शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

चिंता वाढली! नव्या संकटाचा इशारा, देशाला केदारनाथपेक्षाही मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा धोका, रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 13:40 IST

Natural Disaster : भारतासह देशात एक भयंकर नैसर्गिक संकट, मोठी आपत्ती निर्माण होऊ शकते. एका रिपोर्टमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - लडाखमध्ये गोठलेला बर्फ वितळू लागला तर काय होईल याचा अंदाज करणं खूप कठीण आहे. मात्र जर असं झालं तर उत्तर भारतासह देशात एक भयंकर नैसर्गिक संकट, मोठी आपत्ती निर्माण होऊ शकते. एका रिपोर्टमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे लडाखमधील ग्लेशिअर आणि गोठलेली तलावांना धोका निर्माण झाला आहे. लडाख हे जगातील सर्वोच्च स्थानांपैकी एक आहे. येथे अत्यंत कमी तापमान आहे. हिवाळ्यात तापमान -16 पर्यंत असते. मात्र, वेगाने वाढणार्‍या तापमानामुळे लडाखमधील ग्लेशिअर वितळत आहेत. 

बर्फाचे तलावही वितळत आहेत. तलावांमध्ये बर्फ वितळल्यास हिमालय प्रदेशात पूर येऊ शकतो. दक्षिण आशिया संस्था आणि हीडलबर्ग सेंटर फॉर द एनव्हायरनमेंट ऑफ रुपर्टो कॅरोला येथील संशोधकांनी लडाखमधील बर्फाळ परिसरात संशोधन केले. भूगर्भशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्कस नुसरर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखच्या ग्लेशिअर रिसर्चसाठी सॅटेलाइट फोटोंचा वापर केला गेला. ग्लेशिअरचे बर्फ वेगाने वितळल्यास हिमालयातील सखल भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

देशात केदारनाथमध्ये आलेल्या पूरावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ग्लेशिअर फुटून कधीही पूर येऊ शकतो. म्हणूनच भारतासह सर्व आशियाई देशांनी ग्लोबल वार्मिंग कमी करण्याचा प्रयत्न करणं अत्यंत महत्वाचं आहे. भविष्यात असे पूर कसे टाळावे हे आमच्या अभ्यासातून समोर येत आहे असं नुसरेर यांनी म्हटलं आहे. ग्लेशिअर तुटल्यामुळे जो पूर येतो त्याला आउटब्रस्ट फ्लड्स (GLOFS) म्हणतात. हा अभ्यास नॅचरल हॅजर्ड्स नावाच्या सायन्स मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

फक्त भारताच्या लडाख भागातील ग्लेशिअरच वितळत नाही आहेत तर, हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंगमुळे जगभरातील अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नुसरेर यांच्या टीमने ऑगस्ट 2014 लडाखमध्ये आलेल्या पुराचा अभ्यास केला आहे. पुराचा फटका हा शेकडो घरं, शेतीला मोठ्या प्रमाणात बसतो. जनजीवन विस्कळीत होऊन मोठं नुकसान होतं. ऑगस्ट 2014मध्ये लडाखमध्ये जो पूर आला तो भाग 5300 मीटर उंचीवर आहे. जेव्हा पाण्याचा प्रवाह मोठा असेल तेव्हा खूप नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरातील संशोधक ग्लोबल वार्मिंग कमी करण्याचे आवाहन सर्वांना देशांना करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Indiaभारतfloodपूर