शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

चिंता वाढली! नव्या संकटाचा इशारा, देशाला केदारनाथपेक्षाही मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा धोका, रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 13:40 IST

Natural Disaster : भारतासह देशात एक भयंकर नैसर्गिक संकट, मोठी आपत्ती निर्माण होऊ शकते. एका रिपोर्टमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - लडाखमध्ये गोठलेला बर्फ वितळू लागला तर काय होईल याचा अंदाज करणं खूप कठीण आहे. मात्र जर असं झालं तर उत्तर भारतासह देशात एक भयंकर नैसर्गिक संकट, मोठी आपत्ती निर्माण होऊ शकते. एका रिपोर्टमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे लडाखमधील ग्लेशिअर आणि गोठलेली तलावांना धोका निर्माण झाला आहे. लडाख हे जगातील सर्वोच्च स्थानांपैकी एक आहे. येथे अत्यंत कमी तापमान आहे. हिवाळ्यात तापमान -16 पर्यंत असते. मात्र, वेगाने वाढणार्‍या तापमानामुळे लडाखमधील ग्लेशिअर वितळत आहेत. 

बर्फाचे तलावही वितळत आहेत. तलावांमध्ये बर्फ वितळल्यास हिमालय प्रदेशात पूर येऊ शकतो. दक्षिण आशिया संस्था आणि हीडलबर्ग सेंटर फॉर द एनव्हायरनमेंट ऑफ रुपर्टो कॅरोला येथील संशोधकांनी लडाखमधील बर्फाळ परिसरात संशोधन केले. भूगर्भशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्कस नुसरर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखच्या ग्लेशिअर रिसर्चसाठी सॅटेलाइट फोटोंचा वापर केला गेला. ग्लेशिअरचे बर्फ वेगाने वितळल्यास हिमालयातील सखल भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

देशात केदारनाथमध्ये आलेल्या पूरावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ग्लेशिअर फुटून कधीही पूर येऊ शकतो. म्हणूनच भारतासह सर्व आशियाई देशांनी ग्लोबल वार्मिंग कमी करण्याचा प्रयत्न करणं अत्यंत महत्वाचं आहे. भविष्यात असे पूर कसे टाळावे हे आमच्या अभ्यासातून समोर येत आहे असं नुसरेर यांनी म्हटलं आहे. ग्लेशिअर तुटल्यामुळे जो पूर येतो त्याला आउटब्रस्ट फ्लड्स (GLOFS) म्हणतात. हा अभ्यास नॅचरल हॅजर्ड्स नावाच्या सायन्स मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

फक्त भारताच्या लडाख भागातील ग्लेशिअरच वितळत नाही आहेत तर, हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंगमुळे जगभरातील अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नुसरेर यांच्या टीमने ऑगस्ट 2014 लडाखमध्ये आलेल्या पुराचा अभ्यास केला आहे. पुराचा फटका हा शेकडो घरं, शेतीला मोठ्या प्रमाणात बसतो. जनजीवन विस्कळीत होऊन मोठं नुकसान होतं. ऑगस्ट 2014मध्ये लडाखमध्ये जो पूर आला तो भाग 5300 मीटर उंचीवर आहे. जेव्हा पाण्याचा प्रवाह मोठा असेल तेव्हा खूप नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरातील संशोधक ग्लोबल वार्मिंग कमी करण्याचे आवाहन सर्वांना देशांना करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Indiaभारतfloodपूर