शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

लालू पुन्हा तुरुंगात, चारा घोटाळा भोवला,  १९९0 पासूनच्या मालमत्तेवर टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 06:36 IST

चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात सीबीआय विशेष न्यायालयाने शनिवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवून त्यांची तुरुंगात रवानगी केली.

रांची : चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात सीबीआय विशेष न्यायालयाने शनिवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवून त्यांची तुरुंगात रवानगी केली. शिक्षेचा निकाल ३ जानेवारी रोजी दिला जाणार आहे. त्यामुळे लालूंच्या नववर्षाची सुरुवात तुरूंगात होईल.लालूंसह १६ आरोपींना दोषी ठरविणारा निकाल विशेष न्या. शिवपाल सिंग यांनी जाहीर केला. यानंतर, सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली. सन १९९० नंतर लालू प्रसाद यांनी संपादित केलेल्या सर्व मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. आणखी एक माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांच्यासह सहा आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले गेले.तिजोरीतून, सन १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले बनवून फसवणुकीने ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याच्या खटला होता. चाºयाचा पुरवठा न करताच, कंत्राटदारांच्या नावे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही, मुख्यमंत्री या नात्याने लालूंनी त्याकडे कानाडोळा केला, असा त्यांच्यावर आरोप होता.या घोटाळ््याच्या ३३ पैकी ६ खटल्यांमध्ये लालू आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये ते दोषी ठरले आहेत. अन्य चार खटल्यांचे कामकाज सुरू आहे. चैबासा तिजोरीतून झालेल्या ३७.५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना ५ वर्षांची कैद व २५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला, पण शिक्षेला स्थगिती न दिल्याने त्यांना ११ वर्षे निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली. (वृत्तसंस्था)आधी घोषणा, नंतर शोककळाए. राजा आणि कनिमोळी यांना व ‘आदर्श’ घोटाळ््यात अशोक चव्हाण यांना मिळाला, तसा मलाही न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत, न्यायालयात गेलेल्या लालूंनी या निकालानंतर अनेक टिष्ट्वट करून भाजपाने आपल्यामागे सुडाने छळतंत्र सुरू ठेवले असल्याचा आरोप केला. सकाळी लालूंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाºया ‘राजद’ कार्यकर्त्यांनी नंतर तुरुंगाबाहेर साश्रू नयनांनी छाती बडवून घेत शोक व्यक्त केला.

अपहाराचा प्रत्येक गुन्हा वेगळा : ६ पैकी २ खटले निकाली निघाल्यावर राहिलेले २ खटले रद्द करण्यासाठी लालूंनी उच्च न्यायालयात याचिका केली. एकाच प्रकरणाशी संबंधित अनेक खटले चालविले जाऊ शकत नाहीत, असे म्हणून उच्च न्यायालयाने ते रद्द केले. मात्र, अपहाराचा प्रत्येक गुन्हा वेगळा आहे व त्यासाठी स्वतंत्र खटला चाललाच पाहिजे, असे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ते खटले पुनरुज्जीवित केले आणि रोजच्या रोज सुनावणी घेऊन, नऊ महिन्यांत ते निकाली काढण्याचा आदेश दिला. त्यानुसार, ४ प्रलंबित खटल्यांपैकी एका खटल्याचा निकाल शनिवारी लागला.सातत्याने केल्या जाणाºया पक्षपाती प्रचाराच्या धडाक्यामुळे काही काळ सत्यही असत्य वाटू शकते, परंतु पक्षपात आणि दुष्टपणाचे हे मळभ दूर होऊन अखेरीस सत्याचाच विजय होईल.-लालू प्रसाद यादवमाझ्या दृष्टीने हा निकाल समाधानाची बाब आहे. ज्या जनहित याचिकेत पाटणा उच्च न्यायालयाने चारा घोटाळ््यात गुन्हे नोंदविण्याचा आदेश दिला, त्यात याचिकाकर्त्यांचा मी वकील होतो. त्या वेळी लालू प्रसाद सरकारने या याचिकेस विरोध केला. भ्रष्टाचाराची फळे भोगावीच लागतात, हाच धडा या निकालावरून मिळतो.-रवीशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव