शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

Coronavirus: डॉक्टरांची ड्युटीला दांडी; ऑक्सिजन पातळी खालावल्याने तडफडून १२ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 13:44 IST

Coronavirus: मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर डॉक्टर नसल्यामुळे १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत १२ कोरोनाबाधितांचा मृत्यूडॉक्टर ड्युटीवर गैरहजर राहिल्याचा आरोपहॉस्पिटलचे अधिष्ठाता सरमा यांची सारवासारव

गुवाहाटी: कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्यानंतर सरकारी यंत्रणा सतर्क झाली आहे. नवीन कोरोनाबाधित आणि मृत्यू यांचे कमी होणारे प्रमाण दिलासादायक आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी केवळ निष्काळजीपणामुळे अनेक कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशीच एक घटना आसाममधील गुवाहाटीमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर डॉक्टर नसल्यामुळे १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. (in last 24 hours 12 corona deaths at guwahati gmch hospital assam)

जीएमसीएचचे डीन अभिजित सरमा यांनी सांगितले की, कोरोनाबाधित १२ रुग्णांपैकी ९ रुग्ण आयसीयूमध्ये होते, तर तीन रुग्ण कोव्हिड वॉर्डमध्ये होते. त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती. मात्र, अन्य माहितीनुसार, या रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालावत गेली, तेव्हा डॉक्टर ड्युटीवर उपस्थित नव्हते. 

“जा आणि मरा, हवं ते करा”; पालकांच्या तक्रारीवर भाजपच्या शिक्षणमंत्र्यांचं उत्तर

आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, रात्रपाळीला अनेकदा डॉक्टर ड्युटीवर येतच नाहीत. दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच आसामचे आरोग्यमंत्री केशव महंत यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. याप्रकरणी वरिष्ठ डॉक्टरांची एक बैठक बोलावण्यात आली. 

सरमांची सारवासारव

या रुग्णांना उपचारांसाठी दाखल करण्यात उशीर झाला होता. या रुग्णांना दाखल करून घेण्यात आले, तेव्हाच त्यांची ऑक्सिजन पातळी प्रमाणापेक्षा अधिक कमी झाली होती. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. ऑक्सिजन सपोर्ट देऊनही त्यांची ऑक्सिजन पातळी वाढत नव्हती. तसेच काही रुग्णांना एकापेक्षा अधिक व्याधी झालेल्या होत्या. याशिवाय यापैकी कुणीही कोरोनाचा एकही डोस घेतला नव्हता, अशी सारवासारव सरमा यांनी केली आहे. 

कोरोना लस म्हणून दिले मिठाचे पाणी! तपासात धक्कादायक खुलासे

दरम्यान, आसाममध्ये उपचाराधीन असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार ०४३ वर गेली असून, कोरोनाचा संसर्ग दर २.०१ टक्के आहे. तसेच आसाममध्ये कोरोना मृत्यूदर ०.८९ टक्के असून, रिकव्हरी रेट ९३.८७ टक्के असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAssamआसामguwahati-pcगौहती