शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

'लखीमपूरची घटना केवळ अपघात, गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे अन्यायपूर्वक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 13:54 IST

शेतकऱ्यांनी या घटनेनंतर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्राचे नाव आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या तपास पथकाने हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे म्हटले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी या घटनेनंतर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्राचे नाव आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या तपास पथकाने हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे म्हटले.

नवी दिल्ली - देशात गाजलेल्या लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराचा मुद्दा आज संसेदत गाजत आहे. मात्र, यासंदर्भात बोलताना केंद्रीयमंत्रीनितीन गडकरी यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. आशिष मिश्रा यांच्या एसयूव्हीने शेतकर्‍यांना चिरडले होते, या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर हिंसाचार उसळला आणि आणखी चार जणांना आपला जीव गमवावा लागला.

शेतकऱ्यांनी या घटनेनंतर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्राचे नाव आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या तपास पथकाने हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे म्हटले. मात्र, लखीमपूर खेरी येथील घटना केवळ अपघात असल्याचं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. ''लखीमपूर येथील घटना ही जबरदस्ती नसून केवळ अपघात असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं. हे बघा, ते अन्यापूर्वक आहे, या घटनेची सविस्तरपणे माहिती आली आहे. जाणीवपूर्वक भावनेनं ही घटना घडली नसून हा एक अपघात आहे,'' या घटनेचं कुणीही राजकारण करू नये, असे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. 

हा तर पूर्वनियोजित कट

लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांवर गाडी चढवणे, हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता. विशेष तपास पथकाने (SIT) याबबातची माहिती दिली आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस पथकाने आशिष मिश्रा यांच्यावरील आरोपांमध्ये सुधारणा करण्यात यावी, असे पत्र न्यायाधीशांना लिहिले आहे. आशिष मिश्रा आणि इतरांवर यापूर्वीच खून आणि कट रचण्याचे आरोप आहेत. त्यात खुनाचा प्रयत्न आणि इतर आरोपही जोडले जावेत, अशी विशेष तपास पथकाची इच्छा आहे. 

विरोधकांनी संसदेत उठवला आवाज

दरम्यान, सत्ताधारी भाजप यूपीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असताना, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यासाठी लखीमपूर घटनेच्या घडामोडी मोठ्या डोकेदुखी ठरू शकतात. या घटनेनंतर विरोधकांकडून अजय मिश्रा यांना हटवण्याची मागणी सातत्याने होत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे. लखीमपूर खेरीच्या घटनेबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, आज संसदेतही विरोधकांनी मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारBJPभाजपाministerमंत्री