शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खीरी हिंसाचाराचा थरारक व्हिडीओ; शेतकऱ्यांना चिरडल्याचं पाहून संताप येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 10:10 IST

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत शेतकऱ्यांना चिरडताना दिसत आहे. २७ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

लखीमपूर खीरी – शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी झालेल्या हिंसक घडामोडीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. निदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागून आलेल्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडलं. सध्या पोलीस या व्हिडीओची पुष्टी करत नाहीत. व्हिडीओत शेतकऱ्यांना चिरडणारी पहिली गाडी थार जीप आहे तर दुसरी टोयाटो फॉर्च्युनर होती. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह विरोधकांनी हा व्हिडीओ शेअर करत सरकारवर प्रश्नचिन्ह उभं केले आहे.

काँग्रेसच्या प्रियंका गांधी(Congress Priyanka Gandhi) म्हणाल्या की, नरेंद्र मोदी, तुमचं सरकार कुठल्याही ऑर्डरविना आणि एफआयआरशिवाय मला मागील २८ तासांपासून ताब्यात घेतलं आहे. अन्नदाता शेतकऱ्याला चिरडणाऱ्या व्यक्तीला आतापर्यंत अटक झाली नाही. असं का? असं सवाल त्यांनी विचारला आहे. तर आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी या व्हिडीओनंतरही आणखी पुरावा लागेल का? सत्तेच्या अहंकारात गुंडांनी शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून ठार केले तेव्हा काहीजण मंत्र्याचा मुलगा जीव वाचवण्यासाठी पळत होता असं ज्ञान पाजळत आहेत अशी टीका त्यांनी केली.

क्रूर लोकांवर कठोर कारवाई व्हावी

माजी काँग्रेस नेते ललितेशपति त्रिपाठी यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत ट्विट केलंय की, ज्यांना लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराचा पुरावा हवाय त्यांनी हा पुरावा घ्यावा. या क्रूर लोकांवर कठोर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा असं कृत्य करण्याचं धाडस कुणी करू नये.

काय आहे या व्हिडीओत?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत शेतकऱ्यांना चिरडताना दिसत आहे. २७ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात काही शेतकरी काळे झेंडे घेऊन रस्त्याने चालताना दिसत आहेत. इतक्यात पाठीमागून येणाऱ्या जीपने शेतकऱ्यांना चिरडले तर त्यानंतरही आणखी एक कार शेतकऱ्याच्या दिशेने आली. या घटनेत ८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. लखीमपूर खीरी हिंसाचार घटनेत योगी सरकारने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावर मी आणि माझा मुलगा नव्हतोच असा दावा त्यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशात भाजपाला फटका बसण्याची शक्यता

लखीमपूर येथे रविवारी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकरी आंदोलनामुळे पश्चिम उत्तर प्रदेश आधीच भाजपसाठी आव्हान बनला आहे. चार महिन्यांनंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राजकीय गणित बिघडू शकते. राज्यातील राजकारणाचे निरीक्षक वरिष्ठ पत्रकार सिद्धार्थ कलहंस यांच्या म्हणण्यानुसार लखीमपूर खीरी घटनेत थेटपणे भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचे नाव जोडले जात आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आधीच नाराज होते. भाजप या घटनेनंतर बॅकफूटवर असून पक्षाच्या एका प्रमुख प्रवक्त्याने काहीही भाष्य करण्यास नकार देत म्हटले की, या प्रकरणी उत्तर प्रदेश शाखा बोलेल. राज्यातील भाजपच्या सह निवडणूक प्रभारी सरोज पांडे यांनी काँग्रेस आणि विशेषत: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली. गांधी यांनी केलेल्या आरोपांवर त्यांनी विचारले की, “तुम्ही मृतदेहांचे राजकारण करणे कधी सोडणार आहात? अशी टीका केली आहे.

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाFarmers Protestशेतकरी आंदोलन