शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Lakhimpur Kheri Updates: शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे देशभरात संताप; UP सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना ४५ लाख आणि नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 08:09 IST

वातावरण शांत करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख, कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी आणि जखमींना १० लाख रुपये अशी घोषणा केली आहे

ठळक मुद्देमृतांच्या नातेवाईकांना भेटण्यास  जाऊ पाहणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी व सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना पोलिसांनी अटक केलीराज्यात विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यांवर असताना हे घडल्याने भाजप नेते हादरले आहेत.केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्र यांना मंत्रिपदावरून हटवावे व त्यांचा मुलगा आशिष मिश्र याला अटक करावी

लखनऊ : लखीमपूर खेरी येथे रविवारी शेतकऱ्यांच्या निदर्शनांवेळी झालेल्या हिंसाचारात आठ जण ठार झाल्यामुळे देशभर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, सोमवारी सर्वत्र राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी निदर्शने केली. पोलिसांनी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र यांच्या मुलाविरुद्धही गुन्हा नोंदविला आहे.

वातावरण शांत करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख, कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी आणि जखमींना १० लाख रुपये अशी घोषणा केली आहे. झाल्या प्रकाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाद्वारे चौकशी केली जाईल. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांच्या मुलास अटक करावी, अशी मागणी काँग्रेस व शेतकरी संघटनांनी केली आहे. त्यानेच शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घातले, असा आरोप आहे. मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यास  जाऊ पाहणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी व सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना पोलिसांनी अटक केली. राज्यात विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यांवर असताना हे घडल्याने भाजप नेते हादरले आहेत. शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने वाहन घातल्याने चार जण मरण पावले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

प्रियांका गांधींनी पोलिसांना सुनावलेप्रियांका गांधी यांना रविवारी मध्यरात्री लखनऊमध्ये अडवण्यात आले. तेथून त्या पुढे निघाल्यानंतर सीतापूर येथे अडवण्यात आले. मात्र, पोलिसांकडे अटक वॉरंट नव्हते. तिथे महिला पोलीसही नव्हत्या. अशा स्थितीत तुम्ही आपणास अटक करू शकत नाही, असे प्रियंका यांनी पोलिसांना ऐकवले. त्यामुळे नंतर त्यांना वॉरंट व महिला पोलीस यांच्या उपस्थितीत अटक करण्यात आली.

मिश्र यांना मंत्रिपदावरून हटवा : टिकैतकेंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्र यांना मंत्रिपदावरून हटवावे व त्यांचा मुलगा आशिष मिश्र याला अटक करावी, अशी मागणी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. माझ्यावरचे आरोप खोटे असून शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या जागी आपण उपस्थित नव्हतो, असा दावा आशिष मिश्र यांनी केला आहे. 

छावणीचे स्वरूपलखीमपूरमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त असून, तिथे धडक कृती दलाच्या तुकड्या ठेवण्यात आल्या आहेत. तिथे सध्या शांतता आहे. पण, लखनऊसह उत्तर प्रदेशातील सर्व जिल्हय़ांत आज उग्र निदर्शने झाली. अखिलेश यादव यांना अटक करण्यात आली, तेव्हा तिथे त्यांचे हजारो समर्थक जमले होते. त्यांनी पोलिसांची जीपच जाळली. लखीमपूरला विरोधी नेत्यांना येण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल व पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी जाऊ शकले नाहीत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशFarmers Protestशेतकरी आंदोलन