शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 15:38 IST

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काँग्रेसवर इतिहासाची भीती असल्याचा आरोप केला. त्यांनी सिंधू पाणी कराराबद्दल नेहरूंच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आज राज्यसभेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काँग्रेसवर टीका केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर स्थगित करण्यात आलेल्या सिंधू पाणी करारावरूनही त्यांनी टीका केली.

'ऑपरेशन सिंदूर'बाबत विरोधक अनेकदा सरकारवर आरोप करत आहेत. ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करार केला आहे, असल्याचा दावा करत आहेत. हा दावा भारत सरकार हे आरोप फेटाळला आहे.

'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले

राज्यसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेदरम्यान परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर म्हणाले, "मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी काळजीपूर्वक ऐकावे. २२ एप्रिल ते १६ जूनपर्यंत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात एकही फोन कॉल झाला नाही.

यावेळी एस जयशंकर यांनी इतिहासाचे संदर्भही दिली.  जयशंकर म्हणाले, "काही लोक इतिहास विसरू इच्छितात. कदाचित ते त्यांना शोभत नसेल. त्यांना फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात ज्या त्यांच्या मनाला आनंद देतात."

'नेहरूंच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले'

एस जयशंकर यांनी १९६० मध्ये संसदेत जवाहरलाल नेहरूंच्या विधानाची आठवण करून दिली. "३० नोव्हेंबर १९६० रोजी नेहरू म्हणाले होते की संसदेने पाण्याचे प्रमाण किंवा पैशाच्या व्यवहाराचा निर्णय घेऊ नये. लोकांनी त्याला विरोध केला",असंही जयशंकर म्हणाले.

"नेहरू म्हणाले होते की हा करार पाकिस्तानी पंजाबच्या हिताचा आहे. पण त्यांनी काश्मीर, पंजाब, राजस्थान किंवा गुजरातमधील शेतकऱ्यांबद्दल एकही शब्द बोलले नाहीत', असा टोलाही जयशंकर यांनी लगावला. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरूंच्या चुका सुधारण्याचे काम केले आहे. आम्हाला ६० वर्षांपासून सांगितले जात होते की काहीही होऊ शकत नाही. नेहरूंच्या चुका सुधारता येत नाहीत. परंतु मोदी सरकारने ते शक्य आहे हे दाखवून दिले. कलम ३७० रद्द करण्यात आले आणि आता सिंधू पाणी करार देखील दुरुस्त केला जात आहे", असंही एस जयशंकर म्हणाले.

"जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पूर्णपणे पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत हा करार स्थगित राहील. "रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही", असा इशारा आम्ही दिल्याचे त्यांनी सांगितले.

"हा करार त्या काळातील चुकीच्या धोरणांचा परिणाम होता. त्यांनी काँग्रेसच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले . ते इतिहासापासून धडा घेण्यास तयार नाही",असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा