शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

Lakhimpur Case: दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ, चार जण ताब्यात, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 08:38 IST

Lakhimpur Case: याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून चार जणांना ताब्यात घेतले आहे.

लखीमपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये (Lakhimpur) बुधवारी दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण लखीमपूर खेरी येथील निघासन (Nighasan) कोतवालीचे आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस भादंविच्या कलम 302, 323, 452 आणि 376 नुसार गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास करत आहेत. 

याप्रकरणी मृत मुलींच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केला आहे. आरोपींनी दोन्ही मुलींना घरातून पळवून नेले, बलात्कार करून त्यांची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ही संपूर्ण घटना निघासन कोतवाली परिसरातील तमोलिनपुरवा गावातील आहे. लखनऊ रेंजच्या आयजी लक्ष्मी सिंह या घटनेचा तपास करत आहेत. "लखीमपूर खेरी येथील गावाबाहेरील एका शेतात दोन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. मृतदेहांवर कोणतीही जखम आढळली नाही. शवविच्छेदनानंतर इतर गोष्टी कळतील, तपास सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले डीएम?लखीमपूरचे डीएम महेंद्र बहादूर सिंह यांनी फोनवरून एक वृत्तवाहिनीला या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. दोन्ही मुलींच्या शवविच्छेदनानंतर हत्येचे कारण समजेल, असे त्यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी दोन्ही मुलींचे पोस्टमार्टम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेबाबत उत्तर प्रदेशचे एडीजी (ADG) कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनीही भाष्य केले आहे. लखीमपूर येथील घरापासून काही अंतरावर दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. एसपी घटनास्थळी पोहोचले आहेत. नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व प्रकरणाचा योग्यरित्या तपास करण्यात येईल, असेही प्रशांत कुमार यांनी म्हटले आहे.

विरोधकांचा सरकारवर जोरदार निशाणाया प्रकरणावरून लखीमपूरमध्ये वातावरण तापले आहे. विरोधकांनी योगी सरकारला निशाण्यावर धरले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ''निघासन पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन बहिणींचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. तर पीडित मुलींच्या वडीलांनी पोलिसांवर आरोप केले आहेत की, पंचनामा आणि कुटुंबीयांच्या सहमतीशिवाय मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्यात आले. लखीमपूरमधील शेतकऱ्यांनंतर आता दलितांच्या हत्या 'हाथरस'मधील घटनेची पुनरावृत्ती आहे.''

महिलांवरील गुन्हे का वाढत आहेत? प्रियंका गांधींचा सवालकाँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला आहे. "उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे दोन बहिणींच्या हत्येची घटना हृदयद्रावक आहे. कुटुंबियांचा आरोप आहे की त्या मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आलं होतं. वृत्तपत्रे आणि टीव्हीवर दररोज खोट्या जाहिराती दिल्याने कायदा आणि सुव्यवस्था चांगली होत नाही. उत्तर प्रदेशामध्ये महिलांवरील गुन्हे का वाढत आहेत? " असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी