शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

'मतभेदांना देशविरोधी ठरवणं हा लोकशाहीवरील हल्ला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 08:41 IST

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांचं प्रतिपादन

अहमदाबाद: सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात सध्या देशातल्या अनेक भागांमध्ये आंदोलनं सुरू आहेत. शांततेच्या मार्गानं सुरू असलेल्या या आंदोलनांवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. मतभेदांना देशविरोधी आणि लोकशाहीविरोधी ठरवणं हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचं मत चंद्रचूड यांनी व्यक्त केलं. विचारांना दाबून टाकणं म्हणजे देशाचा आत्माच दाबून टाकण्यासारखं असल्याचं ते पुढे म्हणाले. गुजरात उच्च न्यायालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या पी. डी. स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. लोकशाहीत मतभेद सेफ्टी व्हॉल्वसारखे असतात. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर झाल्यास भीतीची भावना निर्माण होते. मतभेदांना देशविरोधी आणि लोकशाहीविरोधी ठरवणं हा देशाच्या आत्म्यावरील हल्ला असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. मतभेदांना संरक्षण देणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. प्रश्न विचारण्याची शक्यताच संपुष्टात आणणं, मतभेद संपवण्याचा प्रयत्न करणं यामुळे आपला आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पायाच नष्ट होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मतभेदांवर हल्ला करण्याचा अर्थ लोकशाही मानणाऱ्या समाजाच्या गाभ्यावर आघात असा होतो. त्यामुळेच कोणत्याही सरकारनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपायला हवं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होणार नाही, याची काळजी सरकार आणि सरकारच्या यंत्रणेनं घ्यायला हवी. मतभेद व्यक्त करण्यास बाधा निर्माण करण्याचे प्रयत्न सरकारनं रोखायला हवेत, असं न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of CitizensएनआरसीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय