शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

इअरफोननं केला घात, गाणी ऐकत गाडी चालवणं 13 निष्पाप मुलांच्या जिवावर बेतलं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 12:33 IST

कुशीनगर अपघातात 13 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मानवरहित क्रॉसिंगसंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गुरुवारी उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला झालेल्या भीषण अपघातात काही प्रमाणात गाडी चालकाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे.

लखनऊः कुशीनगर अपघातात 13 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मानवरहित क्रॉसिंगसंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गुरुवारी उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला झालेल्या भीषण अपघातात काही प्रमाणात गाडी चालकाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. रेल्वे क्रॉसिंग दुर्घटना घडली त्यावेळी गेटमन तैनात होता.स्कूल व्हॅन क्रॉसिंग करत असताना समोर येणा-या रेल्वेची सूचना या गेटमननं गाडीचालकाला दिली होती. गेटमन आवाज देत होता. परंतु गाडीचालकानं कानात एअरफोन घातलेले असल्यानं त्याच्यापर्यंत गेटमनचा आवाज पोहोचलाच नाही. गाडीचालकाच्या हा बेजबाबदार कृत्यामुळे आपण 55075 ट्रेनच्या जवळ जातोय याचा अंदाजच आला नाही आणि बघता बघता ट्रेननं स्कूल व्हॅनला धडक दिली. या अपघातात गाडीचालक आणि 13 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 7 विद्यार्थी गंभीररीत्या जखमी आहेत.डिव्हाइन पब्लिक स्कूलची टाटा मॅजिक गाडी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत निघाली होती. ही व्हॅन दुदही रेल्वे फाटकावर आली असतानाच ट्रॅकवरून थावे-बढनी पॅसेंजर येत होती. त्याचवेळी व्हॅनच्या चालकाने ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने पॅसेंजरची धडक व्हॅनला बसली. या धडकेने व्हॅनचा चेंदामेंदा झाला. तर व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच व्हॅन चालकाचाही या अपघातात मृत्यू झाला.

टॅग्स :Accidentअपघात