शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एक वर्षासाठी तरी कृषी कायदे प्रायोगिक तत्वावर लागू करुन पाहुयात; राजनाथ सिंहांचे शेतकऱ्यांना आवाहन

By मोरेश्वर येरम | Updated: December 25, 2020 15:02 IST

शेतकऱ्यांनी देशात नवे कृषी कायदे किमान एक किंवा दोन वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर लागू करण्याची तयारी दाखवावी.

ठळक मुद्देकृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरले नाहीत तर ते मागे घेण्याची तयारीएक किंवा दोन वर्षांसाठी कृषी कायदे लागू करण्याचं शेतकऱ्यांना आवाहनकृषी कायद्यावर चर्चेसाठी राजनाथ यांचं आंदोलक शेतकऱ्यांना निमंत्रण

नवी दिल्लीकृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना चर्चेचं आवाहन करत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरले नाहीत, तर ते मागे घेऊ, अशी ग्वाही दिली आहे.

"रस्त्यावर आंदोलनाला बसलेले शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांप्रती सरकारला पूर्ण आदर आहे. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं हिताचं नसेल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यासोबत खंबीरपणे उभे आहेत", असं राजनाथ सिंह म्हणाले. द्वारका येथील एका रॅलीला ते संबोधित करत होते. 

"शेतकऱ्यांनी देशात नवे कृषी कायदे किमान एक किंवा दोन वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर लागू करण्याची तयारी दाखवावी. जर या कायद्यांमधून शेतकऱ्यांना कोणताही फायदा झाला नाही, तर सरकार हे कायदे तात्काळ रद्द करेल", असं आश्वासन राजनाथ यांनी दिलं आहे. 

शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची सरकारला जाण असून कोणत्याही समस्येवर चर्चेनेच तोडगा निघतो. पंतप्रधान मोदींनाही शेतकऱ्यांसोबत चर्चा करायची आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे, असंही राजनाथ यावेळी म्हणाले. आंदोलक शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे येऊन सरकारसोबत चर्चेची तयारी दाखवावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी