शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

Lakhimpur Case: दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ, चार जण ताब्यात, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 08:38 IST

Lakhimpur Case: याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून चार जणांना ताब्यात घेतले आहे.

लखीमपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये (Lakhimpur) बुधवारी दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण लखीमपूर खेरी येथील निघासन (Nighasan) कोतवालीचे आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस भादंविच्या कलम 302, 323, 452 आणि 376 नुसार गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास करत आहेत. 

याप्रकरणी मृत मुलींच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केला आहे. आरोपींनी दोन्ही मुलींना घरातून पळवून नेले, बलात्कार करून त्यांची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ही संपूर्ण घटना निघासन कोतवाली परिसरातील तमोलिनपुरवा गावातील आहे. लखनऊ रेंजच्या आयजी लक्ष्मी सिंह या घटनेचा तपास करत आहेत. "लखीमपूर खेरी येथील गावाबाहेरील एका शेतात दोन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. मृतदेहांवर कोणतीही जखम आढळली नाही. शवविच्छेदनानंतर इतर गोष्टी कळतील, तपास सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले डीएम?लखीमपूरचे डीएम महेंद्र बहादूर सिंह यांनी फोनवरून एक वृत्तवाहिनीला या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. दोन्ही मुलींच्या शवविच्छेदनानंतर हत्येचे कारण समजेल, असे त्यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी दोन्ही मुलींचे पोस्टमार्टम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेबाबत उत्तर प्रदेशचे एडीजी (ADG) कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनीही भाष्य केले आहे. लखीमपूर येथील घरापासून काही अंतरावर दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. एसपी घटनास्थळी पोहोचले आहेत. नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व प्रकरणाचा योग्यरित्या तपास करण्यात येईल, असेही प्रशांत कुमार यांनी म्हटले आहे.

विरोधकांचा सरकारवर जोरदार निशाणाया प्रकरणावरून लखीमपूरमध्ये वातावरण तापले आहे. विरोधकांनी योगी सरकारला निशाण्यावर धरले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ''निघासन पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन बहिणींचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. तर पीडित मुलींच्या वडीलांनी पोलिसांवर आरोप केले आहेत की, पंचनामा आणि कुटुंबीयांच्या सहमतीशिवाय मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्यात आले. लखीमपूरमधील शेतकऱ्यांनंतर आता दलितांच्या हत्या 'हाथरस'मधील घटनेची पुनरावृत्ती आहे.''

महिलांवरील गुन्हे का वाढत आहेत? प्रियंका गांधींचा सवालकाँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला आहे. "उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे दोन बहिणींच्या हत्येची घटना हृदयद्रावक आहे. कुटुंबियांचा आरोप आहे की त्या मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आलं होतं. वृत्तपत्रे आणि टीव्हीवर दररोज खोट्या जाहिराती दिल्याने कायदा आणि सुव्यवस्था चांगली होत नाही. उत्तर प्रदेशामध्ये महिलांवरील गुन्हे का वाढत आहेत? " असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी