विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी आज सोडत
By Admin | Updated: August 14, 2015 22:54 IST2015-08-14T22:54:11+5:302015-08-14T22:54:11+5:30
नवी मुुंबई : विमानतळ प्रकल्पाकरिता पुनर्वसन व पुर्नस्थापन योजनेअंतर्गत भूखंड वाटपाची संगणकीय सोडत १५ ऑगस्टला होणार आहे. कोल्ही, कोपर, वाघिवली वाडा, वरचे ओवळे, उलवे, तरघर, कोंबडभुजे, गणेशपुरी व वाघिवली या गावांसाठी ही सोडत होणार आहे. एकूण ७४३ भूखंडांची सोडत होणार आहे. यासाठी सिडकोच्या प्रणाली विभागाने खास संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीची वैधता भारत सरकारच्या संवाद व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एसटीक्यूसी पुणेच्या वतीने चाचणी घेऊन प्रमाणित करण्यात आली आहे. यावेळी निवृत्त न्यायाधीश एम.एन. कुलकर्णी, एस. डी. धर्माधिकारी, जयप्रकाश सोनी उपस्थित राहणार आहेत.

विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी आज सोडत
न ी मुुंबई : विमानतळ प्रकल्पाकरिता पुनर्वसन व पुर्नस्थापन योजनेअंतर्गत भूखंड वाटपाची संगणकीय सोडत १५ ऑगस्टला होणार आहे. कोल्ही, कोपर, वाघिवली वाडा, वरचे ओवळे, उलवे, तरघर, कोंबडभुजे, गणेशपुरी व वाघिवली या गावांसाठी ही सोडत होणार आहे. एकूण ७४३ भूखंडांची सोडत होणार आहे. यासाठी सिडकोच्या प्रणाली विभागाने खास संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीची वैधता भारत सरकारच्या संवाद व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एसटीक्यूसी पुणेच्या वतीने चाचणी घेऊन प्रमाणित करण्यात आली आहे. यावेळी निवृत्त न्यायाधीश एम.एन. कुलकर्णी, एस. डी. धर्माधिकारी, जयप्रकाश सोनी उपस्थित राहणार आहेत.