शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Lakhimpur Kheri Updates: शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे देशभरात संताप; UP सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना ४५ लाख आणि नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 08:09 IST

वातावरण शांत करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख, कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी आणि जखमींना १० लाख रुपये अशी घोषणा केली आहे

ठळक मुद्देमृतांच्या नातेवाईकांना भेटण्यास  जाऊ पाहणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी व सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना पोलिसांनी अटक केलीराज्यात विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यांवर असताना हे घडल्याने भाजप नेते हादरले आहेत.केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्र यांना मंत्रिपदावरून हटवावे व त्यांचा मुलगा आशिष मिश्र याला अटक करावी

लखनऊ : लखीमपूर खेरी येथे रविवारी शेतकऱ्यांच्या निदर्शनांवेळी झालेल्या हिंसाचारात आठ जण ठार झाल्यामुळे देशभर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, सोमवारी सर्वत्र राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी निदर्शने केली. पोलिसांनी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र यांच्या मुलाविरुद्धही गुन्हा नोंदविला आहे.

वातावरण शांत करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख, कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी आणि जखमींना १० लाख रुपये अशी घोषणा केली आहे. झाल्या प्रकाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाद्वारे चौकशी केली जाईल. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांच्या मुलास अटक करावी, अशी मागणी काँग्रेस व शेतकरी संघटनांनी केली आहे. त्यानेच शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घातले, असा आरोप आहे. मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यास  जाऊ पाहणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी व सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना पोलिसांनी अटक केली. राज्यात विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यांवर असताना हे घडल्याने भाजप नेते हादरले आहेत. शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने वाहन घातल्याने चार जण मरण पावले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

प्रियांका गांधींनी पोलिसांना सुनावलेप्रियांका गांधी यांना रविवारी मध्यरात्री लखनऊमध्ये अडवण्यात आले. तेथून त्या पुढे निघाल्यानंतर सीतापूर येथे अडवण्यात आले. मात्र, पोलिसांकडे अटक वॉरंट नव्हते. तिथे महिला पोलीसही नव्हत्या. अशा स्थितीत तुम्ही आपणास अटक करू शकत नाही, असे प्रियंका यांनी पोलिसांना ऐकवले. त्यामुळे नंतर त्यांना वॉरंट व महिला पोलीस यांच्या उपस्थितीत अटक करण्यात आली.

मिश्र यांना मंत्रिपदावरून हटवा : टिकैतकेंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्र यांना मंत्रिपदावरून हटवावे व त्यांचा मुलगा आशिष मिश्र याला अटक करावी, अशी मागणी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. माझ्यावरचे आरोप खोटे असून शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या जागी आपण उपस्थित नव्हतो, असा दावा आशिष मिश्र यांनी केला आहे. 

छावणीचे स्वरूपलखीमपूरमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त असून, तिथे धडक कृती दलाच्या तुकड्या ठेवण्यात आल्या आहेत. तिथे सध्या शांतता आहे. पण, लखनऊसह उत्तर प्रदेशातील सर्व जिल्हय़ांत आज उग्र निदर्शने झाली. अखिलेश यादव यांना अटक करण्यात आली, तेव्हा तिथे त्यांचे हजारो समर्थक जमले होते. त्यांनी पोलिसांची जीपच जाळली. लखीमपूरला विरोधी नेत्यांना येण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल व पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी जाऊ शकले नाहीत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशFarmers Protestशेतकरी आंदोलन