शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीची 'किल्ली' कुणाकडे?; अरविंद केजरीवाल यांना SCचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 13:34 IST

दिल्लीमधील अधिकारांच्या विभागणीवरून नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात आज सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल सरकारला जोरदार धक्का दिला आहे.

ठळक मुद्देदिल्लीमधील अधिकारांच्या विभागणीवरून नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात आज सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल सरकारला जोरदार धक्का दिलासर्वोच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग केंद्र सरकारच्या अधीन ठेवला ष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील प्रशासकीय सेवांवर कुणाचे नियंत्रण असावे, याबाबत दोन्ही न्यायमूर्तींमध्ये मतमतांतर झाल्याने पेच फसला

नवी दिल्ली - दिल्लीमधील अधिकारांच्या विभागणीवरून नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात आज सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल सरकारला जोरदार धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग केंद्र सरकारच्या अधीन ठेवला आहे. तर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील प्रशासकीय सेवांवर कुणाचे नियंत्रण असावे, याबाबत दोन्ही न्यायमूर्तींमध्ये मतमतांतर झाल्याने पेच फसला असून, याबाबतचा खंडित निर्णय वरिष्ठ पीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र एसीबी, महसूल, तपास आयोग याबाबत दोन्ही न्यायमूर्तींमध्ये एकमत झाले. 

अधिकारांच्या विभागणीवरून नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबत आज न्यायमूर्ती सिकरी आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या द्विसदस्यीय पीठाने निकाल दिला. या निकालात  दिल्ली सरकारचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करू शकत नाही, याबाबत केंद्र सरकारने काढलेला अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.

तपास आयोग स्थापन करण्याचा अधिकारही केंद्र सरकारला देण्यात आला आहे. तसेच पोलीस केंद्राच्या अखत्यारीत असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणा  केंद्रकडेच राहील. मात्र स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नियुक्त करण्याचा अधिकार दिल्ली सरकारला देण्यात आला आहे. महसुली निर्णय घेताना दिल्ली सरकारला नायब राज्यपालांची सहमती घ्यावी लागेल. तर ऊर्जा खात्यातील संचालकांची नियुक्ती करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

 प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि बदलीबाबत सर्वोच्च न्यायालयाने संमिश्र निकाल दिला आहे. या निकालानुसार प्रथम आणि द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि बदली करण्याचा अधिकार केंद्राकडे असेल. तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार दिल्ली सरकारच्या अखत्यारित असेल. तसेच मतभेद झाल्यास प्रकरण राष्ट्रपतींकडे जाईल. निकाल वाचून दाखवताना प्रशासकीय सेवा केंद्राच्या अधीन राहतील असे न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी सांगितल्याने दोन्ही न्यायमूर्तींमध्ये एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे सदर विषय वरिष्ठ पीठाकडे वर्ग करण्यात आला. 

महसुली विषयांमध्ये जमिनीसंदर्भातील काही विषय दिल्ली सरकारच्या अखत्यारीत राहतील. त्यानुसार दिल्ली सरकार जमिनीचे दर आणि नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करू शकेल. तसेच जमिनीचा सर्कल मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिन असेल, असा निर्यय सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र महसुली निर्णय घेताना दिल्ली सरकारला नायब राज्यपालांची सहमती घ्यावी लागेल. 

 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNew Delhiनवी दिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालCentral Governmentकेंद्र सरकार