शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

लालू पुन्हा तुरुंगात, चारा घोटाळा भोवला,  १९९0 पासूनच्या मालमत्तेवर टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 06:36 IST

चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात सीबीआय विशेष न्यायालयाने शनिवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवून त्यांची तुरुंगात रवानगी केली.

रांची : चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात सीबीआय विशेष न्यायालयाने शनिवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवून त्यांची तुरुंगात रवानगी केली. शिक्षेचा निकाल ३ जानेवारी रोजी दिला जाणार आहे. त्यामुळे लालूंच्या नववर्षाची सुरुवात तुरूंगात होईल.लालूंसह १६ आरोपींना दोषी ठरविणारा निकाल विशेष न्या. शिवपाल सिंग यांनी जाहीर केला. यानंतर, सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली. सन १९९० नंतर लालू प्रसाद यांनी संपादित केलेल्या सर्व मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. आणखी एक माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांच्यासह सहा आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले गेले.तिजोरीतून, सन १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले बनवून फसवणुकीने ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याच्या खटला होता. चाºयाचा पुरवठा न करताच, कंत्राटदारांच्या नावे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही, मुख्यमंत्री या नात्याने लालूंनी त्याकडे कानाडोळा केला, असा त्यांच्यावर आरोप होता.या घोटाळ््याच्या ३३ पैकी ६ खटल्यांमध्ये लालू आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये ते दोषी ठरले आहेत. अन्य चार खटल्यांचे कामकाज सुरू आहे. चैबासा तिजोरीतून झालेल्या ३७.५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना ५ वर्षांची कैद व २५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला, पण शिक्षेला स्थगिती न दिल्याने त्यांना ११ वर्षे निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली. (वृत्तसंस्था)आधी घोषणा, नंतर शोककळाए. राजा आणि कनिमोळी यांना व ‘आदर्श’ घोटाळ््यात अशोक चव्हाण यांना मिळाला, तसा मलाही न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत, न्यायालयात गेलेल्या लालूंनी या निकालानंतर अनेक टिष्ट्वट करून भाजपाने आपल्यामागे सुडाने छळतंत्र सुरू ठेवले असल्याचा आरोप केला. सकाळी लालूंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाºया ‘राजद’ कार्यकर्त्यांनी नंतर तुरुंगाबाहेर साश्रू नयनांनी छाती बडवून घेत शोक व्यक्त केला.

अपहाराचा प्रत्येक गुन्हा वेगळा : ६ पैकी २ खटले निकाली निघाल्यावर राहिलेले २ खटले रद्द करण्यासाठी लालूंनी उच्च न्यायालयात याचिका केली. एकाच प्रकरणाशी संबंधित अनेक खटले चालविले जाऊ शकत नाहीत, असे म्हणून उच्च न्यायालयाने ते रद्द केले. मात्र, अपहाराचा प्रत्येक गुन्हा वेगळा आहे व त्यासाठी स्वतंत्र खटला चाललाच पाहिजे, असे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ते खटले पुनरुज्जीवित केले आणि रोजच्या रोज सुनावणी घेऊन, नऊ महिन्यांत ते निकाली काढण्याचा आदेश दिला. त्यानुसार, ४ प्रलंबित खटल्यांपैकी एका खटल्याचा निकाल शनिवारी लागला.सातत्याने केल्या जाणाºया पक्षपाती प्रचाराच्या धडाक्यामुळे काही काळ सत्यही असत्य वाटू शकते, परंतु पक्षपात आणि दुष्टपणाचे हे मळभ दूर होऊन अखेरीस सत्याचाच विजय होईल.-लालू प्रसाद यादवमाझ्या दृष्टीने हा निकाल समाधानाची बाब आहे. ज्या जनहित याचिकेत पाटणा उच्च न्यायालयाने चारा घोटाळ््यात गुन्हे नोंदविण्याचा आदेश दिला, त्यात याचिकाकर्त्यांचा मी वकील होतो. त्या वेळी लालू प्रसाद सरकारने या याचिकेस विरोध केला. भ्रष्टाचाराची फळे भोगावीच लागतात, हाच धडा या निकालावरून मिळतो.-रवीशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव