शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रेंगाळणारी वाहतूक; करोडोंचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 1:00 AM

दरवर्षी अर्थव्यवस्थेचे १.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली : गर्दीच्या काळात रेंगाळणाऱ्या वाहतुकीमुळे देशातील दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि कोलकाता या चार महानगरांच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी १.४७ लाख कोटी रुपयांचा फटका बसतो, असे आढळून आले आहे.एका संस्थेच्या सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत या महानगरांत वाहनांची प्रचंड गर्दी होऊन वाहतूक रेंगाळते. त्यामुळे वाहनांना प्रवासासाठी नियमित वेळेपेक्षा सरासरी दीड तास अधिक लागतो. जानेवारीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, वाहनांच्या गर्दीचा सर्वाधिक फटका कोलकाता शहराला बसतो. दिल्लीत सर्वाधिक नोंदणीकृत वाहने (१ कोटींपेक्षा जास्त) असली तरी रस्त्यांचे जाळे चांगले असल्याने कमी फटका बसतो. दिल्लीच्या क्षेत्रफळापैकी १२ टक्के क्षेत्रफळ रस्त्यांनी व्यापले आहे. कोलकात्यातील रस्त्यांचे क्षेत्रफळ अवघे ६ टक्के आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक शहरातील ३०० जणांना सहभागी करून घेण्यात आले होते. दिल्लीत सर्वाधिक ४५ टक्के लोक खासगी कारचा वापर करतात. बंगळुरूमध्ये हे प्रमाण ३८ टक्के आहे.रस्त्यांचा गैरवापरनागरी वाहतूक तज्ज्ञ एन. रंगनाथन यांनी सांगितले की, कोलकात्यात रस्त्यांचे कमी प्रमाण, निकृष्ट भूमितीय स्थिती आणि शहराच्या गाभ्याच्या भागात वाहतुकीची मोठी गर्दी या कारणांनी वाहतूक रेंगाळते. बंगळुरूत रस्त्यांचा गैरवापर वाढला आहे.

टॅग्स :Travelप्रवास