शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बड्या कर्जबुडव्यांची कर्जे निर्लेखित; काँग्रेस व सरकारमध्ये तुंबळ वाक्युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 06:22 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही कर्जे आताच्या सरकारच्या काळात निर्लेखित केल्याचा आरोप करून समाजमाध्यमांतून तोफ डागली.

नवी दिल्ली : नीरव मोदी, मेहुल चोकसी, विजय मल्ल्या व रामदेव बाबा अशा बड्या ‘कर्जबुडव्यां’च्या कंपन्यांना दिलेली ६८ हजार कोटींची कर्जे बँकांनी निर्लेखित (राईट आॅफ) केल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकारात दिल्यानंतर काँग्रेस आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यात मंगळवारपासून सुरू झालेले तुंबळ वाक्युद्ध बुधवारीही सुरू होते.माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांच्या अर्जावर रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली होती. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही कर्जे आताच्या सरकारच्या काळात निर्लेखित केल्याचा आरोप करून समाजमाध्यमांतून तोफ डागली. एकीकडे कोरोनााविरुद्ध लढण्यासाठी सरकार जनतेपुढे हात पसरताना दुसरीकडे बड्या कर्जबुडव्यांची कर्जे निर्लेखित करीत आहे. हे दडविण्यासाठीच अर्थमंत्र्यांनी संसदेत प्रश्न विचारूनही त्यांची नावे जाहीर केली नव्हती, असा त्यांनी आरोप केला होता.सीतारामन यांनी मंगळवारी अनेक टिष्ट्वट करून काँग्रेसच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, काँग्रेसने सत्तेत असताना व आता विरोधात असतानाही भ्रष्टाचाराच्या उच्चाटनासाठी कधीही कटिबद्धता दाखविली नाही. आता विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याऐवजी काँग्रेस हातातील माहितीचा सोयिस्करपणे व संदर्भ सोडून वापर करून जनतेची दिशाभूल करीत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनVijay Mallyaविजय मल्ल्याBaba Ramdevरामदेव बाबा