शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार?; लालू प्रसाद यादव यांची ऑफर, भाजपाची डोकेदुखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 19:10 IST

लालू प्रसाद यादव यांच्या एका वाक्यानेच बिहारमधील राजकीय रंग दिसू लागले आहेत.

पटना - होळीच्या निमित्ताने लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या विधानामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ माजली आहे. नितीश कुमार महाआघाडीत परतण्याची चर्चा सुरू झाली आहे. लालू प्रसाद यादव यांचं विधान आणि राज्यातील वाढत्या हिंदुत्वाच्या वातावरणामुळे नितीश कुमार पुन्हा पलटी मारतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यात होळीची संधी साधून लालू प्रसाद यादव यांनी जे विधान केले त्यामुळे नितीश कुमार यांच्या महाआघाडीतील भविष्याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. 

बिहारमध्ये भाजपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटला जात आहे. त्यात नितीश कुमार यांनी याआधीही बऱ्याचदा त्यांच्या राजकीय भूमिकेत बदल केला आहे. त्यामुळे बिहारमध्ये सध्या भलतीच चर्चा सुरू झाली आहे. राजदचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं की, प्रत्येक जुनी गोष्ट विसरून सोबत नवी सुरुवात करूया, प्रेम आणि आपुलकीच्या भावनेने समाजाला पुढे नेऊ असं त्यांनी सांगितले. लालू प्रसाद यादव यांचं हे विधान अप्रत्यक्षपणे राजकीय सूचक विधान आहे. विशेषत: लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार याआधी सामाजिक न्यायासाठी कधीकाळी एकत्र आले होते. 

लालू प्रसाद यादव यांच्या एका वाक्यानेच बिहारमधील राजकीय रंग दिसू लागले आहेत. लालू प्रसाद यांची थेट नितीश कुमार यांना महाआघाडी सोबत येण्याची ही ऑफर असल्याचं विश्लेषक सांगत आहेत. नितीश कुमार पुरोगामी राजकारण करतात त्यात त्यांचा मित्रपक्ष भाजपा हिंदुत्वाचा अजेंडा आणखी मजबूत करत आहे. त्यामुळे या परिस्थितीत लालू प्रसाद यादव यांनी ही सूचक ऑफर दिली आहे. काही महिन्यांपूर्वी लालू यादव यांनी नितीश कुमारांसाठी दरवाजे बंद नाहीत. त्यांच्यासाठी राजदचे दरवाजे कायम खुले आहेत असं विधान केले होते.

विविध वक्तव्यांनी चर्चेला उधाण

बिहारमधील अधिवेशनात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही नितीश कुमार कधी पलटतील आणि इथं येतील याची काही गॅरंटी नाही असं विधान केले होते. २ जानेवारीला लालू प्रसाद यादव यांनीही नितीश कुमारांसाठी आमचे दरवाजे खुले आहेत असं म्हटलं होते. पाटलीपुत्रचे खासदार मीसा भारती यांनीही राजकारणात सर्व काही शक्य आहे असं सांगितले. तर भाऊ वीरेंद्र यांनी स्पष्टपणे ते नितीश कुमार भाजपाच्या दबावात आहेत. राजकारणात कुणीही कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. राजकीय परिस्थितीचा खेळ आहे. बिहारमध्ये पुन्हा भूकंप होऊ शकतो असं विधान केले होते.

महाआघाडीच्या विजयासाठी नितीश कुमार महत्त्वाचे?

राज्यात राजकीय वर्तुळात नितीश कुमार यांच्या महाआघाडीतील प्रवेशाबाबत चर्चा सुरू आहेत. नितीश कुमार यांच्याशिवाय महाआघाडीच्या विजयावर शंका आहे. त्यामुळे महाआघाडी २०२५ ची विधानसभा निवडणुकीत पुन्हा जुन्या रणनीतीवर लढवू इच्छिते. त्यात अमित शाह यांनी बिहारचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा केंद्रीय संसदीय मंडळ ठरवेल असं म्हटलं आहे. त्यात होळी, जुमेची नमाज यावरून भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूमध्ये वाद असल्याचंही दिसून येत आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBJPभाजपा