शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Kerala Elephant Death: "हत्तीणीने कोणाचं काय वाईट केलं होतं?, तिला मारणाऱ्यांची संस्कृती कोणती?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 19:51 IST

Kerala Elephant Death: अननसातून फटाके खायला देऊन केरळमधील मल्लापूरम भागातील रहिवाशांनी या हत्तीणीची हत्या केल्याचा संशय आहे. सोशल मीडियावर या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे.

केरळमधील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला आहे. अननसातून फटाके खायला देऊन केरळमधील मल्लापूरम भागातील रहिवाशांनी या हत्तीणीची हत्या केल्याचा संशय आहे. सोशल मीडियावर या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी, सेलिब्रिटींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. डॉ. कुमार विश्वास यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करत आपला संताप व्यक्त केला आहे. 

कुमार विश्वास यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. 'उमा नावाच्या गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घातलं. तिची हत्या केली. त्या हत्तीणीने कोणाचं काय वाईट केलं होतं?, भारतीयांमध्ये हे कोणतं विष पेरलं गेलं आहे?, हे लोक काय शिकले आहेत?, तिला मारणाऱ्यांची संस्कृती कोणती? अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. 

"I can’t Breathe.. I can’t Breathe.... मी हे दुःख सहन करू शकत नाही. मी याआधीही म्हटलं आहे की जोपर्यंत धर्म-जात-देश-प्रदेश-दल-आस्था यांच्या नावे माणसं घृणास्पद कृत्यं करत आहेत. वैमनस्य आणि हिंसेची बीजं रोवत आहेत. विष असलेली नवी पिढी जन्म घेईल. कोण आहेत ते तरुण ज्यांनी महादेवाच्या पत्नीचं नाव असलेल्या उमा नावाच्या गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घातलं. तिची हत्या केली. त्या हत्तीणीने कोणाचं काय वाईट केलं होतं? इतक्या घृणास्पद पद्धतीने एका हत्तीणीला ठार करण्यात आलं. ती हत्तीण वेदनेने विव्हळत होती. मात्र त्या अवस्थेतही तिने कोणालाही त्रास दिला नाही. तिचा जबडा तुटून पडला. तिच्या गर्भात असणारा जीव गेला. ती हत्तीण पाण्यात बसून  रडत मृत्यूला सामोरी गेली. भारतीयांमध्ये हे कोणतं विष पेरलं गेलं आहे? हे लोक काय शिकले आहेत?, तिला मारणाऱ्यांची संस्कृती कोणती?" असं कुमार विश्वास यांनी म्हटलं आहे. 

केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूची गंभीर दखल केंद्र सरकारनेही घेतली असून, दोषींना पकडून कठोर कारवाई करण्याची ग्वाही केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. आरोपींची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देण्याची घोषणा काही स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. घटना इतकी वेदनादायी आहे की, हा निर्दयीपणा करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. टाटा उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी, क्रीडापटूंनी हत्तीणीच्या हत्येबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लवकर रेस्टॉरंट सुरू होणार, 'या' गोष्टी बदलणार; जाणून घ्या नेमकं कसं असणार?

CoronaVirus News : मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी त्याने लढवली अनोखी शक्कल; केलं असं काही...

CoronaVirus News : सर्वसामान्यांसाठी खूशखबर! 'या' जीवनावश्यक वस्तू झाल्या स्वस्त

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणार

CoronaVirus News : ...म्हणून चेन खेचून मजुरांनी काढला ट्रेनमधून पळ; रेल्वे स्थानकावर झाला गोंधळ

CoronaVirus News : कोरोनामुळे बाप-लेकाची ताटातूट! नवजात बाळाला पाहण्यासाठी 'तो' व्याकूळ झाला पण...

टॅग्स :KeralaकेरळDeathमृत्यू