शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

"भारताच्या उभारणीसाठी आणखी कठोर मेहनत करत राहू!"पंतप्रधान मोदी यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 06:41 IST

गरीबांचे जीवन उंचावल्याचा दावा

नवी दिल्ली : ‘आपल्या प्रत्येक निर्णयामागे लोकांचे जीवन सुधारण्याची इच्छा हेच एक कारण आहे. आज आम्ही देशाच्या सेवेला नऊ वर्षे पूर्ण करीत आहोत. मी कृतज्ञ आणि आभारी आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी आम्ही आणखी कठोर परिश्रम करत राहू,’ अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील त्यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल व्यक्त केली.

सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांशी संबंधित आकडेवारी मांडताना मोदींनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटले की, “गेल्या ९ वर्षांत आम्ही भारतातील सर्वांत गरीब लोकांचे जीवनमान उंचावण्याचा आणि त्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला. अनेक उपक्रमांद्वारे आम्ही लाखो लोकांचे जीवन बदलले. प्रत्येक नागरिकाच्या उन्नतीसाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे आमचे ध्येय निरंतर आहे.”

दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लिहिलेला लेख शेअर केला.सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने प्रचाराचे नियोजन केले आहे. पंतप्रधान मोदी बुधवारी राजस्थानमधील अजमेर येथे सभेला संबोधित करणार आहेत. केंद्रीय मंत्री आणि काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देशभरात केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकला. देशातील प्रत्येक राज्यात आयोजित पत्रकार परिषदांमध्ये सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आला. 

‘शेवटच्या माणसापर्यंत लाभ मिळणार’‘मोदी सरकारने नऊ वर्षांच्या कार्यकाळात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मोदी यांनी त्यांच्या धोरणांमध्ये ‘अंत्योदय’ आणि सेवेचा संकल्प सर्वोपरी ठेवला आहे आणि त्यांचे सरकार हे सुनिश्चित करत आहे की कल्याणकारी योजनांचा लाभ रांगेतील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले. ,

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डाAmit Shahअमित शाह