शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

एलआयसीचा आयपीओ २०२१ च्या वित्तीय वर्षातील उत्तरार्धात विक्रीस- राजीवकुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 03:20 IST

कायद्यात बदल करावे लागणार

नवी दिल्ली : निर्गुंतवणुकीतून मोठा निधी उभारण्यासाठी एलआयसीतील केंद्र सरकारचे काही भागभांडवल आयपीओद्वारे विकले जाणार आहे. २०२१ या वित्तीय वर्षाच्या उत्तरार्धात हे आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असे वित्त सचिव राजीवकुमार यांनी रविवारी सांगितले.

एलआयसीचे आयपीओ विक्रीस आणण्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२०-२०२१ या वित्त वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी लोकसभेत सादर करताना केली होती. वित्त सचिव राजीवकुमार यांनी सांगितले की, एलआयसीचे आयपीओ विक्रीला आणण्याआधी अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. त्यासाठी काही कायद्यांमध्येही सुधारणा कराव्या लागतील. यासंदर्भात केंद्रीय कायदा मंत्रालयाशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. या सर्व गोष्टी पूर्ण करून मगच २०२१ च्या उत्तरार्धात एलआयसीचे आयपीओ विक्रीसाठी आणले जाण्याची शक्यता आहे.

ते म्हणाले की, एलआयसीच्या आयपीओ विक्रीचा व्यवहार अत्यंत पारदर्शकपणे पार पाडला जाईल. एलआयसीतील केंद्र सरकारच्या भागभांडवलापैकी १० टक्के वाटा विक्रीसाठी उपलब्ध केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप निश्चित निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

एलआयसी व आयडीबीआयचे आर्थिक नाते

निर्गुंतवणुकीतून निधी उभारण्याचे दोन लाख रुपयांचे वाढीव उद्दिष्ट असून आयडीबीआय बँकेतील सरकारचे काही भागभांडवलही लोकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. एलआयसी ही आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम आहे. आयडीबीआय बँक संकटात आलेली असताना तिला सावरण्यासाठी केंद्र सरकारच्या आदेशानुसार एलआयसीने काही भागभांडवल या बँकेत गुंतविले. या निर्णयाबद्दल त्या वेळेस केंद्र सरकारवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती.

योगासनांच्या जादुई व्यायामाने मोदींनी अर्थव्यवस्था सावरावी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या योगासनांच्या ‘जादुई व्यायामा’चा प्रयोग देशाची डळमळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी करावा, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी लगावला. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मांडलेल्या अर्थसंकल्पास ‘पोकळ’ असे संबोधणाऱ्या राहुल गांधींनी टीकेचा रोख मोदींकडे वळविला.

आपल्या निवासस्थानाच्या हिरवळीवर हात उंचावून उड्या मारणाऱ्या मोदींच्या व्हिडिओसह केलेल्या टष्ट्वीटमध्ये गांधी यांनी पंतप्रधानांना उद्देशून लिहिले: तुमचा जादुई व्यायाम थोडा जास्त करा. कोणी सांगावे त्यामुळे कदाचित अर्थव्यवस्थेस चालना मिळेल. सन २००८ नंतर विकासाचा दर सर्वात कमी म्हणजे ४.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मोदींनी स्वत:च्या तंदुरुस्तीप्रमाणे अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीकडेही लक्ष द्यावे, असे त्यांनीयातून अप्रत्यक्षपणे सुचविले.

टॅग्स :budget 2020बजेटNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनLIC - Life Insurance CorporationएलआयसीNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था