शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"भारताच्या उभारणीसाठी आणखी कठोर मेहनत करत राहू!"पंतप्रधान मोदी यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 06:41 IST

गरीबांचे जीवन उंचावल्याचा दावा

नवी दिल्ली : ‘आपल्या प्रत्येक निर्णयामागे लोकांचे जीवन सुधारण्याची इच्छा हेच एक कारण आहे. आज आम्ही देशाच्या सेवेला नऊ वर्षे पूर्ण करीत आहोत. मी कृतज्ञ आणि आभारी आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी आम्ही आणखी कठोर परिश्रम करत राहू,’ अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील त्यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल व्यक्त केली.

सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांशी संबंधित आकडेवारी मांडताना मोदींनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटले की, “गेल्या ९ वर्षांत आम्ही भारतातील सर्वांत गरीब लोकांचे जीवनमान उंचावण्याचा आणि त्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला. अनेक उपक्रमांद्वारे आम्ही लाखो लोकांचे जीवन बदलले. प्रत्येक नागरिकाच्या उन्नतीसाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे आमचे ध्येय निरंतर आहे.”

दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लिहिलेला लेख शेअर केला.सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने प्रचाराचे नियोजन केले आहे. पंतप्रधान मोदी बुधवारी राजस्थानमधील अजमेर येथे सभेला संबोधित करणार आहेत. केंद्रीय मंत्री आणि काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देशभरात केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकला. देशातील प्रत्येक राज्यात आयोजित पत्रकार परिषदांमध्ये सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आला. 

‘शेवटच्या माणसापर्यंत लाभ मिळणार’‘मोदी सरकारने नऊ वर्षांच्या कार्यकाळात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मोदी यांनी त्यांच्या धोरणांमध्ये ‘अंत्योदय’ आणि सेवेचा संकल्प सर्वोपरी ठेवला आहे आणि त्यांचे सरकार हे सुनिश्चित करत आहे की कल्याणकारी योजनांचा लाभ रांगेतील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले. ,

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डाAmit Shahअमित शाह