शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

देशात दरवर्षी लाखावर आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक

By admin | Updated: July 4, 2014 09:31 IST

देशात दरवर्षी सरासरी एक लाखावर लोक आत्महत्या करतात. चिंतेची बाब म्हणजे गेल्या दशकाच्या तुलनेत त्यात २१.६ टक्के वाढ झाली.

नवी दिल्ली : देशात दरवर्षी सरासरी एक लाखावर लोक आत्महत्या करतात. चिंतेची बाब म्हणजे गेल्या दशकाच्या तुलनेत त्यात २१.६ टक्के वाढ झाली. २०१३ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने(एनसीआरबी) ‘क्राईम इन इंडिया २०१३’ या शीषर्काखाली गेल्या आठवड्यात जारी केलेल्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.गेल्यावर्षी आत्महत्येच्या घटनांची संख्या १,३४,७९९ नोंदण्यात आली असून, दशकापूर्वी म्हणजे २००३ मध्ये ही संख्या १,१०,८५१ एवढी होती. मधल्या काळाच्या तुलनेत २०११ नंतर आत्महत्यांचा दर कमी झाल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला. त्याचे कारण या दशकाच्या काळात लोकसंख्येत १५ टक्के वाढ झाली असताना आत्महत्यांचा दर ५.७ टक्क्यांनी वाढला आहे.(आत्महत्येचा दर २००३ मध्ये १०.४ टक्के होता तो २०१३ मध्ये ११ टक्क्यांपर्यंत वाढला.) गेल्या दशकात आत्महत्येच्या दरात घट आणि वाढ अशी संमिश्र नोंद झाली. गेल्यावर्षी १६,६२२ आत्महत्यांची नोंद झालेले महाराष्ट्र देशात अग्रक्रमावर आहे. त्यापाठोपाठ १६,६०१ आत्महत्या झालेल्या तामिळनाडूचा नंबर लागतो. या दोन राज्यांमधील आत्महत्यांचे प्रमाण १२.३ टक्के आहे. महाराष्ट्र,तामिळनाडूपाठोपाठ आंध्र प्रदेश, प.बंगाल, कर्नाटक यांचे स्थान आहे. या पहिल्या पाच क्रमांकाची राज्यांमधील आत्महत्यांचे प्रमाण ५३.५ टक्के आहे. अन्य ४६.५ टक्के आत्महत्या उर्वरित २३ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. गेल्यावर्षी चेन्नईत सर्वाधिक २४५० आत्महत्या झाल्या असून, १३२२ आत्महत्यांची नोंद झालेल्या मुंबईचा चौथा क्रमांक लागतो. देशातील प्रमुख ५३ शहरांच्या तुलनेत चार महानगरांमधील आत्महत्यांचे प्रमाण ३५ टक्के आहे, हे विशेष. (लोकमत न्यूज नेटवर्क)