शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:23 IST

जास्मिन आणि रुखसाना बानो यांनी रामप्रवेश आणि सर्वेश यांच्याशी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केलं.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात दोन मुस्लिम बहिणींनी एका मंदिरात हिंदू मुलांशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. जास्मिन आणि रुखसाना बानो यांनी रामप्रवेश आणि सर्वेश यांच्याशी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केलं. त्यांचं प्रेमप्रकरण खूप दिवसांपासून सुरू होतं. रुखसानाने आता तिचं नाव बदलून रूबी ठेवलं आहे आणि जास्मिनने चांदणी असं नाव ठेवलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दोन्ही बहिणी आपलं घर सोडून थेट रामप्रवेश आणि सर्वेशच्या घरी पोहोचल्या. मुली अचानक आल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली. हे कसं घडलं याचा विचार गावकरी आणि कुटुंबातील सदस्य करू लागले. लोक हे प्रकरण सोडवण्यासाठी एकत्र आले. गावात तणावाचं वातावरण होतं, परंतु दोन्ही बहिणी लग्न करण्याच्या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या.

सोमवारी सकाळी गावातील वडीलधाऱ्यांनी हे प्रकरण सोडवण्यासाठी पंचायत बोलावली. दोन्ही कुटुंबांमध्ये नीट चर्चा व्हावी अशी सर्वांना इच्छा होती, परंतु कोणताही तोडगा निघू शकला नाही. कारण दोन्ही बहिणी त्यांच्या प्रियकराशीच लग्न करण्याच्या मुद्द्यावर ठाम होत्या. त्यांच्या हट्टीपणासमोर पंचायतही अपयशी ठरली. मुलींचं वय तपासलं असता त्या प्रौढ असल्याचं आढळून आलं.

पंचायतीत काहीही निर्णय न झाल्याने दोन्ही बहिणी आणि त्यांच्या प्रियकरांनी आनंदाने हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. जास्मिन आणि रुखसाना यांनी त्यांचा धर्म सोडून आपलं प्रेम निवडलं. या निर्णयाने दोन्ही कुटुंबांनाच नव्हे तर संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. या लग्नाची सध्या परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नHinduहिंदूMuslimमुस्लीम