यांनी सिंधू पाणी कराराबद्दल नेहरूंच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आज राज्यसभेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काँग्रेसवर टीका केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर स्थगित करण्यात आलेल्या सिंधू पाणी करारावरूनही त्यांनी टीका केली.

'ऑपरेशन सिंदूर'बाबत विरोधक अनेकदा सरकारवर आरोप करत आहेत. ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करार केला आहे, असल्याचा दावा करत आहेत. हा दावा भारत सरकार हे आरोप फेटाळला आहे.

'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले

राज्यसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेदरम्यान परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर म्हणाले, "मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी काळजीपूर्वक ऐकावे. २२ एप्रिल ते १६ जूनपर्यंत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात एकही फोन कॉल झाला नाही.

यावेळी एस जयशंकर यांनी इतिहासाचे संदर्भही दिली.  जयशंकर म्हणाले, "काही लोक इतिहास विसरू इच्छितात. कदाचित ते त्यांना शोभत नसेल. त्यांना फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात ज्या त्यांच्या मनाला आनंद देतात."

'नेहरूंच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले'

एस जयशंकर यांनी १९६० मध्ये संसदेत जवाहरलाल नेहरूंच्या विधानाची आठवण करून दिली. "३० नोव्हेंबर १९६० रोजी नेहरू म्हणाले होते की संसदेने पाण्याचे प्रमाण किंवा पैशाच्या व्यवहाराचा निर्णय घेऊ नये. लोकांनी त्याला विरोध केला",असंही जयशंकर म्हणाले.

"नेहरू म्हणाले होते की हा करार पाकिस्तानी पंजाबच्या हिताचा आहे. पण त्यांनी काश्मीर, पंजाब, राजस्थान किंवा गुजरातमधील शेतकऱ्यांबद्दल एकही शब्द बोलले नाहीत', असा टोलाही जयशंकर यांनी लगावला. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरूंच्या चुका सुधारण्याचे काम केले आहे. आम्हाला ६० वर्षांपासून सांगितले जात होते की काहीही होऊ शकत नाही. नेहरूंच्या चुका सुधारता येत नाहीत. परंतु मोदी सरकारने ते शक्य आहे हे दाखवून दिले. कलम ३७० रद्द करण्यात आले आणि आता सिंधू पाणी करार देखील दुरुस्त केला जात आहे", असंही एस जयशंकर म्हणाले.

"जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पूर्णपणे पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत हा करार स्थगित राहील. "रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही", असा इशारा आम्ही दिल्याचे त्यांनी सांगितले.

"हा करार त्या काळातील चुकीच्या धोरणांचा परिणाम होता. त्यांनी काँग्रेसच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले . ते इतिहासापासून धडा घेण्यास तयार नाही",असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा