शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

बिहारमध्ये पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजप नेत्याचा मृत्यू, सभागृहात निदर्शने केल्यानंतर मोर्चा काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 14:56 IST

बिहार विधानसभेत गुरुवारी गोंधळ झाला. भाजपने राज्य सरकारविरोधात मोर्चा काढला.

आज बिहार विधानसभेत मोठा गोंधळ निर्माण झाला. भाजप आमदारांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन केलं. यानंतर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांवर लाठीचार्ज केला. या घटनेत एका भाजप नेत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाटणा येथील डाकबंगला चौकात पोलिसांनी बळाचा वापर केल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. जहानाबाद शहरात झालेल्या लाठीचार्जमध्ये भाजपचे सरचिटणीस विजय कुमार सिंह यांचा मृत्यू झाला आहे. 

पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये विजय जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी याप्रकरणी नितीश सरकारला घेरले आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट केले आहे. नड्डा म्हणाले, पाटण्यात भाजप कार्यकर्त्यांवर झालेला लाठीचार्ज हा राज्य सरकारच्या अपयशाचा आणि रागाचा परिणाम आहे. भ्रष्टाचाराचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी महाआघाडीचे सरकार लोकशाहीवर आघात करत आहे, बिहारच्या मुख्यमंत्र्यांनाही नैतिकतेचा विसर पडून आरोपपत्र झालेल्या व्यक्तीला वाचवले आहे.

टोमॅटोचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारचा एकतर्फी हस्तक्षेप निषेधार्ह; किसान सभेचा हल्लाबोल

याआधी गुरुवारी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. शिक्षकांच्या नियुक्तीचा मुद्दा उपस्थित झाल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली. भाजप सदस्यांनी वेल येथे पोहोचून सरकारला घेराव घातला आणि निदर्शने केली, त्यानंतर भाजपच्या दोन आमदारांना विधानसभेतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रॅली काढणाऱ्या आमदार आणि नेत्यांवर पोलिसांनी लाठीमार केला.

नितीश सरकारच्या विरोधात भाजपने गुरुवारी विधानसभेत मोर्चा काढला आहे. विधानसभेचे कामकाज सुरू होताच भाजप आमदारांनी सभागृहात गदारोळ सुरू केला. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना बडतर्फ करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. भाजपने भ्रष्टाचार, रोजगार आणि शिक्षक नियुक्तीवर प्रश्न उपस्थित करत सभागृहाची वेल गाठली. 

भाजपने विधानसभेतून सभात्याग केला, नंतर भाजप आमदार जीवेश मिश्रा आणि शैलेंद्र यांना सभापतींच्या सूचनेवरून सभागृहाबाहेर हाकलण्यात आले. मार्शल्सनी दोन्ही आमदारांना बाहेर काढले. सत्ताधारी पक्षासाठी एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप दोघांनी सभापतींवर केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते विजयकुमार सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सर्व आमदारांनी विधानसभेतून सभात्याग केला.

सभागृहातून बाहेर पडल्यानंतर भाजपचे आमदार आधी धरणे धरून बसले आणि नंतर गांधी मैदानाकडे रवाना झाले. नंतर भाजपने गांधी मैदानातून विधानसभेपर्यंत पदयात्रा सुरू केली. यावेळी पोलिसांनी डाक बंगला चौकात भाजप नेत्यांवर लाठीमार केला.

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपा