शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देशात ठिकठिकाणी आगीचा भडका; नासाचा 'हा' फोटो धक्कादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 16:47 IST

मध्य भारतातल्या आगीचं निशाण हे वणव्यांमुळे नव्हे, तर पिकं कापून झाल्यानंतर उरलेल्या तणाला लावलेल्या आगींमुळे दिसत आहे.

नवी दिल्ली- अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं गेल्या 10 दिवसांतील अवकाशातील फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्या फोटोंमध्ये भारतातल्या अनेक भागात आग लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडसह दक्षिणेकडच्या अनेक राज्यांमध्ये अशी आग लागल्याचं दिसत आहे. उन्हाळ्याचा दिवसांत वातावरणात कमालीचा उकाडा जाणवतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होत असून, कार्बनही उत्सर्जित होतोय.भारतातल्या मोठ्या भागात दिसत असलेली आग ही जंगलात लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. परंतु नासाचे संशोधक हिरेन जेठवा यांच्या मते, मध्य भारतातल्या आगीचं निशाण हे वणव्यांमुळे नव्हे, तर पिकं कापून झाल्यानंतर उरलेल्या तणाला लावलेल्या आगींमुळे दिसत आहे. शेतकरी आता मशिननं पिकं कापत असल्यानं तण राहतात. जमीन पुन्हा सपाट करण्यासाठी हे तण जाळण्यात येतात. हे तण काढणं सोपं नसतं म्हणूनच ते जाळण्याचा पर्याय शेतकरी सर्रास वापरतात. हरियाणा आणि पंजाब ही राज्यांचं नव्हे, तर भारतातील अनेक राज्यांत अशा प्रकारे तण जाळली जातात. भात कापून झाल्यानंतर राहिलेली तण ब-याचदा गुरं खातात. ते गुरांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक असल्यानंही ती जाळण्यात येतात. परंतु सध्या गव्हाच्या पिकांची कापणी झाल्यानंतर राहिलेलं तण जाळण्याचाही प्रकार जोर धरतोय.नासाच्या सेटलाइटद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रात ज्या भागात आगीचे निशाण दिसत आहेत. त्यात गहू आणि भातशेतीचा समावेश आहे. पिकांना कापण्याचे दोन प्रकार प्रचलित आहे. एक तर शेतकरी स्वतः पिकं कापतात, तर दुस-या प्रकारात शेतकरी मशिनचा वापर करतात. परंतु मजुरांच्या कमतरतेमुळे सध्या तरी शेतकरी मशिनच्या वापराला जास्त प्राधान्य देतात. पिकांचं तण जाळण्याच्या विषयावर अध्ययन करणा-या इंडियन स्कूल ऑफ बिझनेस रिसर्चर रिधिमा गुप्ता म्हणाल्या, देशात मशिननं पिकांच्या कापणीला प्राधान्य दिलं जातंय. शेतक-यांना हातानं तण कापण्यापेक्षा आगीनं जाळून नष्ट करणं सोपं जातं. मजुरांकडून कापून घेणं हे मशिननं कापणी करण्यापेक्षा महागडं आहे. पिकांचे तण जाळल्यामुळे कार्बनचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होतं. या आगीत मध्य प्रदेशमधल्या सिहोर जिल्ह्यातील जास्त चित्र आहेत. 

टॅग्स :NASAनासा