शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

लय भारी... रिक्षाचालकाने लावला भन्नाट शोध, आता दुचाकीही गॅसवर धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 09:01 IST

उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यातील कैथवा गावांत राहणारा दिनेश दिल्लीत सीएनजी ऑटो रिक्षा चालवत होता

जालौन - देशात होत असलेल्या इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. वाहनचालकांच्या खिशाला मोठा आर्थिक भार पडला आहे. त्यामुळे, इलेक्ट्रीक वाहनांना प्राधान्य देत दुचाकी वाहनांच्या खरेदीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर, अनेकजण नाना प्रयोग करुन पेट्रोलपासून सुटका होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एका 5 वी शिकलेल्या युवकाने पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकचे रुपांतर चक्क गॅसवर केले आहे. विशेष म्हणजे 1 किलो गॅसमध्ये ही बाईक 100 किमी अंतर पार करते, असा दावाही त्याने केला आहे. 

उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यातील कैथवा गावांत राहणारा दिनेश दिल्लीत सीएनजी ऑटो रिक्षा चालवत होता. त्यामुळे, जर मोठे वाहन गॅसवर चालत असेल तर दुचाकी का चालू शकत नाही? असा प्रश्न त्याच्या मनात आला. त्यातूनच सुरु झाला, या नव्या संशोधनाचा प्रवास. त्यानंतर दिनेशने यासंबंधीत माहिती घेत अनेकांच्या गाठीभेट, गॅरेजवाल्यांचाही सल्ला घेतला. अखेर, मनातील संकल्पना सत्यात उतरविण्यात दिनेशला यश आले आणि त्याने गॅसवर धावणारी दुचाकी निर्माण केली. त्यामुळे, हा नवीन शोध लोकांना नक्कीच दिलासा देणारी आहे. 

दिनेशने आपल्या स्वत:च्या दुचाकी बाईकवरच हा प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे पेट्रोल दरवाढीच्या सध्याच्या काळात गॅसवर चालणारी ही दुचाकी 100 किमीचा मायलेज देत आहे. 1 किलो गॅसमध्ये 100 किमीचा प्रवास प्रवाशांना करता येईल. दिनेश हे यापूर्वी दिल्लीत रिक्षा चालवत असे, पण काही वर्षांपूर्वी ते गावी परतले आणि त्यांनी मनातील ही कल्पना सत्यात उतरविण्यासाठी धडपड सुरु केली. यासाठी गाडीला एक गॅसकीट बसविण्यात आले आहे. ते गॅसकीट सहसा बाजारात उपलब्ध होत नाही, त्यामुळे ते बाहेरुन मागविण्यात आले होते, असेही दिनेशने सांगितले. 

टॅग्स :Petrolपेट्रोलauto rickshawऑटो रिक्षाUttar Pradeshउत्तर प्रदेशAutomobile Industryवाहन उद्योग