शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'शेतकऱ्यांविरोधात बोलण्याचा दबाव टाकला जातोय', पत्रकार रमन कश्यप यांच्या कुटुंबाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 13:21 IST

Lakhimpur Kheri Violence:लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांसह पत्रकार रमन कश्यप यांचा मृत्यू झाला.

लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात एका पत्रकाराचाही मृत्यू झाला होता. त्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या पत्रकार रमण कश्यप यांच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केला आहे. रमण यांच्या भावाने म्हटले की, त्यांच्या कुटुंबावर शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. रमणच्या हत्येसाठी शेतकऱ्यांना दोषी ठरवणे आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष आणि त्याचे सहकारी निर्दोष असल्याचं सांगण्यास भाग पाडलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

TOIच्या रिपोर्टनुसार, रमणचा भाऊ पवन म्हणाला, माझ्या वडिलांनी आणि मी मीडियाला एकच निवेदन दिले की, केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यात असलेल्या वाहनाने रमण यांना चिरडले आणि गोळ्या घातल्या. पण, आता अनेक पत्रकार आणि स्थानिक लोक आम्हाला आमचे वक्तव्य बदलण्यास सांगत आहेत. रमण यांना शेतकऱ्यांनी मारहाण केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला, असं सांगण्यात दबाव टाकत असल्याची माहिती पवन यांनी दिली.

रमणच्या कुटुंबीयांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाला नाही

पवन पुढे म्हणाले, माझा भाऊ पत्रकार होता पण आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत. आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने बोलणार. आम्हाला अद्याप रमणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळालेला नाही. आमची तक्रार दुसऱ्या एफआयआरशी जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि शेतकर्‍यांच्या एफआयआरमध्ये आमची तक्रारही जोडली जाऊ शकत नाही, असे आम्हाला सांगण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारUttar Pradeshउत्तर प्रदेश