शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा
3
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
4
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
5
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
6
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
7
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
8
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
9
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
10
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
11
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
12
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
13
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
14
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
15
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
16
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
17
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
18
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
19
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
20
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती

लोकशाहीतील बदल प्रत्येक पक्षासाठी धडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 05:11 IST

सतराव्या लोकसभेसाठी पार पडलेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत.

- राजेश बादलसतराव्या लोकसभेसाठी पार पडलेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. पहिल्यांदा बिगर काँग्रेस पक्षाला दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळाले आहे. देशाची लोकशाही आता नवे वळण घेत आहे, असे म्हणता येईल. या अभूतपूर्व जनादेशाने कोणता संदेश दिला आणि त्यातून काय धडा घेता येईल? आधी भाजपबद्दल बोलू या!भाजपच्या अभूतपूर्व विजयाची तीन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे ‘मतदाराचे मत थेट त्याच्या खात्यात जाईल,’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभांमध्ये केलेल्या आवाहनाचा विलक्षण परिणाम झाला. स्थानिक उमेदवारावरचा राग आणि नापसंती बाजूला पडली. दुसरे, मोदींना आणखी एक कार्यकाळ दिला पाहिजे, या बाजूने बहुमत पडले. तीन राज्यांतील पराभवानंतर मोदींनी जेव्हा राष्टÑवाद आणि भाजपने सांप्रदायिक ध्रुवीकरणाची कास धरली तेव्हा विकासाचा मुद्दा आणि देशातील गंभीर प्रश्न मागे पडले होते. आता नरेंद्र मोदी यांना ढासळणारी अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी आणि पायाभूत संरचना यावर लक्ष द्यावेच लागणार आहे.तिसरी बाब अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ‘मिलावटी’ आणि ‘महामिलावटी’ पक्ष आघाडी कमजोर करतात, यावर मोदी यांनी आपल्या प्रत्येक सभेत भर दिला आहे. (तथापि, हे शब्द त्यांनी विरोधकांसाठी वापरले होते.) त्यामुळे भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करण्याची संधी मिळणे, हे आदर्शवत ठरेल. असे झाले तर नितीशकुमार यांच्यासारख्या सहकाºयाने राम मंदिर मुद्द्यावर आक्षेप घेतले तरी त्याचा आदर करण्याचा दबाव असणार नाही. भाजपला आता राम मंदिर, कलम ३७० आणि ३५ ए यासारख्या मुद्द्यांकडेही लक्ष द्यावे लागेल.हे निवडणूक निकाल काँग्रेससाठीही धोक्याचा इशारा ठरले आहेत. हा सर्वात जुना पक्ष परिवर्तनाच्या अवस्थेतून मार्गक्रमण करीत आहे. दीड वर्षापूर्वी एका तरुण नेतृत्वाने या पक्षाची धुरा सांभाळली आहे. काँग्रेसला आपल्या पराभवाची कारणे शोधावी लागतील आणि आपल्या प्राधान्यक्रमाशी देशाच्या प्राधान्यक्रमासोबत जोडावे लागेल. नव्या आणि जुन्या पिढीमधील अंतर्विरोध या निवडणुकीत पाहायला मिळाला. आता नव्या रक्ताला पूर्ण संधी मिळाली पाहिजे. पक्ष संघटनेतील उणिवा आणि दुर्बलतेवर मात करण्यासाठी पाच वर्षे पुरेशी आहेत. एवढेच नव्हे तर संपूर्ण वर्षभर निवडणुकीसाठी तयार असणाºया एका रचनात्मक काँग्रेसची आज गरज आहे.शेवटी, निवडणूक प्रचारात भाषा आणि आक्रोशाची अभिव्यक्ती मर्यादित असली पाहिजे, याकडेही काँग्रेसला लक्ष द्यावे लागेल. जरी भाजपने या बाबींचा अतिरेक केला असला तरी काँग्रेसने त्यापासून दूर राहिले पाहिजे. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरुद्ध भाजपने निंदनीय मोहीम राबविली. भाजपनेच राजीव गांधी यांना ‘चोर’ संबोधले होते. भाजपने अशी असभ्य मोहीम उघडली तेव्हा त्याचे नुकसानच झाले. काँग्रेसने ‘चौकीदार चोर है’ हा शब्दप्रयोग करायला नको होता. मोदींच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करायचाच होता तर ते इतर अनेक मार्गांनी करता आले असते. हे काँग्रेसच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे.प्रादेशिक पक्षांसाठीही १७ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल धडा देणारे आहेत. जाती आणि पोटजातीच्या समीकरणावर राजकीय पोळी शेकण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. त्यांना आता राष्टÑीय मुद्द्यांवर गांभीर्याने विचारविमर्श करावा लागेल.(राजकीय विश्लेषक)