शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

द्वेष करणे सोडा, सोशल मीडिया नको - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 07:07 IST

‘द्वेष करणे सोडा, सोशल मीडिया अकाऊंटस् नाही’ अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याच्या व्यक्त केलेल्या विचारांवर सोमवारी टीका केली.

नवी दिल्ली : ‘द्वेष करणे सोडा, सोशल मीडिया अकाऊंटस् नाही’ अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याच्या व्यक्त केलेल्या विचारांवर सोमवारी टीका केली. मोदींनी केलेले ट्विट टॅग करीत राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, ‘द्वेष करणे सोडा, सोशल मीडिया अकाऊंटस् नको.’ काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही टि्वटरवर म्हटले आहे की, ‘आदरणीय मोदीजी, तुमच्या नावाने ज्या लोकांची टोळी प्रत्येक क्षणाला वाईट भाषा वापरते, धमक्या देते, त्रास देते त्यांना हा सल्ला द्या.’अमृता फडणवीसही सोशल मीडियापासून दूर जाणारसोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असणाऱ्या अमृता फडणवीस यांनीही सोशल मीडिया सोडण्याचा विचार असल्याचे ट्विट केले. सोशल मीडिया सोडण्याबाबतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट शेअर करीत अमृता फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. काही छोटे निर्णय आयुष्य बदलू शकतात, असेही त्या म्हणाल्या.

तत्पूर्वी सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असलेल्या व जगभरात कोट्यवधी ‘फॉलोअर्स’ असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजमाध्यमांना सोडचिठ्ठी देण्याचा धक्कादायक इरादा सोमवारी रात्री अचानक जाहीर केला. समाजमाध्यमांच्या वापराच्या बाबतीत मोदींची तत्परता व चपखलता हा नेहमीच चर्चेचा व कौतुकाचा विषय आहे. असे असूनही जनतेशी संवाद साधण्याच्या या प्रभावी माध्यमांतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा विचार त्यांनी का केला, हे समजू शकलेले नाही. रात्री ८.५२ वाजता हा धक्का देताना मोदी यांनी लिहिले की, टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडियावरील माझी अकाउंट्स येत्या रविवारपासून बंद करण्याचा विचार करत आहे. याविषयी पुढील माहिती नंतर देईन, असंही मोदींनी सांगितलं आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीSocial Mediaसोशल मीडिया