शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

देशात दरवर्षी लाखावर आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक

By admin | Updated: July 4, 2014 09:31 IST

देशात दरवर्षी सरासरी एक लाखावर लोक आत्महत्या करतात. चिंतेची बाब म्हणजे गेल्या दशकाच्या तुलनेत त्यात २१.६ टक्के वाढ झाली.

नवी दिल्ली : देशात दरवर्षी सरासरी एक लाखावर लोक आत्महत्या करतात. चिंतेची बाब म्हणजे गेल्या दशकाच्या तुलनेत त्यात २१.६ टक्के वाढ झाली. २०१३ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने(एनसीआरबी) ‘क्राईम इन इंडिया २०१३’ या शीषर्काखाली गेल्या आठवड्यात जारी केलेल्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.गेल्यावर्षी आत्महत्येच्या घटनांची संख्या १,३४,७९९ नोंदण्यात आली असून, दशकापूर्वी म्हणजे २००३ मध्ये ही संख्या १,१०,८५१ एवढी होती. मधल्या काळाच्या तुलनेत २०११ नंतर आत्महत्यांचा दर कमी झाल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला. त्याचे कारण या दशकाच्या काळात लोकसंख्येत १५ टक्के वाढ झाली असताना आत्महत्यांचा दर ५.७ टक्क्यांनी वाढला आहे.(आत्महत्येचा दर २००३ मध्ये १०.४ टक्के होता तो २०१३ मध्ये ११ टक्क्यांपर्यंत वाढला.) गेल्या दशकात आत्महत्येच्या दरात घट आणि वाढ अशी संमिश्र नोंद झाली. गेल्यावर्षी १६,६२२ आत्महत्यांची नोंद झालेले महाराष्ट्र देशात अग्रक्रमावर आहे. त्यापाठोपाठ १६,६०१ आत्महत्या झालेल्या तामिळनाडूचा नंबर लागतो. या दोन राज्यांमधील आत्महत्यांचे प्रमाण १२.३ टक्के आहे. महाराष्ट्र,तामिळनाडूपाठोपाठ आंध्र प्रदेश, प.बंगाल, कर्नाटक यांचे स्थान आहे. या पहिल्या पाच क्रमांकाची राज्यांमधील आत्महत्यांचे प्रमाण ५३.५ टक्के आहे. अन्य ४६.५ टक्के आत्महत्या उर्वरित २३ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. गेल्यावर्षी चेन्नईत सर्वाधिक २४५० आत्महत्या झाल्या असून, १३२२ आत्महत्यांची नोंद झालेल्या मुंबईचा चौथा क्रमांक लागतो. देशातील प्रमुख ५३ शहरांच्या तुलनेत चार महानगरांमधील आत्महत्यांचे प्रमाण ३५ टक्के आहे, हे विशेष. (लोकमत न्यूज नेटवर्क)