तावरवाडी फाटयाजवळ मारूतीगाडी जळून खाक अडीच लाखाचे नुकसान

By Admin | Updated: May 14, 2014 23:21 IST2014-05-14T23:21:51+5:302014-05-14T23:21:51+5:30

बार्शी : बार्शी कुर्डवाडी रोडवरून जाणारी ओमीनी मारूती गाडीचे अचानक स्पार्किंग होऊन ती पूर्णपणे जळून सुमारे अडीच लाखाचे नुकसान होऊन सुदैवाने जिवीतहानी झाली नसून दोन तास कूर्डुवाडी वहातूक पुर्णपणे बंद पडली.

Lashing of two and a half lakh damages to Maruti near the Tahwarwadi | तावरवाडी फाटयाजवळ मारूतीगाडी जळून खाक अडीच लाखाचे नुकसान

तावरवाडी फाटयाजवळ मारूतीगाडी जळून खाक अडीच लाखाचे नुकसान

र्शी : बार्शी कुर्डवाडी रोडवरून जाणारी ओमीनी मारूती गाडीचे अचानक स्पार्किंग होऊन ती पूर्णपणे जळून सुमारे अडीच लाखाचे नुकसान होऊन सुदैवाने जिवीतहानी झाली नसून दोन तास कूर्डुवाडी वहातूक पुर्णपणे बंद पडली.
ही घटना आज बुधवारी सांयकाळी सहाच्या सुमारास कुर्डूवाडी रस्त्यावरील तावरवाडी फाटयाजवळ घडली. याबाबत अधिक महीती अशी की मारूती कार ( एम.एच. 0४/ ८७० ) नामदेव भागवत गरड (रा. श्रीपतपिंपरी ता. बार्शी) सध्या ठाणे यांची असून ते बांधकाम व्यावसायिक असून ते गावी दोन दिवसापूर्वी आले होते.
आज मुंबईला जावयाचे असल्याने गरड यांनी बार्शीत येऊन टाकीत पूर्ण पेटो्रल भरले व गाडीत नामदेव गरड (५०), पत्नी प्रभावती गरड (४५), मुलगा हनुमंत गरड सुरेश हनुमंत गरड अनुजा हनुमंत गरड हे ज्वारी घेऊन श्रीपतपिंपरीला निघाले होते. घटनस्थळा जवळ येताच अचानक धूर निघाल्याचे लक्षात आल्याने रस्त्याच्या मधोमध थांबवून सर्वाना खाली ऊतरवे पर्यंत गाडीने पूर्णपणे पेट घेतला. विशेष म्हणजे या गाडीत रिकामे गॅस सिलेंडर होते ते सुरक्षीत राहीले.
गाडीने पेट घेतल्यानंतर पराग हॉटेलचे व्यवस्थापक सुरेश इंगळे यांनी तातडीने बार्शी शहर पोलीस स्टेशनला कळविले त्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी रोहीदास पवार यांनी तातडीने पो.उपनिरक्षिक सुरेखा धस व १० कर्मचारी पाठवले तर नगरपालीकेचे अग्नीशामक दल पाठविले पण तोपर्यंत गाडी पुर्णपणे जळून खाक झााली रस्त्याच्या मधोमध गाडीने पेट घेतल्याने बार्शी कुर्डूवाडी वहातूक दोन तास बंद पडली होती.


Web Title: Lashing of two and a half lakh damages to Maruti near the Tahwarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.