शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

बहुतांश स्टार्टअप कंपन्यांत दहापेक्षाही कमी कर्मचारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 06:54 IST

आरबीआयच्या सर्वेक्षणाचा अहवाल; तीन टक्क्यांकडेच १00हून अधिक मनुष्यबळ

मुंबई : स्टार्टअप कंपन्यांद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. पण केवळ १४ टक्के स्टार्टअप कंपन्यांनीच पहिल्या सहा महिन्यांत १0 पेक्षा अधिक कर्मचारी ठेवल्याचे आढळले आहे. व्यवसाय परिपक्व झाल्यानंतरही सुमारे ६0 टक्के स्टार्टअप कंपन्यांकडे १0 पेक्षा कमीच कर्मचारी काम करत आहेत.रिझर्व्ह बँकेने स्टार्टअप क्षेत्राबाबत केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. यात देशातील १,२४६ कंपन्यांचा अभ्यास केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, केवळ ३ टक्के स्टार्टअप कंपन्यांकडे १00 पेक्षा जास्त कर्मचारी कामावर आहेत.६३ टक्के कंपन्यांनी आगामी दोन ते तीन वर्षांत २0 नवे कर्मचारी भरण्याचा इरादा बोलून दाखविला. बहुतांश स्टार्टअप कंपन्या सॉफ्टवेअर विकास, आयटी सल्ला/समाधान तसेच आरोग्य सेवा क्षेत्रातील असून, त्या तीन वर्षांमध्ये सुरू झालेल्या आहेत.रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २0१८ आणि एप्रिल २0१९ या कालावधीत हे सर्वेक्षण केले. त्यातून महत्त्वाचे वैशिष्ट्य असे समोर आले की, ७५ टक्के कंपन्या कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्ली आणि तामिळनाडू या पाच राज्यांतच केंद्रित आहेत.सहा क्षेत्रांमध्ये अधिक कंपन्यास्टार्टअप स्थापन करणाऱ्यांपैकी एकतृतीयांश लोक अभियांत्रिकी शाखेचे आहेत. बहुतांश संस्थापकांना व्यावसायिक अनुभव आहे. ७.३ टक्के संस्थापक विद्यार्थी आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या स्टार्टअप कंपन्यांपैकी सुमारे ५0 टक्के कंपन्या कृषी, डाटा व विश्लेषण, शिक्षण, आरोग्य, आयटी सल्ला/समाधान आणि वस्तू उत्पादन या सहा क्षेत्रांतील आहेत. बहुतांश स्टार्टअपमध्ये दोन संस्थापक आहेत.

टॅग्स :Employeeकर्मचारीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक