शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

Lakhimpur Kheri Updates: शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे देशभरात संताप; UP सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना ४५ लाख आणि नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 08:09 IST

वातावरण शांत करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख, कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी आणि जखमींना १० लाख रुपये अशी घोषणा केली आहे

ठळक मुद्देमृतांच्या नातेवाईकांना भेटण्यास  जाऊ पाहणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी व सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना पोलिसांनी अटक केलीराज्यात विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यांवर असताना हे घडल्याने भाजप नेते हादरले आहेत.केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्र यांना मंत्रिपदावरून हटवावे व त्यांचा मुलगा आशिष मिश्र याला अटक करावी

लखनऊ : लखीमपूर खेरी येथे रविवारी शेतकऱ्यांच्या निदर्शनांवेळी झालेल्या हिंसाचारात आठ जण ठार झाल्यामुळे देशभर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, सोमवारी सर्वत्र राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी निदर्शने केली. पोलिसांनी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र यांच्या मुलाविरुद्धही गुन्हा नोंदविला आहे.

वातावरण शांत करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख, कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी आणि जखमींना १० लाख रुपये अशी घोषणा केली आहे. झाल्या प्रकाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाद्वारे चौकशी केली जाईल. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांच्या मुलास अटक करावी, अशी मागणी काँग्रेस व शेतकरी संघटनांनी केली आहे. त्यानेच शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घातले, असा आरोप आहे. मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यास  जाऊ पाहणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी व सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना पोलिसांनी अटक केली. राज्यात विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यांवर असताना हे घडल्याने भाजप नेते हादरले आहेत. शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने वाहन घातल्याने चार जण मरण पावले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

प्रियांका गांधींनी पोलिसांना सुनावलेप्रियांका गांधी यांना रविवारी मध्यरात्री लखनऊमध्ये अडवण्यात आले. तेथून त्या पुढे निघाल्यानंतर सीतापूर येथे अडवण्यात आले. मात्र, पोलिसांकडे अटक वॉरंट नव्हते. तिथे महिला पोलीसही नव्हत्या. अशा स्थितीत तुम्ही आपणास अटक करू शकत नाही, असे प्रियंका यांनी पोलिसांना ऐकवले. त्यामुळे नंतर त्यांना वॉरंट व महिला पोलीस यांच्या उपस्थितीत अटक करण्यात आली.

मिश्र यांना मंत्रिपदावरून हटवा : टिकैतकेंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्र यांना मंत्रिपदावरून हटवावे व त्यांचा मुलगा आशिष मिश्र याला अटक करावी, अशी मागणी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. माझ्यावरचे आरोप खोटे असून शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या जागी आपण उपस्थित नव्हतो, असा दावा आशिष मिश्र यांनी केला आहे. 

छावणीचे स्वरूपलखीमपूरमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त असून, तिथे धडक कृती दलाच्या तुकड्या ठेवण्यात आल्या आहेत. तिथे सध्या शांतता आहे. पण, लखनऊसह उत्तर प्रदेशातील सर्व जिल्हय़ांत आज उग्र निदर्शने झाली. अखिलेश यादव यांना अटक करण्यात आली, तेव्हा तिथे त्यांचे हजारो समर्थक जमले होते. त्यांनी पोलिसांची जीपच जाळली. लखीमपूरला विरोधी नेत्यांना येण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल व पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी जाऊ शकले नाहीत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशFarmers Protestशेतकरी आंदोलन