विजेच्या खांबाची वादळात पडझड ; सुरगाणा तालुक्यातील गावे तीन दिवसांपासून अंधारात
By Admin | Updated: May 8, 2014 20:53 IST2014-05-08T20:53:48+5:302014-05-08T20:53:48+5:30
सुरगाणा : तालुक्यातील नार-पार नदीच्या खोर्यातील वार्हे, ननाशी, मनखेड, शिरीषपाडा, रोधांणे, गळवड, देवळा यांसह ननाशी उपकेंद्रातील ६० ते ७० गावे गेल्या तीन दिवसांपासून अंधारात आहेत. या भागात तीन दिवसांपूर्वी जोरदार चक्रीवादळ झाल्याने पहुचीबारी येथील दोन विजेचे खांब जमीनदोस्त झाले, तर ननाशी येथील चार खांब जमीनदोस्त झाल्यामुळे वीज गायब असल्याचे सांगितले जात आहे. वार्हे भागातील ग्रामस्थांनी ननाशी येथील वीज वितरण कार्यालयात धाव घेतली असता तेथील कार्यकारी अभियतांच तीन ते चार दिवसांपासून रजेवर असल्याचे सांगण्यात आले. वीज गायब असल्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात काही गावांना पाणीपुरवठा योजना बंद आहेत, तर काही गावांना कूपनलिकांमध्ये मोटारी बसविल्यामुळे गावांना तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. वीज नसल्यामुळे अंधाराचे साम्र

विजेच्या खांबाची वादळात पडझड ; सुरगाणा तालुक्यातील गावे तीन दिवसांपासून अंधारात
स रगाणा : तालुक्यातील नार-पार नदीच्या खोर्यातील वार्हे, ननाशी, मनखेड, शिरीषपाडा, रोधांणे, गळवड, देवळा यांसह ननाशी उपकेंद्रातील ६० ते ७० गावे गेल्या तीन दिवसांपासून अंधारात आहेत. या भागात तीन दिवसांपूर्वी जोरदार चक्रीवादळ झाल्याने पहुचीबारी येथील दोन विजेचे खांब जमीनदोस्त झाले, तर ननाशी येथील चार खांब जमीनदोस्त झाल्यामुळे वीज गायब असल्याचे सांगितले जात आहे. वार्हे भागातील ग्रामस्थांनी ननाशी येथील वीज वितरण कार्यालयात धाव घेतली असता तेथील कार्यकारी अभियतांच तीन ते चार दिवसांपासून रजेवर असल्याचे सांगण्यात आले. वीज गायब असल्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात काही गावांना पाणीपुरवठा योजना बंद आहेत, तर काही गावांना कूपनलिकांमध्ये मोटारी बसविल्यामुळे गावांना तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. वीज नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले असून, जंगली श्वापदांचा धोका वाढला आहे. जंगलात पाणी नसल्यामुळे तरस, बिबट्या, गावाजवळील पाणवठ्यावर येतात. सायंकाळी पाणी आणण्यास जाणार्या महिलांचा दृष्टीस पडत असल्याने महिलांना जीव धोक्यात घालून पाणी भरण्यास विहिरींवर, पाणवठ्यावर जावे लागत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असून, वीज नसल्यामुळे घरात झोपणे असहय्य होत असतानाच अंगणात झोपणेही मुश्कील आहे. तालुक्याच्या वार्हे, अंबाडे, रोघाणे, मनखेड, जाहुले, भवाडा या गावांसह निम्म्या तालुक्यात दिंडोरी तालुक्यातील ननाशी उपकेंद्रात वीजपुरवठा होत असल्याने त्याची तक्रार मात्र तालुक्यातील अधिकारी ऐकून घेण्यास तयार नाही. वीज वितरण कंपनीने तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी देवळा, गळवड येथील देवराम वार्डे, रतन वार्डे, सीताराम मिसाळ, यमुना गायकवाड, सावित्रीबाई जाधव, जनाबाई वार्डे, गुलाब वार्डे यांनी केली आहे. दिंडोरीजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने सुरगाणा येथील वीजपुरवठा जवळपास १२ तास खंडित झाला होता. तसेच पिंपळसोंड, उंबरपाडा, खंुटविहीर, मालगोदा या परिसरात तीन दिवसांपासून वीज गायब असून, पिंळसोंड येथील नळपाणी पुरवठा योजना बंद असल्याने तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. (वार्ताहर)