शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

जमीन खचतेय, घरातून येतेय पाणी, भारत-चीन सीमेवरील ३२ गाव धोक्यात, धक्कादायक कारण येतेय समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 20:43 IST

uttarakhand: भारत-चीन सीमेवर असलेल्या उत्तराखंडमधील चमोली शहरामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने जोशीमठमध्ये जमीन खचत आहे. भीतीमुळे लोकांना गावातून पलायन करावे लागत आहे. ए

देहराडून - भारत-चीन सीमेवर असलेल्या उत्तराखंडमधील चमोली शहरामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने जोशीमठमध्ये जमीन खचत आहे. भीतीमुळे लोकांना गावातून पलायन करावे लागत आहे. एकीकडे पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नाही आहे. तर दुसरीकडे अलकनंदा नदीतील भूस्खलन आणि अनियंत्रित बांधकामांमुळे ३२ गाव संकटात सापडले आहेत.

चमोलीमध्ये आतापर्यंत ५८४ घरे, हॉटेल या संकटाच्या फेऱ्यात सापडली आहे. आपत्ती व्यवस्थापनातील अधिकारी रंजित सिन्हा यांनी सांगितले की, स्थिती चिंताजनक आहे. जोशीमठचं निरीक्षण करून आलेल्या टेक्निकल टीमने अनेक सल्ले दिले आहेत. त्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. टेक्निकल टीम भूस्खलनाचं सर्वात मोठं कारण हे जोशीमठ येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही व्यलस्था नसणे हे आहे, असे सांगत आहे. त्यामुळे त्याचे सर्वप्रथम व्यवस्थापन करावे लागेल.

जोशीमठ येथे होत असलेल्या अनियंत्रित आणि अनियोजित बांधकामांमुळे भूस्खलनाचे प्रमाण वाढत आहे, असे टेक्निकल समितीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. केवळ जोशीमठच नाही तर बहुतांशी पर्वतीय शहरांमध्ये अशीच परिस्थिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडमधील सुमारे ३२ गावांमध्ये जोशीमठसारखी परिस्थिती आहे. या गावातील १४८ कुटुंबांच्या विस्थापनाची फाईल सरकारी कार्यालयांमध्ये रेंगाळत आहे. दरम्यान, २०१२ पासून आतापर्यंत ४५ हून अधिक गावांमधील १४०० कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मात्र हे विस्थापन थांबलेलं नाही.

जोशीमठ येथे भूस्खलनासारखी स्थिती निर्माण झाल्याने लोक घाबरलेले आहेत. नगरातील प्रवेश द्वारावर असलेल्या एका मोठ्या हॉटेलजवळ भेग पडल्याने त्या खालील भागात राहणाऱ्या ५ ते १० कुटुंबांसाठी धोका निर्माण झाला होता. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या ५ कुटुंबांचे प्रशासनाने स्थलांतर केले आहे.  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडIndiaभारत