शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Lakhimpur Kheri Incident: केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांनी ४ दिवसांत राजीनामा द्यावा, अन्यथा...; राकेश टिकैतांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 05:54 IST

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिषला अटक करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

रामपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी येत्या मंगळवारी, १२ ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा तसेच या प्रकरणातील आरोपींना अटक झाली पाहिजे, तसे न झाल्यास या मुद्द्यावरून शेतकरी देशव्यापी आंदोलन करतील, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेश सरकार व केंद्राला दिला आहे. 

रामपूर येथे शेतकऱ्यांच्या एका सभेत टिकैत बोलत होते. विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेश सरकार व केंद्राचा तीव्र निषेध केला होता. लखीमपूर खेरी येथील हिंसाचारानंतर त्या घटनेचा धिक्कार करण्यासाठी शेतकरी काही ठिकाणी रस्त्यावर उतरले होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिषला अटक करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारात मरण पावलेल्या चार शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्रत्येकी ४५ लाख रुपये व सरकारी नोकरी तसेच जखमींना १० लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने ४ ऑक्टोबर रोजी केली होती. हा निर्णय घेण्याआधी त्या सरकारने शेतकरी संघटनांशी चर्चा केली होती. 

वरुण यांनी भाजप सोडून आंदोलन करावे -लांबा शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल भाजप नेते वरुण गांधी यांना प्रामाणिकपणे काही वाटत असेल तर त्यांनी भाजपला सोडून देऊन आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना रस्त्यावर येऊन पाठिंबा दिला पाहिजे, असे काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी म्हटले.

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारrakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलन