शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बलात्कारपीडितेचे मोदी, आदित्यनाथांना पत्र ; आत्महत्येचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 01:12 IST

स्वत:च्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात बलात्कार पीडित मुलीने तिच्यावर अत्याचार करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी

रायबरेली (उत्तर प्रदेश) : बलात्कार पीडित मुलीने तिच्यावर अत्याचार करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी स्वत:च्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.आरोपीचे बड्या लोकांशी संबंध असल्यामुळे पोलीस त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत व आरोपी माझ्यावर मी तक्रार मागे घ्यावी, यासाठी दडपण आणत आहेत. मला न्याय दिला जावा अन्यथा मी आत्महत्या करेन, असे या मुलीने २० जानेवारी रोजी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.याबाबत सहायक पोलिस अधीक्षक शेखर सिंह यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी २४ मार्च, २०१७ रोजी दिव्य पांडे आणि अंकित वर्मा यांच्यावर बाराबंकीत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले. मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली होती. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या माझ्या मुलीवर आरोपींनी बलात्कार केला व तेव्हापासून ते तिला ब्लॅकमेल करीत आहेत, असा तिच्या वडिलांचा आरोप आहे.आॅक्टोबर, २०१७ मध्ये अज्ञात इसमांवर रायबरेलीत गुन्हा दाखल झाला आहे. या मुलीचे बनावट फेसबुक प्रोफाइल तयार करून, त्यावर अश्लील चित्रे पोस्ट केल्याचा गुन्हा या अज्ञात इसमांवर दाखल झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे सिंह म्हणाले.या मुलीने रक्ताने लिहिलेल्या पत्राबद्दल विचारले असता, शेखर सिंह म्हणाले की, मला त्याबद्दल काही माहिती नाही. (वृत्तसंस्था)विवाहितेवर बलात्कारसामूहिक बलात्काराची ताजी घटना ५ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशात घडली. भदावल खेड्याजवळील (जिल्हा बांदा) जंगलात तिघांनी महिलेचा (रा. चित्रकूट) पती आणि तिच्या दीराला ओलीस ठेवून बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. हे कुटुंब बांदा-चित्रकूट सीमेवरील नदी ओलांडून पलीकडे जात असताना हा प्रकार घडला.

टॅग्स :Rapeबलात्कारGang Rapeसामूहिक बलात्कारyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी