शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हृदयद्रावक! रुग्णवाहिका न मिळाल्याने हतबल मुलांनी बाईकवरून घरी आणला वडिलांचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 16:08 IST

Uttar Pradesh News : दोन मुलं बाईकवरून वडिलांचा मृतदेह घरी घेऊन येत असल्याचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी जिल्ह्यामध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. खूप प्रयत्नांनंतरही रुग्णवाहिका न मिळाल्याने शेवटी हतबल झालेल्या दोन मुलांनी बाईकवरून वडिलांचा मृतदेह घरी आणला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच मुलांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूसाठी डॉक्टरांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दोन मुलं बाईकवरून वडिलांचा मृतदेह घरी घेऊन येत असल्याचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, खमरिया येथील एका गावात राहणारे 78 वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांनी सर्वात आधी 108 नंबरवर रुग्णवाहिकेसाठी फोन केला. मात्र खूप वेळ झाला तरी देखील रुग्णवाहिका आलीच नाही. त्यानंतर मुलांनी बाईकवरूनच वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे उपचार करण्यास उशीर झाला आणि वडिलांचा मृत्यू झाला असा आरोप मुलांनी केला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मृतदेह घेऊन जाण्यासाठी मुलांनी पुन्हा एकदा रुग्णवाहिकेसाठी फोन केला. 

रुग्णवाहिकेची बराच वेळ वाट पाहिली मात्र ती आलीच नाही. त्यामुळे मुलांनी बाईकवरूनच वडिलांचा मृतदेह नेण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावरून बाईकने मृतदेह घेऊन जात असताना अनेकांनी याचे फोटो काढले. ते फोटो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये रुग्णावाहिकेच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सर्व जिल्ह्यांत पाच हजारांहून अधिक रुग्णवाहिका या उभ्या आहेत. मात्र रुग्णांची यामुळे वणवण होत आहे. तर काहींना यामुळे वेळेत उपचार मिळत नसल्याने आपली जीव गमवावा लागत आहेय. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कुटुंब म्हणतंय हत्या, पोलीस म्हणताहेत आत्महत्या; 'तिच्या' मृत्यूचं गूढ उकलेना; नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. दीनदयाल उपाध्याय गोरखपूर विश्वविद्यालयातील विभागात एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर पोलीस आत्महत्या झाल्याचं म्हणत आहेत. यामुळेच या मृत्यू प्रकरणाचं कोडं अद्याप उलगडलेलं नाही. गोरखपूरचे एसएसपी दिनेश कुमार प्रभू यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टचा हवाला देत गळफास घेतल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. मात्र नातेवाईकांनी हत्येची तक्रार दाखल केली आहे. दिनेश कुमार प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलै रोजी विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला आहे. तिने गळफास घेतला होता. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतdoctorडॉक्टर