शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बहुतांश स्टार्टअप कंपन्यांत दहापेक्षाही कमी कर्मचारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 06:54 IST

आरबीआयच्या सर्वेक्षणाचा अहवाल; तीन टक्क्यांकडेच १00हून अधिक मनुष्यबळ

मुंबई : स्टार्टअप कंपन्यांद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. पण केवळ १४ टक्के स्टार्टअप कंपन्यांनीच पहिल्या सहा महिन्यांत १0 पेक्षा अधिक कर्मचारी ठेवल्याचे आढळले आहे. व्यवसाय परिपक्व झाल्यानंतरही सुमारे ६0 टक्के स्टार्टअप कंपन्यांकडे १0 पेक्षा कमीच कर्मचारी काम करत आहेत.रिझर्व्ह बँकेने स्टार्टअप क्षेत्राबाबत केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. यात देशातील १,२४६ कंपन्यांचा अभ्यास केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, केवळ ३ टक्के स्टार्टअप कंपन्यांकडे १00 पेक्षा जास्त कर्मचारी कामावर आहेत.६३ टक्के कंपन्यांनी आगामी दोन ते तीन वर्षांत २0 नवे कर्मचारी भरण्याचा इरादा बोलून दाखविला. बहुतांश स्टार्टअप कंपन्या सॉफ्टवेअर विकास, आयटी सल्ला/समाधान तसेच आरोग्य सेवा क्षेत्रातील असून, त्या तीन वर्षांमध्ये सुरू झालेल्या आहेत.रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २0१८ आणि एप्रिल २0१९ या कालावधीत हे सर्वेक्षण केले. त्यातून महत्त्वाचे वैशिष्ट्य असे समोर आले की, ७५ टक्के कंपन्या कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्ली आणि तामिळनाडू या पाच राज्यांतच केंद्रित आहेत.सहा क्षेत्रांमध्ये अधिक कंपन्यास्टार्टअप स्थापन करणाऱ्यांपैकी एकतृतीयांश लोक अभियांत्रिकी शाखेचे आहेत. बहुतांश संस्थापकांना व्यावसायिक अनुभव आहे. ७.३ टक्के संस्थापक विद्यार्थी आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या स्टार्टअप कंपन्यांपैकी सुमारे ५0 टक्के कंपन्या कृषी, डाटा व विश्लेषण, शिक्षण, आरोग्य, आयटी सल्ला/समाधान आणि वस्तू उत्पादन या सहा क्षेत्रांतील आहेत. बहुतांश स्टार्टअपमध्ये दोन संस्थापक आहेत.

टॅग्स :Employeeकर्मचारीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक