शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Lakhimpur Violence Case: मोठी बातमी! शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप असलेल्या मंत्री पुत्राला मिळाला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 14:22 IST

Lakhimpur Violence Case: केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अलाहाबाद न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.

अलाहाबाद: लखीमपूर खेरी (Lakhimpur Violence Case) येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या कथित आरोपाखाली तुरुंगात असलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा(Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा(Ashish Mishra) याला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court)लखनौ खंडपीठाने आशिष मिश्राला जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आशिष मिश्रा उद्या म्हणजेच 11 फेब्रुवारीला तुरुंगातून बाहेर येईल.

हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. निवडणुकीच्या वातावरणात आशिष मिश्रा याला जामीन मिळाल्याने आता याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी तिकोनिया निघासन विधानसभा मतदारसंघात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी टेनीचा मुलगा आशिष याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.

पाच हजार पानांचे आरोपपत्र

हिंसाचाराच्या प्रकरणात एसआयटीने आरोपपत्र दाखल केले होते. 5000 पानांच्या या आरोपपत्रात केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ ​​मोनू भैया याला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. आशिष मिश्रासह 16 जणांना आरोपी करण्यात आले आहे. गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी आशिष मिश्रा समर्थक आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षात आठ जणांचा मृत्यू झाला होता. तपास अधिकाऱ्यांनी आशिष मिश्रासह अन्य आरोपींना हत्येचा आरोपी बनवले आहे. आरोपपत्रानुसार सुनियोजित कटाखाली आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जीप आणि एसयूव्हीने चिरडले.

208 जणांनी नोंदवली साक्ष

तपासात, एसआयटीला 17 वैज्ञानिक पुरावे, सात भौतिक पुरावे आणि 24 व्हिडिओ फोटो सापडले, ज्यामुळे आरोपींच्या अडचणी वाढल्या. याशिवाय 208 जणांनी साक्ष दिली. या आधारे एसआयटीने आरोपपत्र दाखल केले. मंत्र्यांचा मुलगा आशिष घटनास्थळी उपस्थित असल्याचे साक्षीदारांनी एसआयटीला सांगितले. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारCourtन्यायालय