विधायक कार्याचा वसा घेतलेला नेता : ब्रादेवदादा माने लोकनेते स्व. ब्रादेवदादा माने यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज (सोमवारी) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:06+5:302015-08-02T22:55:06+5:30
राजकारण, सहकार व शैक्षणिक कार्यात लोकनेत्यांनी समाजहिताला प्राधान्य देऊन दूरदृष्टीने, नि:स्वार्थीपणे काम केले पाहिजे, असा विचार महात्मा फुले यांच्या समतेच्या बांधीलकीतून पुढे आला. सोलापूरचे ब्रादेवदादा माने यांचे वर्तन राजकारणात राहूनही काहीअंशी महात्मा फुल्यांच्या विचारांशी मिळतेजुळते होते.

विधायक कार्याचा वसा घेतलेला नेता : ब्रादेवदादा माने लोकनेते स्व. ब्रादेवदादा माने यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज (सोमवारी) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार
र जकारण, सहकार व शैक्षणिक कार्यात लोकनेत्यांनी समाजहिताला प्राधान्य देऊन दूरदृष्टीने, नि:स्वार्थीपणे काम केले पाहिजे, असा विचार महात्मा फुले यांच्या समतेच्या बांधीलकीतून पुढे आला. सोलापूरचे ब्रादेवदादा माने यांचे वर्तन राजकारणात राहूनही काहीअंशी महात्मा फुल्यांच्या विचारांशी मिळतेजुळते होते. जात व धर्माच्या जाणिवा असलेल्या संघटना ब्रादेवदादा माने यांना राजकारणात मान्य नव्हत्या. कोणत्याही दगडाला शेंदूर फासून त्याच्यात देवपण शोधणार्यांपैकी दादा नव्हते. परिश्रमपूर्वक जनसेवा व जनसंपर्काच्या माध्यमातून कार्यकर्ता सचोटीला उतरला तरच समाजाने त्याची कदर केली पाहिजे, असा दादांचा आग्रह असायचा. तोच आग्रह राजकारण निरोगी करण्याला उपयोगी पडतो. ब्रादेवदादा माने यांचे नेतृत्व आणि कार्यकर्तृत्व स्वत:च्या पायावर उभे राहून साध्य झालेले आहे. कोणाच्या आशीर्वादाने त्यांनी राजकारणात प्रवेश केला नाही की, राजकारणातली त्यांची एंट्री अपघात नाही. समाजाच्या सेवेतून त्यांचे नेतृत्व पुढे आले. राजकारणात स्थिरावले आणि विचाराने ते नेतृत्व बहरत राहिले. एखाद्या नेत्याची कार्यपद्धती व विचारसरणी जनहिताच्या विरोधी असेल तर त्याविरोधी दादा उघडपणे भूमिका घेत असत. कर काँग्रेसवादी असूनही दादांनी अनेकदा काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. १९७१ साली लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. निवडणूक प्रचाराची टिळक चौकात मोठी सभा झाली. या सभेत दादांनी रंगाअण्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे धाडस दाखवले. त्या निवडणुकीत त्यांनी अपार कष्ट घेतले. नवखे असूनही ग्रामीण भागात झंझावाती दौरे करीत काँग्रेसच्या विरोधात रान उठवले. त्यांचा पिंड मुळात काँग्रेसचा. तरीही अन्याय झाला की, पक्षाच्या विरोधात ते पेटून उठत असत. १९६७ साली दादांचे नातलग राजाराम ढवळे यांना काँग्रेसने विधानसभेची उमेदवारी दिली. उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ब्रादेवदादांकडे आग्रह धरीत निवडणूक रिंगणात उतरवले. त्यांचे बंड यशस्वी ठरले. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेससोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या काळात अनेकदा अशा घटना त्यांच्याबाबत घडल्या. राजकीय क्षेत्रातील व्यक्तीने रचनात्मक काम उभे करावे, अशी अपेक्षा असते. अशा रचनात्मक कामाचा राजकीय लाभ जरी त्या व्यक्तीला होण्याची शक्यता असली तरी त्या कार्याचा तो हेतू असू नये. अशी विचारसरणी ब्रादेवदादांची होती. त्यांनी स्वत:च्या गावी कुमठे येथे आपल्या रचनात्मक कामाचा डोंगर उभारला आहे. बालवाडीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण एका छताखाली देणारी शिक्षण संस्था दादांनी कुमठ्यात उभी केली आहे. अनेक नेते शहरात राहून गावाची काळजी करतात. परंतु ब्रादेवदादा माने यांची नाळ कुमठ्याशी अखेरपर्यंत जोडलेली राहिली. त्यांच्यामुळे गावाला नवी ओळख मिळाली. साधा, सरळमार्गी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी धडपडणारा नेता अशी ब्रादेवदादांची जिल्ाला ओळख होती. त्यांचा स्पष्टवक्तेपणा कधी कधी अडचणीचा ठरायचा. त्यामुळे राजकारणापेक्षा समाजकारणात दादा अधिक रमले. शेती त्यांचा जीव की प्राण. सूर्योदयापूर्वी शेतात जाऊन कामाचे नियोजन करायचे. सकाळपासून कार्यकर्त्यांची त्यांना भेटण्यासाठी शेतात रीघ लागायची. आधी काम करा आणि मग राजकारण करा, तरच येणारा काळ तुमचा राहील, असा सल्ला ते देत असत. त्यामुळेच निरुद्योगी माणसे दादांच्या जवळ जायला कचरत असत. यशवंत बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे संसार उभे केले. गरजूंना मदतीचा हात दिला. पैशांअभावी शिक्षण खंडित केलेल्या तरुणांना त्यांनी बँकेकडून कर्ज दिले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वत:च्या शिक्षण संस्थेत नोकरी दिली. जात पाहून नव्हे तर गरज पाहून बँकेत, शिक्षण संस्थेत ते सामावून घेत असत. त्यांचा कनवाळूपणा कधी कधी अडचणीचा ठरायचा. परंतु त्यांनी कधी कशाची फिकीर केली नाही. राजकारणात राहून समाजहित साधणारा हा ग्रामीण नेता होता.