शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दिल्लीची 'किल्ली' कुणाकडे?; अरविंद केजरीवाल यांना SCचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 13:34 IST

दिल्लीमधील अधिकारांच्या विभागणीवरून नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात आज सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल सरकारला जोरदार धक्का दिला आहे.

ठळक मुद्देदिल्लीमधील अधिकारांच्या विभागणीवरून नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात आज सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल सरकारला जोरदार धक्का दिलासर्वोच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग केंद्र सरकारच्या अधीन ठेवला ष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील प्रशासकीय सेवांवर कुणाचे नियंत्रण असावे, याबाबत दोन्ही न्यायमूर्तींमध्ये मतमतांतर झाल्याने पेच फसला

नवी दिल्ली - दिल्लीमधील अधिकारांच्या विभागणीवरून नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात आज सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल सरकारला जोरदार धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग केंद्र सरकारच्या अधीन ठेवला आहे. तर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील प्रशासकीय सेवांवर कुणाचे नियंत्रण असावे, याबाबत दोन्ही न्यायमूर्तींमध्ये मतमतांतर झाल्याने पेच फसला असून, याबाबतचा खंडित निर्णय वरिष्ठ पीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र एसीबी, महसूल, तपास आयोग याबाबत दोन्ही न्यायमूर्तींमध्ये एकमत झाले. 

अधिकारांच्या विभागणीवरून नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबत आज न्यायमूर्ती सिकरी आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या द्विसदस्यीय पीठाने निकाल दिला. या निकालात  दिल्ली सरकारचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करू शकत नाही, याबाबत केंद्र सरकारने काढलेला अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.

तपास आयोग स्थापन करण्याचा अधिकारही केंद्र सरकारला देण्यात आला आहे. तसेच पोलीस केंद्राच्या अखत्यारीत असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणा  केंद्रकडेच राहील. मात्र स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नियुक्त करण्याचा अधिकार दिल्ली सरकारला देण्यात आला आहे. महसुली निर्णय घेताना दिल्ली सरकारला नायब राज्यपालांची सहमती घ्यावी लागेल. तर ऊर्जा खात्यातील संचालकांची नियुक्ती करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

 प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि बदलीबाबत सर्वोच्च न्यायालयाने संमिश्र निकाल दिला आहे. या निकालानुसार प्रथम आणि द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि बदली करण्याचा अधिकार केंद्राकडे असेल. तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार दिल्ली सरकारच्या अखत्यारित असेल. तसेच मतभेद झाल्यास प्रकरण राष्ट्रपतींकडे जाईल. निकाल वाचून दाखवताना प्रशासकीय सेवा केंद्राच्या अधीन राहतील असे न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी सांगितल्याने दोन्ही न्यायमूर्तींमध्ये एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे सदर विषय वरिष्ठ पीठाकडे वर्ग करण्यात आला. 

महसुली विषयांमध्ये जमिनीसंदर्भातील काही विषय दिल्ली सरकारच्या अखत्यारीत राहतील. त्यानुसार दिल्ली सरकार जमिनीचे दर आणि नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करू शकेल. तसेच जमिनीचा सर्कल मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिन असेल, असा निर्यय सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र महसुली निर्णय घेताना दिल्ली सरकारला नायब राज्यपालांची सहमती घ्यावी लागेल. 

 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNew Delhiनवी दिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालCentral Governmentकेंद्र सरकार