शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा विजय मोठाच, पण कुलभूषण जाधव यांची लगेच सुटका नाही, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 19:57 IST

आयसीजेच्या निकालावर कुठलाही आक्षेप घेता येत नाही.

ठळक मुद्देकुरापतखोर पाकिस्तानला आज आंतरराष्ट्रीय न्यायालयानं 'जोर का झटका' दिला आहे.आता कुलभूषण जाधव यांना वकील देणं पाकिस्तानसाठी बंधनकारक आहे.परंतु, या निकालानंतरही कुलभूषण जाधव यांची लगेच सुटका होणं कठीण आहे.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना जाळ्यात अडकवून भारताची कोंडी करायला निघालेल्या पाकिस्तानचं आज पुन्हा जागतिक स्तरावर वस्त्रहरण झालं आहे. खोटं बोलण्यात, कांगावा करण्यात पटाईत असलेल्या कुरापतखोर पाकिस्तानला आज आंतरराष्ट्रीय न्यायालयानं 'जोर का झटका' दिला आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवरील स्थगिती कायम ठेवत, त्यांना सुनावल्या गेलेल्या सर्व शिक्षांचा पुनर्विचार करावा, त्यांना कायदेशीर मदत द्यावी, त्यांचे राजनैतिक अधिकार कायम राहतील याची काळजी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत. भारताच्या मुत्सद्देगिरीला मिळालेलं मोठं यश म्हणूनच या निकालाकडे पाहिलं जातंय. परंतु, या निकालानंतरही कुलभूषण जाधव यांची लगेच सुटका होणं कठीण असल्याचं मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडलं आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल पाकिस्तानला झटका देणारा आहे. आयसीजेच्या निकालावर कुठलाही आक्षेप घेता येत नाही. त्यामुळे त्यांनी दिलेल्या निर्देशांचं पाकिस्तानला पालन करावंच लागेल. परंतु, कुलभूषण जाधव यांची सुटका करण्याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालय आदेश देऊ शकत नाही. अर्थात, न्यायालयीन प्रक्रियेचं पालन करून त्यांना पुन्हा खटला चालवावा लागेल. त्यात कुलभूषण जाधव यांना वकील द्यावा लागेल. ही बाब निश्चितच महत्त्वाची आहे, असं उज्ज्वल निकम यांनी नमूद केलं. या कार्यवाहीत पाकिस्तानकडून टाळाटाळ झाल्यास संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती त्यांना कायदेशीर प्रक्रियेसाठी भाग पाडू शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.   

 

पाकिस्ताननं व्हिएन्ना करारातील अटींचं सपशेल उल्लंघन केल्याचं निरीक्षण आंतरराष्ट्रीय न्यायालयानं नोंदवलं आहे. कुलभूषण जाधव यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका झाली आहे हे नक्की. परंतु, तेवढ्यावरच भारतानं समाधान मानून उपयोगाचे नाही, याकडेही उज्ज्वल निकम यांनी लक्ष वेधलं. पाकिस्तान कुरापती करण्यात चलाख आहे. त्यामुळे तो कुलभूषण यांना पूर्ण बचावाची संधी देईल का, याबद्दल शंका आहे. याआधीही, कुलभूषण जाधव यांचं वकीलपत्र घेण्यास कुठलाही वकील तयार झाला नव्हता. अशा परिस्थितीत, त्यांना पूर्ण न्याय मिळेल, याची खात्री करूनच पावलं टाकणं गरजेचं आहे. २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी हाफिज सईदविरोधात पुरावे देऊनही पाकिस्तान त्याच्यावर कारवाई करत नाही. यातून त्यांचा ढोंगीपणा सहज लक्षात येतो. त्यामुळे हे यश मोठं असलं तरी त्याने हुरळून जाऊ नये, असं ते म्हणाले. 

 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तानIndiaभारत