शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

संसदेत कायदे बनविण्याच्या प्रक्रियेत चर्चेचा अभाव, सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 06:03 IST

Chief Justice of India N.V. Ramana : ते म्हणाले की, संसदेमध्ये होणाऱ्या नव्या कायद्यांमध्ये संदिग्धता असते. हे कायदे करण्याचा हेतू न्यायालयाला माहीत नसतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संसदेत अतिशय अभ्यासू चर्चा होत असत.

नवी दिल्ली : संसदेमध्ये कायदे बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये अभ्यासपूर्ण चर्चेचा अभाव आहे, अशी टीका सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी केली आहे. स्वातंत्र्यदिनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केल्यानंतर सरन्यायाधीशांनी आपल्या भाषणात हे वक्तव्य केले.ते म्हणाले की, संसदेमध्ये होणाऱ्या नव्या कायद्यांमध्ये संदिग्धता असते. हे कायदे करण्याचा हेतू न्यायालयाला माहीत नसतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संसदेत अतिशय अभ्यासू चर्चा होत असत. त्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहांत विधायक हेतूने व विवेक राखून चर्चा केली जात असे.त्यांनी सांगितले की, सध्या संसदेमध्ये अभ्यासपूर्ण चर्चेअभावी कायदे बनतात. कायदे बनविताना पुरेशी चर्चा झालेली नसल्याने हे नवीन कायदे बनविण्यामागचे हेतू न्यायालयाला कळू शकत नाहीत. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात अनेक वकील संसदेत खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्या वकिलांमुळेच कदाचित संसदेत तेव्हा अभ्यासपूर्ण चर्चा झाली असावी. वकील समुदायाने पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनातमोठे योगदान दिले पाहिजे वसंसदेतील चर्चांमध्ये चांगला बदल घडवून आणायला हवा. संसदेत अभ्यासपूर्ण चर्चा होत नसल्यामुळे त्या कायद्यांविरोधात न्यायालयात अनेक याचिका दाखल होणे हे चांगले चित्र नाही. त्यामुळे संसदेत कायदे करताना उत्तम चर्चा होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndependence Dayस्वातंत्र्य दिनN V Ramanaएन. व्ही. रमणा