शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

Coronavirus: डॉक्टरांची ड्युटीला दांडी; ऑक्सिजन पातळी खालावल्याने तडफडून १२ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 13:44 IST

Coronavirus: मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर डॉक्टर नसल्यामुळे १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत १२ कोरोनाबाधितांचा मृत्यूडॉक्टर ड्युटीवर गैरहजर राहिल्याचा आरोपहॉस्पिटलचे अधिष्ठाता सरमा यांची सारवासारव

गुवाहाटी: कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्यानंतर सरकारी यंत्रणा सतर्क झाली आहे. नवीन कोरोनाबाधित आणि मृत्यू यांचे कमी होणारे प्रमाण दिलासादायक आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी केवळ निष्काळजीपणामुळे अनेक कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशीच एक घटना आसाममधील गुवाहाटीमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर डॉक्टर नसल्यामुळे १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. (in last 24 hours 12 corona deaths at guwahati gmch hospital assam)

जीएमसीएचचे डीन अभिजित सरमा यांनी सांगितले की, कोरोनाबाधित १२ रुग्णांपैकी ९ रुग्ण आयसीयूमध्ये होते, तर तीन रुग्ण कोव्हिड वॉर्डमध्ये होते. त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती. मात्र, अन्य माहितीनुसार, या रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालावत गेली, तेव्हा डॉक्टर ड्युटीवर उपस्थित नव्हते. 

“जा आणि मरा, हवं ते करा”; पालकांच्या तक्रारीवर भाजपच्या शिक्षणमंत्र्यांचं उत्तर

आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, रात्रपाळीला अनेकदा डॉक्टर ड्युटीवर येतच नाहीत. दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच आसामचे आरोग्यमंत्री केशव महंत यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. याप्रकरणी वरिष्ठ डॉक्टरांची एक बैठक बोलावण्यात आली. 

सरमांची सारवासारव

या रुग्णांना उपचारांसाठी दाखल करण्यात उशीर झाला होता. या रुग्णांना दाखल करून घेण्यात आले, तेव्हाच त्यांची ऑक्सिजन पातळी प्रमाणापेक्षा अधिक कमी झाली होती. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. ऑक्सिजन सपोर्ट देऊनही त्यांची ऑक्सिजन पातळी वाढत नव्हती. तसेच काही रुग्णांना एकापेक्षा अधिक व्याधी झालेल्या होत्या. याशिवाय यापैकी कुणीही कोरोनाचा एकही डोस घेतला नव्हता, अशी सारवासारव सरमा यांनी केली आहे. 

कोरोना लस म्हणून दिले मिठाचे पाणी! तपासात धक्कादायक खुलासे

दरम्यान, आसाममध्ये उपचाराधीन असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार ०४३ वर गेली असून, कोरोनाचा संसर्ग दर २.०१ टक्के आहे. तसेच आसाममध्ये कोरोना मृत्यूदर ०.८९ टक्के असून, रिकव्हरी रेट ९३.८७ टक्के असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAssamआसामguwahati-pcगौहती