शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

जमीन खचतेय, घरातून येतेय पाणी, भारत-चीन सीमेवरील ३२ गाव धोक्यात, धक्कादायक कारण येतेय समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 20:43 IST

uttarakhand: भारत-चीन सीमेवर असलेल्या उत्तराखंडमधील चमोली शहरामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने जोशीमठमध्ये जमीन खचत आहे. भीतीमुळे लोकांना गावातून पलायन करावे लागत आहे. ए

देहराडून - भारत-चीन सीमेवर असलेल्या उत्तराखंडमधील चमोली शहरामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने जोशीमठमध्ये जमीन खचत आहे. भीतीमुळे लोकांना गावातून पलायन करावे लागत आहे. एकीकडे पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नाही आहे. तर दुसरीकडे अलकनंदा नदीतील भूस्खलन आणि अनियंत्रित बांधकामांमुळे ३२ गाव संकटात सापडले आहेत.

चमोलीमध्ये आतापर्यंत ५८४ घरे, हॉटेल या संकटाच्या फेऱ्यात सापडली आहे. आपत्ती व्यवस्थापनातील अधिकारी रंजित सिन्हा यांनी सांगितले की, स्थिती चिंताजनक आहे. जोशीमठचं निरीक्षण करून आलेल्या टेक्निकल टीमने अनेक सल्ले दिले आहेत. त्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. टेक्निकल टीम भूस्खलनाचं सर्वात मोठं कारण हे जोशीमठ येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही व्यलस्था नसणे हे आहे, असे सांगत आहे. त्यामुळे त्याचे सर्वप्रथम व्यवस्थापन करावे लागेल.

जोशीमठ येथे होत असलेल्या अनियंत्रित आणि अनियोजित बांधकामांमुळे भूस्खलनाचे प्रमाण वाढत आहे, असे टेक्निकल समितीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. केवळ जोशीमठच नाही तर बहुतांशी पर्वतीय शहरांमध्ये अशीच परिस्थिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडमधील सुमारे ३२ गावांमध्ये जोशीमठसारखी परिस्थिती आहे. या गावातील १४८ कुटुंबांच्या विस्थापनाची फाईल सरकारी कार्यालयांमध्ये रेंगाळत आहे. दरम्यान, २०१२ पासून आतापर्यंत ४५ हून अधिक गावांमधील १४०० कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मात्र हे विस्थापन थांबलेलं नाही.

जोशीमठ येथे भूस्खलनासारखी स्थिती निर्माण झाल्याने लोक घाबरलेले आहेत. नगरातील प्रवेश द्वारावर असलेल्या एका मोठ्या हॉटेलजवळ भेग पडल्याने त्या खालील भागात राहणाऱ्या ५ ते १० कुटुंबांसाठी धोका निर्माण झाला होता. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या ५ कुटुंबांचे प्रशासनाने स्थलांतर केले आहे.  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडIndiaभारत