शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

संसदेत कायदे बनविण्याच्या प्रक्रियेत चर्चेचा अभाव, सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 06:03 IST

Chief Justice of India N.V. Ramana : ते म्हणाले की, संसदेमध्ये होणाऱ्या नव्या कायद्यांमध्ये संदिग्धता असते. हे कायदे करण्याचा हेतू न्यायालयाला माहीत नसतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संसदेत अतिशय अभ्यासू चर्चा होत असत.

नवी दिल्ली : संसदेमध्ये कायदे बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये अभ्यासपूर्ण चर्चेचा अभाव आहे, अशी टीका सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी केली आहे. स्वातंत्र्यदिनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केल्यानंतर सरन्यायाधीशांनी आपल्या भाषणात हे वक्तव्य केले.ते म्हणाले की, संसदेमध्ये होणाऱ्या नव्या कायद्यांमध्ये संदिग्धता असते. हे कायदे करण्याचा हेतू न्यायालयाला माहीत नसतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संसदेत अतिशय अभ्यासू चर्चा होत असत. त्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहांत विधायक हेतूने व विवेक राखून चर्चा केली जात असे.त्यांनी सांगितले की, सध्या संसदेमध्ये अभ्यासपूर्ण चर्चेअभावी कायदे बनतात. कायदे बनविताना पुरेशी चर्चा झालेली नसल्याने हे नवीन कायदे बनविण्यामागचे हेतू न्यायालयाला कळू शकत नाहीत. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात अनेक वकील संसदेत खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्या वकिलांमुळेच कदाचित संसदेत तेव्हा अभ्यासपूर्ण चर्चा झाली असावी. वकील समुदायाने पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनातमोठे योगदान दिले पाहिजे वसंसदेतील चर्चांमध्ये चांगला बदल घडवून आणायला हवा. संसदेत अभ्यासपूर्ण चर्चा होत नसल्यामुळे त्या कायद्यांविरोधात न्यायालयात अनेक याचिका दाखल होणे हे चांगले चित्र नाही. त्यामुळे संसदेत कायदे करताना उत्तम चर्चा होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndependence Dayस्वातंत्र्य दिनN V Ramanaएन. व्ही. रमणा