शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! रुग्णवाहिका न मिळाल्याने हतबल मुलांनी बाईकवरून घरी आणला वडिलांचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 16:08 IST

Uttar Pradesh News : दोन मुलं बाईकवरून वडिलांचा मृतदेह घरी घेऊन येत असल्याचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी जिल्ह्यामध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. खूप प्रयत्नांनंतरही रुग्णवाहिका न मिळाल्याने शेवटी हतबल झालेल्या दोन मुलांनी बाईकवरून वडिलांचा मृतदेह घरी आणला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच मुलांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूसाठी डॉक्टरांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दोन मुलं बाईकवरून वडिलांचा मृतदेह घरी घेऊन येत असल्याचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, खमरिया येथील एका गावात राहणारे 78 वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांनी सर्वात आधी 108 नंबरवर रुग्णवाहिकेसाठी फोन केला. मात्र खूप वेळ झाला तरी देखील रुग्णवाहिका आलीच नाही. त्यानंतर मुलांनी बाईकवरूनच वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे उपचार करण्यास उशीर झाला आणि वडिलांचा मृत्यू झाला असा आरोप मुलांनी केला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मृतदेह घेऊन जाण्यासाठी मुलांनी पुन्हा एकदा रुग्णवाहिकेसाठी फोन केला. 

रुग्णवाहिकेची बराच वेळ वाट पाहिली मात्र ती आलीच नाही. त्यामुळे मुलांनी बाईकवरूनच वडिलांचा मृतदेह नेण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावरून बाईकने मृतदेह घेऊन जात असताना अनेकांनी याचे फोटो काढले. ते फोटो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये रुग्णावाहिकेच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सर्व जिल्ह्यांत पाच हजारांहून अधिक रुग्णवाहिका या उभ्या आहेत. मात्र रुग्णांची यामुळे वणवण होत आहे. तर काहींना यामुळे वेळेत उपचार मिळत नसल्याने आपली जीव गमवावा लागत आहेय. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कुटुंब म्हणतंय हत्या, पोलीस म्हणताहेत आत्महत्या; 'तिच्या' मृत्यूचं गूढ उकलेना; नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. दीनदयाल उपाध्याय गोरखपूर विश्वविद्यालयातील विभागात एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर पोलीस आत्महत्या झाल्याचं म्हणत आहेत. यामुळेच या मृत्यू प्रकरणाचं कोडं अद्याप उलगडलेलं नाही. गोरखपूरचे एसएसपी दिनेश कुमार प्रभू यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टचा हवाला देत गळफास घेतल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. मात्र नातेवाईकांनी हत्येची तक्रार दाखल केली आहे. दिनेश कुमार प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलै रोजी विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला आहे. तिने गळफास घेतला होता. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतdoctorडॉक्टर