कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याने घेतले विष
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:02+5:302015-03-20T22:40:02+5:30
कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याने घेतले विष

कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याने घेतले विष
क ्जबाजारी शेतकरी दाम्पत्याने घेतले विषबीड : पतीचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंजआष्टी (जि. बीड) : डोक्यावर दीड लाखाचे कर्ज... मेहनतीने शेतात कांदा लागवड केली... पीक चांगले आले; पण अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे निराश झालेल्या पती- पत्नीने विषारी द्रव प्राशन केले. पतीचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री मृत्यू झाला तर पत्नीची मृत्यूशी झुंज सुरु आहे. ही हृद्रयद्रावक घटना वेताळवाडी येथे घडली.परमेश्वर संतराम काकडे (३०) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. त्यांची पत्नी वैशाली हिच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना सात एकर शेती असून खरीप हंगामात पावसाअभावी मोठे नुकसान सहन करावे लागले होते. बी- बियाणासाठी खासगी सावकाराकडून त्यांनी दीड लाखाचे कर्ज घेतले होते. रबीमध्ये त्यांनी तीन एकरवर कांदा लागवड केली होती. पीकही जोमात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला. त्यामुळे हातातांेडाशी आलेले पीक वाया गेले. कांद्यांना चिरा पडल्या व नंतर तो सडला. कांदा हातचा गेल्याने कर्ज फेडायचे कसे, ही चिंता काकडे दाम्पत्याना सतावत होती. (वार्ताहर)़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़कांद्याच्या ढिगार्यावरच घेतले विषकाकडे दाम्पत्यांनी सडलेला कांदा गोळा करुन ढिग साठवला होता. गुरुवारी दोघेही शेतात होते. सायंकाळच्या सुमारास परमेश्वर काकडे यांनी कांद्याच्या ढिगावरच विषारी द्रव प्राशन केले. ते चक्कर येऊन तेथेच कोसळले. पतीने विष घेतल्याचे पाहून पत्नी वैशाली यांनीही विषारी द्रव पिले. दोघेही तासभर तेथेच पडलेले होते. रात्री नातेवाईक त्यांना शोधत शेतात आले तेव्हा हा प्रकार पुढे आला.