शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार?; लालू प्रसाद यादव यांची ऑफर, भाजपाची डोकेदुखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 19:10 IST

लालू प्रसाद यादव यांच्या एका वाक्यानेच बिहारमधील राजकीय रंग दिसू लागले आहेत.

पटना - होळीच्या निमित्ताने लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या विधानामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ माजली आहे. नितीश कुमार महाआघाडीत परतण्याची चर्चा सुरू झाली आहे. लालू प्रसाद यादव यांचं विधान आणि राज्यातील वाढत्या हिंदुत्वाच्या वातावरणामुळे नितीश कुमार पुन्हा पलटी मारतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यात होळीची संधी साधून लालू प्रसाद यादव यांनी जे विधान केले त्यामुळे नितीश कुमार यांच्या महाआघाडीतील भविष्याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. 

बिहारमध्ये भाजपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटला जात आहे. त्यात नितीश कुमार यांनी याआधीही बऱ्याचदा त्यांच्या राजकीय भूमिकेत बदल केला आहे. त्यामुळे बिहारमध्ये सध्या भलतीच चर्चा सुरू झाली आहे. राजदचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं की, प्रत्येक जुनी गोष्ट विसरून सोबत नवी सुरुवात करूया, प्रेम आणि आपुलकीच्या भावनेने समाजाला पुढे नेऊ असं त्यांनी सांगितले. लालू प्रसाद यादव यांचं हे विधान अप्रत्यक्षपणे राजकीय सूचक विधान आहे. विशेषत: लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार याआधी सामाजिक न्यायासाठी कधीकाळी एकत्र आले होते. 

लालू प्रसाद यादव यांच्या एका वाक्यानेच बिहारमधील राजकीय रंग दिसू लागले आहेत. लालू प्रसाद यांची थेट नितीश कुमार यांना महाआघाडी सोबत येण्याची ही ऑफर असल्याचं विश्लेषक सांगत आहेत. नितीश कुमार पुरोगामी राजकारण करतात त्यात त्यांचा मित्रपक्ष भाजपा हिंदुत्वाचा अजेंडा आणखी मजबूत करत आहे. त्यामुळे या परिस्थितीत लालू प्रसाद यादव यांनी ही सूचक ऑफर दिली आहे. काही महिन्यांपूर्वी लालू यादव यांनी नितीश कुमारांसाठी दरवाजे बंद नाहीत. त्यांच्यासाठी राजदचे दरवाजे कायम खुले आहेत असं विधान केले होते.

विविध वक्तव्यांनी चर्चेला उधाण

बिहारमधील अधिवेशनात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही नितीश कुमार कधी पलटतील आणि इथं येतील याची काही गॅरंटी नाही असं विधान केले होते. २ जानेवारीला लालू प्रसाद यादव यांनीही नितीश कुमारांसाठी आमचे दरवाजे खुले आहेत असं म्हटलं होते. पाटलीपुत्रचे खासदार मीसा भारती यांनीही राजकारणात सर्व काही शक्य आहे असं सांगितले. तर भाऊ वीरेंद्र यांनी स्पष्टपणे ते नितीश कुमार भाजपाच्या दबावात आहेत. राजकारणात कुणीही कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. राजकीय परिस्थितीचा खेळ आहे. बिहारमध्ये पुन्हा भूकंप होऊ शकतो असं विधान केले होते.

महाआघाडीच्या विजयासाठी नितीश कुमार महत्त्वाचे?

राज्यात राजकीय वर्तुळात नितीश कुमार यांच्या महाआघाडीतील प्रवेशाबाबत चर्चा सुरू आहेत. नितीश कुमार यांच्याशिवाय महाआघाडीच्या विजयावर शंका आहे. त्यामुळे महाआघाडी २०२५ ची विधानसभा निवडणुकीत पुन्हा जुन्या रणनीतीवर लढवू इच्छिते. त्यात अमित शाह यांनी बिहारचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा केंद्रीय संसदीय मंडळ ठरवेल असं म्हटलं आहे. त्यात होळी, जुमेची नमाज यावरून भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूमध्ये वाद असल्याचंही दिसून येत आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBJPभाजपा