शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"UPSC मध्ये लॅटरल एन्ट्री चुकीची" चिराग पासवान 'लॅटरल एंट्री'वर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 23:29 IST

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सोमवारी 'लॅटरल एंट्री'द्वारे सरकारी पदांवर नियुक्तीबाबात प्रतिक्रिया दिली. हा मुद्दा केंद्राकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सोमवारी १९ ऑगस्ट रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगमध्ये लॅटर एंट्रीला विरोध केला आहे. दरम्यान, त्यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारबरोबर बोलणार असल्याचे सांगितले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने १७ ऑगस्ट रोजी एक जाहिरात जारी केली होती, यात केंद्र सरकारच्या २४ मंत्रालयांमध्ये संयुक्त सचिव, संचालक आणि उपसचिव या पदांवर लक्ष्यभरतीसाठी प्रतिभावान आणि प्रेरित भारतीय नागरिकांकडून अर्ज मागवले होते. नोकरशाहीतील ४५ पदांवर लॅटरल एंट्रीवर टीका करणारे चिराग पासवान हे एनडीएचे सरकारमधील घटक पक्षातील नेते आहेत. 

'Lateral Entry' म्हणजे काय रे भाऊ..; कशी होते सरकारी पदांवर थेट नियुक्ती? जाणून घ्या

लॅटरल एंट्रीवर बोलताना पासवान म्हणाले, LJP अशा नियुक्त्यांच्या बाजूने नाही.'जिथे सरकारी नियुक्त्या केल्या जातात तेथे आरक्षणाच्या तरतुदींचे पालन केले पाहिजे. ही बाब ज्या प्रकारे समोर आली आहे ती चिंतेची बाब आहे, कारण त्यांचा पक्ष सरकारचा भाग आहे आणि त्यांच्याकडे हे मुद्दे समोर आणण्याचे व्यासपीठ आहे.

चिराग पासवान म्हणाले, "अशा नियुक्त्यांबाबत माझ्या पक्षाची भूमिका अगदी स्पष्ट आहे. जिथे सरकारी नियुक्त्या केल्या जातात तिथे आरक्षणाच्या तरतुदींचे पालन केले पाहिजे. आमच्या पक्षाच्या वतीने बोलायचे तर आम्ही याच्या बाजूने नाही." पूर्णपणे चुकीचे आहे आणि मी हे प्रकरण सरकारकडे मांडणार आहे.

दरम्यान, आज काँग्रेसने लॅटरल एंट्रीच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी याला दलित, ओबीसी आणि आदिवासींवर हल्ला म्हटले. गांधी म्हणाले, 'भाजपचे रामराज्याचे विकृत रूप संविधान नष्ट करण्याचा आणि बहुजनांचे आरक्षण हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते, असा आरोप केला. 

लॅटरल एंट्री म्हणजे काय?

UPSC मध्ये लॅटरल एंट्री 2018 मध्ये सुरू झाली. याला डायरेक्ट अपॉइंटमेंट म्हणतात. 2017 मध्ये केंद्र सरकारने नोकरशाहीमध्ये नागरी सेवा परीक्षेद्वारे नियुक्ती करण्याव्यतिरिक्त, लॅटरल एंट्रीद्वारे वरिष्ठ पदांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा विचार केला पाहिजे, असे म्हटले होते. खासगी क्षेत्रातील उच्च पदांवर असलेल्या अनुभवी अधिकाऱ्यांची विविध सरकारी विभागांमध्ये सहसचिव, संचालक आणि उपसचिव, या पदांवर नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून नोकरशाहीला अधिक गती मिळेल, असे सरकारने म्हटले. 2018 मध्ये नोकरशाहीमध्ये लॅटरल एंट्री सुरू झाली आणि त्याअंतर्गत प्रथमच खासगी क्षेत्रातील उच्च अधिकाऱ्यांची विविध सरकारी विभागांमध्ये सहसचिव पदाच्या 9 जागांसाठी केवळ मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली.

यावेळी कोणत्या पदावर किती जागा रिक्त आहेत?

या वेळी UPSC ने लॅटरल एंट्रीद्वारे भरतीसाठी जारी केलेल्या अर्जात असे म्हटले आहे की, ते 10 सहसचिव आणि 35 संचालक/उपसचिव पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्थ मंत्रालयात दोन, गृह मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात प्रत्येकी एका पदासाठी संयुक्त सचिवांची भरती केली जाईल. याशिवाय, कृषी मंत्रालयात 8, शिक्षण मंत्रालयात 2 आणि परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयात संचालक/उपसचिव या प्रत्येकी एका पदासाठी भरती होणार आहे. या भरती 3 वर्षांच्या करारावर केल्या जातील आणि कार्यप्रदर्शन आणि आवश्यकतेनुसार, करार 5 वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो.

टॅग्स :chirag paswanचिराग पासवानBJPभाजपाcongressकाँग्रेस