ेसंथारा नियमित जीवनाचे अंतिम चरण

By Admin | Updated: August 14, 2015 23:35 IST2015-08-14T23:35:08+5:302015-08-14T23:35:08+5:30

- जैन संत मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज : राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयावर महाराजांचे मत

The last stage of regular life | ेसंथारा नियमित जीवनाचे अंतिम चरण

ेसंथारा नियमित जीवनाचे अंतिम चरण

-
ैन संत मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज : राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयावर महाराजांचे मत
नागपूर : जैन संत मुनीश्री प्रसन्नसागर महाराज सध्या खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर, जुनी शुक्रवारी येथे विराजमान आहेत. याप्रसंगी मुनीश्रींनी पत्रकारांशी संवाद साधून संथाराबाबत आपली मते व्यक्त केली. संथारा म्हणजे आयुष्यभर केलेली पूजा, तपस्या, पुण्यकर्म, संयम आदींचा समुच्चय आणि जीवनाचे अंतिम चरण आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने मात्र संथाराला आत्महत्येच्या दृष्टीने पाहिले, याचे दु:ख वाटते, असे मुनीश्री म्हणाले.
मुनीश्री म्हणाले, या जगात कुणालाच मृत्यू स्वीकारावासा वाटत नाही. पण मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. व्यक्ती वृद्ध झाल्यावर त्याला मृत्यूसमयी कष्ट पडतात. असे कष्ट भोगायला कुणीच तयार होत नाही. हॉस्पिटलमध्ये जाऊन मृत्यू स्वीकारण्याची इच्छा कुणीच ठेवत नाही. त्यामुळेच जैन धर्मात प्राचीन काळापासून ऋषी-मुनींनी हसत-हसत स्वेच्छेने समाधी मरणाची व्यवस्था मान्य केली आहे. आयुष्यभर संयम, पुण्यकर्म केले पण स्वेच्छेने संथारा अवस्थेतून मुक्ती मिळविली नाही तर सारेच व्यर्थ ठरते. राजस्थान उच्च न्यायालयाने मात्र अकारण घाईने निर्णय घेतल्याचे दिसते आहे. यासंदर्भात १७ ऑगस्ट रोजी भारत बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे, असे मुनीश्री म्हणाले. पत्रकार परिषदेला चातुर्मास समितीचे अध्यक्ष नरेश पाटणी, कार्याध्यक्ष राकेश पाटणी, संतोष पेंढारी, दिगंबर जैन महासमितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अभयकुमार पनवेलकर, महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष रिचा जैन, चातुर्मास समितीचे संयोजक प्रकाश बोहरा, स्वागताध्यक्ष रतनलाल गंगवाल, हिराचंद मिश्रीकोटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: The last stage of regular life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.