शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
4
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
6
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
7
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
8
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
9
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
10
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
11
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
12
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
13
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
14
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
15
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
16
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
17
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 15:38 IST

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काँग्रेसवर इतिहासाची भीती असल्याचा आरोप केला. त्यांनी सिंधू पाणी कराराबद्दल नेहरूंच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आज राज्यसभेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काँग्रेसवर टीका केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर स्थगित करण्यात आलेल्या सिंधू पाणी करारावरूनही त्यांनी टीका केली.

'ऑपरेशन सिंदूर'बाबत विरोधक अनेकदा सरकारवर आरोप करत आहेत. ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करार केला आहे, असल्याचा दावा करत आहेत. हा दावा भारत सरकार हे आरोप फेटाळला आहे.

'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले

राज्यसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेदरम्यान परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर म्हणाले, "मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी काळजीपूर्वक ऐकावे. २२ एप्रिल ते १६ जूनपर्यंत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात एकही फोन कॉल झाला नाही.

यावेळी एस जयशंकर यांनी इतिहासाचे संदर्भही दिली.  जयशंकर म्हणाले, "काही लोक इतिहास विसरू इच्छितात. कदाचित ते त्यांना शोभत नसेल. त्यांना फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात ज्या त्यांच्या मनाला आनंद देतात."

'नेहरूंच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले'

एस जयशंकर यांनी १९६० मध्ये संसदेत जवाहरलाल नेहरूंच्या विधानाची आठवण करून दिली. "३० नोव्हेंबर १९६० रोजी नेहरू म्हणाले होते की संसदेने पाण्याचे प्रमाण किंवा पैशाच्या व्यवहाराचा निर्णय घेऊ नये. लोकांनी त्याला विरोध केला",असंही जयशंकर म्हणाले.

"नेहरू म्हणाले होते की हा करार पाकिस्तानी पंजाबच्या हिताचा आहे. पण त्यांनी काश्मीर, पंजाब, राजस्थान किंवा गुजरातमधील शेतकऱ्यांबद्दल एकही शब्द बोलले नाहीत', असा टोलाही जयशंकर यांनी लगावला. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरूंच्या चुका सुधारण्याचे काम केले आहे. आम्हाला ६० वर्षांपासून सांगितले जात होते की काहीही होऊ शकत नाही. नेहरूंच्या चुका सुधारता येत नाहीत. परंतु मोदी सरकारने ते शक्य आहे हे दाखवून दिले. कलम ३७० रद्द करण्यात आले आणि आता सिंधू पाणी करार देखील दुरुस्त केला जात आहे", असंही एस जयशंकर म्हणाले.

"जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पूर्णपणे पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत हा करार स्थगित राहील. "रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही", असा इशारा आम्ही दिल्याचे त्यांनी सांगितले.

"हा करार त्या काळातील चुकीच्या धोरणांचा परिणाम होता. त्यांनी काँग्रेसच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले . ते इतिहासापासून धडा घेण्यास तयार नाही",असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा