शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

काँग्रेसच्या तोंडी पाकिस्तानची भाषा, पंतप्रधान मोदी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 5:59 AM

काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याविषयी ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी केलेले विधान हे काँग्रेस पक्ष काश्मिरी फुटीरवाद्यांची आणि पाकिस्तानची भाषा बोलू लागल्याचे व त्यांची जनतेच्या

बंगळुरु: काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याविषयी ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी केलेले विधान हे काँग्रेस पक्ष काश्मिरी फुटीरवाद्यांची आणि पाकिस्तानची भाषा बोलू लागल्याचे व त्यांची जनतेच्या आशा-आकांक्षांशी फारकत झाल्याचे द्योतक आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केली.कर्नाटक दौ-यात बंगळुरू येथे भाजपा कार्यकर्त्यांपुढे केलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, कालपर्यंत सत्तेवर असलेले अचानक पलटी खाऊन निर्लज्जपणे काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याची मागणी करू लागले आहेत. काश्मीरसाठी प्राणाहुती देणाºयांच्या हौतात्म्याचे राजकारण करणाºयांकडून देशाच्या विकासाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. काँग्रेसला याचा जाब द्यावा लागेल.देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे ठामपणे सांगत पंतप्रधान म्हणाले की, हा देश सरदार वल्लभभाई पटेलांचा आहे. सरदार पटेलांनी देशाची सुरक्षा आणि एकात्मता यासाठी अनेक निर्णय खंबीरपणे घेतले. काश्मीरसाठी हजारो युवकांनी प्राणांची आहुती दिली आहे. काश्मीरसाठी हौतात्म्य दिले नाही, असे देशात एकही राज्य नाही.मोदी म्हणाले की, सर्जिकल स्ट्राइक हा संपूर्ण देशासाठी गौरवाचा क्षण होता; पण काँग्रेसच्या ते पचनी पडले नाही. सर्जिकल स्ट्राइकने काँग्रेसला पोटशूळ का उठला हे आता त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. (वृत्तंसस्था)जनतेपासून त्यांची नाळ तुटलीदेशाच्या जनतेच्या आशा-आकांक्षांपासून काँग्रेसची नाळ तुटली आहे, असा दावा करत मोदी म्हणाले की, आपल्या शूर सैनिकांचा त्याग, भारताची प्रभावी राजनैतिक मुत्सद्देगिरी व भारताचे धाडस यामुळे डोकलामचा तिढा सुटला. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी भारत ठामपणे उभा राहतो हे त्यावरून दिसले. याबद्दल जग भारताकडे कौतुकाने पाहत असताना काँग्रेसवाले मात्र डोकलामवरून अपप्रचारकरीत आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी