शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

"भारताच्या उभारणीसाठी आणखी कठोर मेहनत करत राहू!"पंतप्रधान मोदी यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 06:41 IST

गरीबांचे जीवन उंचावल्याचा दावा

नवी दिल्ली : ‘आपल्या प्रत्येक निर्णयामागे लोकांचे जीवन सुधारण्याची इच्छा हेच एक कारण आहे. आज आम्ही देशाच्या सेवेला नऊ वर्षे पूर्ण करीत आहोत. मी कृतज्ञ आणि आभारी आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी आम्ही आणखी कठोर परिश्रम करत राहू,’ अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील त्यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल व्यक्त केली.

सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांशी संबंधित आकडेवारी मांडताना मोदींनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटले की, “गेल्या ९ वर्षांत आम्ही भारतातील सर्वांत गरीब लोकांचे जीवनमान उंचावण्याचा आणि त्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला. अनेक उपक्रमांद्वारे आम्ही लाखो लोकांचे जीवन बदलले. प्रत्येक नागरिकाच्या उन्नतीसाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे आमचे ध्येय निरंतर आहे.”

दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लिहिलेला लेख शेअर केला.सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने प्रचाराचे नियोजन केले आहे. पंतप्रधान मोदी बुधवारी राजस्थानमधील अजमेर येथे सभेला संबोधित करणार आहेत. केंद्रीय मंत्री आणि काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देशभरात केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकला. देशातील प्रत्येक राज्यात आयोजित पत्रकार परिषदांमध्ये सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आला. 

‘शेवटच्या माणसापर्यंत लाभ मिळणार’‘मोदी सरकारने नऊ वर्षांच्या कार्यकाळात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मोदी यांनी त्यांच्या धोरणांमध्ये ‘अंत्योदय’ आणि सेवेचा संकल्प सर्वोपरी ठेवला आहे आणि त्यांचे सरकार हे सुनिश्चित करत आहे की कल्याणकारी योजनांचा लाभ रांगेतील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले. ,

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डाAmit Shahअमित शाह