शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

'शेतकऱ्यांविरोधात बोलण्याचा दबाव टाकला जातोय', पत्रकार रमन कश्यप यांच्या कुटुंबाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 13:21 IST

Lakhimpur Kheri Violence:लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांसह पत्रकार रमन कश्यप यांचा मृत्यू झाला.

लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात एका पत्रकाराचाही मृत्यू झाला होता. त्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या पत्रकार रमण कश्यप यांच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केला आहे. रमण यांच्या भावाने म्हटले की, त्यांच्या कुटुंबावर शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. रमणच्या हत्येसाठी शेतकऱ्यांना दोषी ठरवणे आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष आणि त्याचे सहकारी निर्दोष असल्याचं सांगण्यास भाग पाडलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

TOIच्या रिपोर्टनुसार, रमणचा भाऊ पवन म्हणाला, माझ्या वडिलांनी आणि मी मीडियाला एकच निवेदन दिले की, केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यात असलेल्या वाहनाने रमण यांना चिरडले आणि गोळ्या घातल्या. पण, आता अनेक पत्रकार आणि स्थानिक लोक आम्हाला आमचे वक्तव्य बदलण्यास सांगत आहेत. रमण यांना शेतकऱ्यांनी मारहाण केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला, असं सांगण्यात दबाव टाकत असल्याची माहिती पवन यांनी दिली.

रमणच्या कुटुंबीयांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाला नाही

पवन पुढे म्हणाले, माझा भाऊ पत्रकार होता पण आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत. आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने बोलणार. आम्हाला अद्याप रमणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळालेला नाही. आमची तक्रार दुसऱ्या एफआयआरशी जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि शेतकर्‍यांच्या एफआयआरमध्ये आमची तक्रारही जोडली जाऊ शकत नाही, असे आम्हाला सांगण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारUttar Pradeshउत्तर प्रदेश