शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Delhi Liquor Scam: अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री? वाचा AAP नेते संजय सिंह काय म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 12:14 IST

Arvind Kejriwal wife Sunita Kejriwal, Delhi Liquor Scam: दारू घोटाळा प्रकरणी सध्या अरविंद केजरीवाल तुरूंगात आहेत.

Arvind Kejriwal wife Sunita Kejriwal, Delhi CM, Liquor Scam Case: दारू घोटाळा प्रकरणात सध्या दिल्लीचेमुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल हे तुरूगवासात आहेत. पण याच घोटाळ्याशी संबंध असलेले संजय सिंह मात्र तुरुंगातून बाहेर आले आहेत. तुरूंगाबाहेर येताच त्यांनी टीओआयशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल निर्दोष असल्याचा दावा केला. मुलाखतीत त्यांनी अनेक धक्कादायक विधाने केली. तिहार जेलमधून जामिनावर बाहेर असलेले संजय सिंह यांनी भाजपावर सडकून टीका केली. संजय सिंह यांच्या म्हणण्यानुसार, या घोटाळ्याचे काही साक्षीदार भाजपाशी संबंधित असून त्यांच्या साक्षीच्या आधारे केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. केजरीवाल यांचा जामीन मिळत नसल्याने आता ते मुख्यमंत्रीपद सोडणार का, त्यांच्या जागी पत्नी सुनीता केजरीवाल या दिल्लीच्या CM बनणार का, अशा काही प्रश्नांची संजय सिंह यांनी उत्तरे दिली.

सुनीता केजरीवाल मुख्यमंत्री होणार का?

केजरीवाल यांच्या जागी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल दिसणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, संजय सिंह म्हणाले की, अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि यापुढेही तेच राहतील. आम्ही एक सर्वेक्षण केले आहे, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की, दिल्लीच्या जनतेला अरविंद केजरीवाल यांनीच दिल्लीचे मुख्यमंत्री राहावे असे वाटते. सहारा समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांना तुरुंगात संगणक आणि इंटरनेट सुविधा देण्यात आल्या, जेणेकरून ते त्यांचे कार्यालय चालवू शकतील. जोपर्यंत अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळत नाही, तोपर्यंत त्यांनाही सरकार चालवण्यासाठी अशाच सुविधा मिळाव्यात. आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही. सारं काही आहे तसंच राहिल.

'आप'चे नेतृत्व बदलणार?

आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात बदल होणार का? यावर प्रतिक्रिया देताना संजय सिंह म्हणाले की, मला आशा आहे की अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनाही लवकरच जामीन मिळेल आणि तुरूंगातून बाहेर येतील. सर्वोच्च न्यायालयाने PMLAच्या कलम ५० अंतर्गत नोंदवलेल्या साक्षीदारांचे जबाब तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यातून तथ्य आणि सत्य बाहेर येईलच.

तुरुंगातून सरकार कसे चालवणार?

अरविंद केजरीवाल यांना तुरूंगात संगणक द्यावा जेणेकरून ते काम करू शकतील अशी आपची मागणी आहे. पण दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना म्हणतात की, तुरुंगातून सरकार चालवू देणार नाही. अशा स्थितीत दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होणार का? यावर उत्तर देताना संजय सिंह म्हणाले की, संविधानाचे निर्माते डॉ. आंबेडकर आहेत, नायब राज्यपाल नाहीत. मुख्यमंत्र्यांना तुरुंगातून सरकार चालवण्यापासून संविधान रोखत नाही. त्यामुळे तसे काहीही घडणार नाही.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीChief Ministerमुख्यमंत्रीAAPआप