शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Lakhimpur Case: दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ, चार जण ताब्यात, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 08:38 IST

Lakhimpur Case: याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून चार जणांना ताब्यात घेतले आहे.

लखीमपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये (Lakhimpur) बुधवारी दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण लखीमपूर खेरी येथील निघासन (Nighasan) कोतवालीचे आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस भादंविच्या कलम 302, 323, 452 आणि 376 नुसार गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास करत आहेत. 

याप्रकरणी मृत मुलींच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केला आहे. आरोपींनी दोन्ही मुलींना घरातून पळवून नेले, बलात्कार करून त्यांची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ही संपूर्ण घटना निघासन कोतवाली परिसरातील तमोलिनपुरवा गावातील आहे. लखनऊ रेंजच्या आयजी लक्ष्मी सिंह या घटनेचा तपास करत आहेत. "लखीमपूर खेरी येथील गावाबाहेरील एका शेतात दोन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. मृतदेहांवर कोणतीही जखम आढळली नाही. शवविच्छेदनानंतर इतर गोष्टी कळतील, तपास सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले डीएम?लखीमपूरचे डीएम महेंद्र बहादूर सिंह यांनी फोनवरून एक वृत्तवाहिनीला या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. दोन्ही मुलींच्या शवविच्छेदनानंतर हत्येचे कारण समजेल, असे त्यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी दोन्ही मुलींचे पोस्टमार्टम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेबाबत उत्तर प्रदेशचे एडीजी (ADG) कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनीही भाष्य केले आहे. लखीमपूर येथील घरापासून काही अंतरावर दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. एसपी घटनास्थळी पोहोचले आहेत. नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व प्रकरणाचा योग्यरित्या तपास करण्यात येईल, असेही प्रशांत कुमार यांनी म्हटले आहे.

विरोधकांचा सरकारवर जोरदार निशाणाया प्रकरणावरून लखीमपूरमध्ये वातावरण तापले आहे. विरोधकांनी योगी सरकारला निशाण्यावर धरले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ''निघासन पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन बहिणींचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. तर पीडित मुलींच्या वडीलांनी पोलिसांवर आरोप केले आहेत की, पंचनामा आणि कुटुंबीयांच्या सहमतीशिवाय मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्यात आले. लखीमपूरमधील शेतकऱ्यांनंतर आता दलितांच्या हत्या 'हाथरस'मधील घटनेची पुनरावृत्ती आहे.''

महिलांवरील गुन्हे का वाढत आहेत? प्रियंका गांधींचा सवालकाँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला आहे. "उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे दोन बहिणींच्या हत्येची घटना हृदयद्रावक आहे. कुटुंबियांचा आरोप आहे की त्या मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आलं होतं. वृत्तपत्रे आणि टीव्हीवर दररोज खोट्या जाहिराती दिल्याने कायदा आणि सुव्यवस्था चांगली होत नाही. उत्तर प्रदेशामध्ये महिलांवरील गुन्हे का वाढत आहेत? " असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी