शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

Coronavirus: डॉक्टरांची ड्युटीला दांडी; ऑक्सिजन पातळी खालावल्याने तडफडून १२ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 13:44 IST

Coronavirus: मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर डॉक्टर नसल्यामुळे १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत १२ कोरोनाबाधितांचा मृत्यूडॉक्टर ड्युटीवर गैरहजर राहिल्याचा आरोपहॉस्पिटलचे अधिष्ठाता सरमा यांची सारवासारव

गुवाहाटी: कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्यानंतर सरकारी यंत्रणा सतर्क झाली आहे. नवीन कोरोनाबाधित आणि मृत्यू यांचे कमी होणारे प्रमाण दिलासादायक आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी केवळ निष्काळजीपणामुळे अनेक कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशीच एक घटना आसाममधील गुवाहाटीमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर डॉक्टर नसल्यामुळे १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. (in last 24 hours 12 corona deaths at guwahati gmch hospital assam)

जीएमसीएचचे डीन अभिजित सरमा यांनी सांगितले की, कोरोनाबाधित १२ रुग्णांपैकी ९ रुग्ण आयसीयूमध्ये होते, तर तीन रुग्ण कोव्हिड वॉर्डमध्ये होते. त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती. मात्र, अन्य माहितीनुसार, या रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालावत गेली, तेव्हा डॉक्टर ड्युटीवर उपस्थित नव्हते. 

“जा आणि मरा, हवं ते करा”; पालकांच्या तक्रारीवर भाजपच्या शिक्षणमंत्र्यांचं उत्तर

आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, रात्रपाळीला अनेकदा डॉक्टर ड्युटीवर येतच नाहीत. दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच आसामचे आरोग्यमंत्री केशव महंत यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. याप्रकरणी वरिष्ठ डॉक्टरांची एक बैठक बोलावण्यात आली. 

सरमांची सारवासारव

या रुग्णांना उपचारांसाठी दाखल करण्यात उशीर झाला होता. या रुग्णांना दाखल करून घेण्यात आले, तेव्हाच त्यांची ऑक्सिजन पातळी प्रमाणापेक्षा अधिक कमी झाली होती. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. ऑक्सिजन सपोर्ट देऊनही त्यांची ऑक्सिजन पातळी वाढत नव्हती. तसेच काही रुग्णांना एकापेक्षा अधिक व्याधी झालेल्या होत्या. याशिवाय यापैकी कुणीही कोरोनाचा एकही डोस घेतला नव्हता, अशी सारवासारव सरमा यांनी केली आहे. 

कोरोना लस म्हणून दिले मिठाचे पाणी! तपासात धक्कादायक खुलासे

दरम्यान, आसाममध्ये उपचाराधीन असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार ०४३ वर गेली असून, कोरोनाचा संसर्ग दर २.०१ टक्के आहे. तसेच आसाममध्ये कोरोना मृत्यूदर ०.८९ टक्के असून, रिकव्हरी रेट ९३.८७ टक्के असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAssamआसामguwahati-pcगौहती