शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

चिंता वाढली! नव्या संकटाचा इशारा, देशाला केदारनाथपेक्षाही मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा धोका, रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 13:40 IST

Natural Disaster : भारतासह देशात एक भयंकर नैसर्गिक संकट, मोठी आपत्ती निर्माण होऊ शकते. एका रिपोर्टमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - लडाखमध्ये गोठलेला बर्फ वितळू लागला तर काय होईल याचा अंदाज करणं खूप कठीण आहे. मात्र जर असं झालं तर उत्तर भारतासह देशात एक भयंकर नैसर्गिक संकट, मोठी आपत्ती निर्माण होऊ शकते. एका रिपोर्टमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे लडाखमधील ग्लेशिअर आणि गोठलेली तलावांना धोका निर्माण झाला आहे. लडाख हे जगातील सर्वोच्च स्थानांपैकी एक आहे. येथे अत्यंत कमी तापमान आहे. हिवाळ्यात तापमान -16 पर्यंत असते. मात्र, वेगाने वाढणार्‍या तापमानामुळे लडाखमधील ग्लेशिअर वितळत आहेत. 

बर्फाचे तलावही वितळत आहेत. तलावांमध्ये बर्फ वितळल्यास हिमालय प्रदेशात पूर येऊ शकतो. दक्षिण आशिया संस्था आणि हीडलबर्ग सेंटर फॉर द एनव्हायरनमेंट ऑफ रुपर्टो कॅरोला येथील संशोधकांनी लडाखमधील बर्फाळ परिसरात संशोधन केले. भूगर्भशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्कस नुसरर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखच्या ग्लेशिअर रिसर्चसाठी सॅटेलाइट फोटोंचा वापर केला गेला. ग्लेशिअरचे बर्फ वेगाने वितळल्यास हिमालयातील सखल भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

देशात केदारनाथमध्ये आलेल्या पूरावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ग्लेशिअर फुटून कधीही पूर येऊ शकतो. म्हणूनच भारतासह सर्व आशियाई देशांनी ग्लोबल वार्मिंग कमी करण्याचा प्रयत्न करणं अत्यंत महत्वाचं आहे. भविष्यात असे पूर कसे टाळावे हे आमच्या अभ्यासातून समोर येत आहे असं नुसरेर यांनी म्हटलं आहे. ग्लेशिअर तुटल्यामुळे जो पूर येतो त्याला आउटब्रस्ट फ्लड्स (GLOFS) म्हणतात. हा अभ्यास नॅचरल हॅजर्ड्स नावाच्या सायन्स मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

फक्त भारताच्या लडाख भागातील ग्लेशिअरच वितळत नाही आहेत तर, हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंगमुळे जगभरातील अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नुसरेर यांच्या टीमने ऑगस्ट 2014 लडाखमध्ये आलेल्या पुराचा अभ्यास केला आहे. पुराचा फटका हा शेकडो घरं, शेतीला मोठ्या प्रमाणात बसतो. जनजीवन विस्कळीत होऊन मोठं नुकसान होतं. ऑगस्ट 2014मध्ये लडाखमध्ये जो पूर आला तो भाग 5300 मीटर उंचीवर आहे. जेव्हा पाण्याचा प्रवाह मोठा असेल तेव्हा खूप नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरातील संशोधक ग्लोबल वार्मिंग कमी करण्याचे आवाहन सर्वांना देशांना करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Indiaभारतfloodपूर