शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
4
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
6
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
7
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
8
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
9
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
10
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
11
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
12
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
13
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
14
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
15
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
16
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
17
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

दिल्लीतील संमेलनातून देशभर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव; महाराष्ट्रातून १०९ भाविक झाले होते सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 06:23 IST

संमेलनात महाराष्ट्रातील १०९ भाविकांचा सहभाग होता

- नितीन नायगांवकर नवी दिल्ली : दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या एका धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन हजारांपेक्षा अधिक लोकांमुळे कोरोनाचे लोण दिल्ली खेरीज देशाच्या अनेक राज्यांत पसरले असल्याची शक्यता समोर आली आहे. या संमेलनात सहभागी झालेल्यांपैकी काही जणांचे मृत्यू झाले आहेत. २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी उघड झाले असून आणखी २०० जणांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसू लागल्याने या आजाराचा धोका आणखी वाढला आहे.

संमेलनात महाराष्ट्रातील १०९ भाविकांचा सहभाग होता. लागण झालेले शेकडो लोक विविध राज्यात परत गेले आहेत. त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका टाळण्यासाठी आता त्यांच्याखेरीज त्यांच्या संपर्कात आलेल्या हजारो लोकांचा मागोवा घेऊन त्यांचे विलगीकरण करण्याचे काम राज्यांना युद्धपातळीवर करावे लागत आहे. आयोजक मौलाना साद यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा व इतर कलमान्वये गुन्हा नोंदविलेला आहे. त्यांचा शोध सुरू आहे. तेलंगणात परत आलेल्या एक हजार लोकांपैकी ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

तामिळनाडूत ४५ जण पॉझिटिव्ह

या धर्मसभेसाठी इंडोनेशियातून आलेले ८ धर्मप्रचारक परदेशी विमानसेवा बंद झाल्याने मायदेशी परत न जाता उत्तर प्रदेशच्या बिजनोर येथील एका मशिदीत मुक्काम करत असल्याची माहिती आहे. तामिळनाडूत १५०० जण परतले आहेत. त्यातील ११०० जणांना क्वारंटाइन केले आहे. ४५ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे अंदमान-निकोबार येथील २१ जण संमेलनात सहभागी झाले होते.

निमाजुद्दीन परिसरातील या इमारतीचा परिसर सील केला आहे. त्या भागातील १५४८ लोकांना तेथून हलविण्यात आले आहे.त्यापैकी ४४१ संशयित कोरोना बाधितांना अनेक इस्पितळांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

लॉक डाऊनमध्ये हजारोंची गर्दी

लॉक डाऊन घोषित झाल्यानंतर मर्काझच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती असल्याचे पोलिसांना कळविले होते. त्यातील काहींना पोलिसांनी बाहेरही काढले. पण २६ मार्चला तब्बल २ हजार लोक याठिकाणी पुन्हा एकत्र आले. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी पुन्हा पोलिसांना संपर्क साधला, मात्र तोपर्यंत संपूर्ण देशातील वाहतूक बंद झालेली होती.

आसाम सरकारने २४९ जणांची यादी तयार केली आहे. मध्य प्रदेशातून एक हजारावरूनही अधिक भाविक या संमेलनात सहभागी झाले होते. तर हिमाचलमधून गेलेले १७ जण आता राज्यात परतले आहेत. आंध्र प्रदेशातून गेलेले ४० जण परतले आहेत. त्यांच्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त हे पॉझिटिव्ह आढळले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत