शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खीरी हिंसाचाराचा थरारक व्हिडीओ; शेतकऱ्यांना चिरडल्याचं पाहून संताप येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 10:10 IST

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत शेतकऱ्यांना चिरडताना दिसत आहे. २७ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

लखीमपूर खीरी – शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी झालेल्या हिंसक घडामोडीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. निदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागून आलेल्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडलं. सध्या पोलीस या व्हिडीओची पुष्टी करत नाहीत. व्हिडीओत शेतकऱ्यांना चिरडणारी पहिली गाडी थार जीप आहे तर दुसरी टोयाटो फॉर्च्युनर होती. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह विरोधकांनी हा व्हिडीओ शेअर करत सरकारवर प्रश्नचिन्ह उभं केले आहे.

काँग्रेसच्या प्रियंका गांधी(Congress Priyanka Gandhi) म्हणाल्या की, नरेंद्र मोदी, तुमचं सरकार कुठल्याही ऑर्डरविना आणि एफआयआरशिवाय मला मागील २८ तासांपासून ताब्यात घेतलं आहे. अन्नदाता शेतकऱ्याला चिरडणाऱ्या व्यक्तीला आतापर्यंत अटक झाली नाही. असं का? असं सवाल त्यांनी विचारला आहे. तर आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी या व्हिडीओनंतरही आणखी पुरावा लागेल का? सत्तेच्या अहंकारात गुंडांनी शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून ठार केले तेव्हा काहीजण मंत्र्याचा मुलगा जीव वाचवण्यासाठी पळत होता असं ज्ञान पाजळत आहेत अशी टीका त्यांनी केली.

क्रूर लोकांवर कठोर कारवाई व्हावी

माजी काँग्रेस नेते ललितेशपति त्रिपाठी यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत ट्विट केलंय की, ज्यांना लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराचा पुरावा हवाय त्यांनी हा पुरावा घ्यावा. या क्रूर लोकांवर कठोर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा असं कृत्य करण्याचं धाडस कुणी करू नये.

काय आहे या व्हिडीओत?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत शेतकऱ्यांना चिरडताना दिसत आहे. २७ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात काही शेतकरी काळे झेंडे घेऊन रस्त्याने चालताना दिसत आहेत. इतक्यात पाठीमागून येणाऱ्या जीपने शेतकऱ्यांना चिरडले तर त्यानंतरही आणखी एक कार शेतकऱ्याच्या दिशेने आली. या घटनेत ८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. लखीमपूर खीरी हिंसाचार घटनेत योगी सरकारने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावर मी आणि माझा मुलगा नव्हतोच असा दावा त्यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशात भाजपाला फटका बसण्याची शक्यता

लखीमपूर येथे रविवारी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकरी आंदोलनामुळे पश्चिम उत्तर प्रदेश आधीच भाजपसाठी आव्हान बनला आहे. चार महिन्यांनंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राजकीय गणित बिघडू शकते. राज्यातील राजकारणाचे निरीक्षक वरिष्ठ पत्रकार सिद्धार्थ कलहंस यांच्या म्हणण्यानुसार लखीमपूर खीरी घटनेत थेटपणे भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचे नाव जोडले जात आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आधीच नाराज होते. भाजप या घटनेनंतर बॅकफूटवर असून पक्षाच्या एका प्रमुख प्रवक्त्याने काहीही भाष्य करण्यास नकार देत म्हटले की, या प्रकरणी उत्तर प्रदेश शाखा बोलेल. राज्यातील भाजपच्या सह निवडणूक प्रभारी सरोज पांडे यांनी काँग्रेस आणि विशेषत: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली. गांधी यांनी केलेल्या आरोपांवर त्यांनी विचारले की, “तुम्ही मृतदेहांचे राजकारण करणे कधी सोडणार आहात? अशी टीका केली आहे.

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाFarmers Protestशेतकरी आंदोलन