शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
7
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
8
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
9
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
10
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
11
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
12
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
14
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
16
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
17
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
18
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
19
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
20
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

'कुमार विश्वास यांनी सरकार पाडण्याचा कट रचल्यानं राज्यसभेवर पाठवलं नाही', आपचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2018 8:02 AM

राज्यसभेच्या तीन जागांसाठी उमेदवारांची नावं निश्चित झाल्यानंतरही आम आदमी पार्टीतील अंतर्गत वाद थांबण्याचं नाव घेत नाहीय.

नवी दिल्ली - राज्यसभेच्या तीन जागांसाठी उमेदवारांची नावं निश्चित झाल्यानंतरही आम आदमी पार्टीतील अंतर्गत वाद थांबण्याचं नाव घेत नाहीय. आम आदमी पार्टीनं पहिल्यांदा जाहिररित्या कुमार विश्वास यांच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले नाही, असा गंभीर आरोप आदमी पार्टीनं केला आहे. 

राज्यसभेमध्ये बाहेरील दोन उमेदवारांना का पाठवण्यात आले?, यावर आम आदमी पार्टीच्या वरिष्ठ नेते आणि दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाळ राय यांनी पार्टीतील कार्यकर्त्यांना फेसबुक लाइव्हदरम्यान स्पष्टीकरण दिले. 

नेमकं काय म्हणाले गोपाळ राय?जो आम आदमी पार्टीचं सरकार पाडण्यासाठी आमदारांना फोडण्याच्या षड्यंत्रात सहभागी असेल, जो जाहिररित्या प्रत्येक व्यासपीठाहून पार्टीविरोधात विधानं करत असेल, त्या व्यक्तीला राज्यसभेवर कसं पाठवलं जाऊ शकतं?  ती व्यक्ती पार्टीचा आवाज होईल कि पार्टीला संपवण्यासाठी काम करेल? अशा व्यक्तीला राज्यसभेवर पाठवायला हवं? मला असं वाटतं की अजिबात पाठवलं जाऊ नये. यासाठी पार्टीनं हा निर्णय घेतला आहे.

यापूर्वीही कुमार विश्वास यांच्यावर सरकार पाडण्याचं षड्यंत्र रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.  दिल्ली महापालिका निवडणुकीदरम्यान आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी विश्वास यांना भाजपाचे एजंट म्हणत केजरीवाल सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. यानंतर नाराज झालेल्या कुमार विश्वास यांची मनधरणी करण्यात आली होती. यानंतर केजरीवाल यांनी कपिल मिश्रा यांना मंत्रिपदावरुन हटवलं होतं.  

याच पार्श्वभूमीवर गोपाळ राय यांनी आरोप केले आहेत की, ज्या पद्धतीनं दिल्लीतील आप सरकारल पाडण्याचं संपूर्ण षड्यंत्री रचण्यात आले, त्याचं केंद्र कुमार विश्वास होते. या षड्यंत्रासंदर्भात सर्वाधिक बैठका कुमार विश्वास यांच्या निवासस्थानीच होत होत्या, असा गौप्यस्फोटही राय यांनी केला आहे. 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल