शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

'शेतकऱ्यांविरोधात बोलण्याचा दबाव टाकला जातोय', पत्रकार रमन कश्यप यांच्या कुटुंबाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 13:21 IST

Lakhimpur Kheri Violence:लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांसह पत्रकार रमन कश्यप यांचा मृत्यू झाला.

लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात एका पत्रकाराचाही मृत्यू झाला होता. त्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या पत्रकार रमण कश्यप यांच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केला आहे. रमण यांच्या भावाने म्हटले की, त्यांच्या कुटुंबावर शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. रमणच्या हत्येसाठी शेतकऱ्यांना दोषी ठरवणे आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष आणि त्याचे सहकारी निर्दोष असल्याचं सांगण्यास भाग पाडलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

TOIच्या रिपोर्टनुसार, रमणचा भाऊ पवन म्हणाला, माझ्या वडिलांनी आणि मी मीडियाला एकच निवेदन दिले की, केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यात असलेल्या वाहनाने रमण यांना चिरडले आणि गोळ्या घातल्या. पण, आता अनेक पत्रकार आणि स्थानिक लोक आम्हाला आमचे वक्तव्य बदलण्यास सांगत आहेत. रमण यांना शेतकऱ्यांनी मारहाण केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला, असं सांगण्यात दबाव टाकत असल्याची माहिती पवन यांनी दिली.

रमणच्या कुटुंबीयांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाला नाही

पवन पुढे म्हणाले, माझा भाऊ पत्रकार होता पण आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत. आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने बोलणार. आम्हाला अद्याप रमणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळालेला नाही. आमची तक्रार दुसऱ्या एफआयआरशी जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि शेतकर्‍यांच्या एफआयआरमध्ये आमची तक्रारही जोडली जाऊ शकत नाही, असे आम्हाला सांगण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारUttar Pradeshउत्तर प्रदेश