शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

भारताचा विजय मोठाच, पण कुलभूषण जाधव यांची लगेच सुटका नाही, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 19:57 IST

आयसीजेच्या निकालावर कुठलाही आक्षेप घेता येत नाही.

ठळक मुद्देकुरापतखोर पाकिस्तानला आज आंतरराष्ट्रीय न्यायालयानं 'जोर का झटका' दिला आहे.आता कुलभूषण जाधव यांना वकील देणं पाकिस्तानसाठी बंधनकारक आहे.परंतु, या निकालानंतरही कुलभूषण जाधव यांची लगेच सुटका होणं कठीण आहे.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना जाळ्यात अडकवून भारताची कोंडी करायला निघालेल्या पाकिस्तानचं आज पुन्हा जागतिक स्तरावर वस्त्रहरण झालं आहे. खोटं बोलण्यात, कांगावा करण्यात पटाईत असलेल्या कुरापतखोर पाकिस्तानला आज आंतरराष्ट्रीय न्यायालयानं 'जोर का झटका' दिला आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवरील स्थगिती कायम ठेवत, त्यांना सुनावल्या गेलेल्या सर्व शिक्षांचा पुनर्विचार करावा, त्यांना कायदेशीर मदत द्यावी, त्यांचे राजनैतिक अधिकार कायम राहतील याची काळजी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत. भारताच्या मुत्सद्देगिरीला मिळालेलं मोठं यश म्हणूनच या निकालाकडे पाहिलं जातंय. परंतु, या निकालानंतरही कुलभूषण जाधव यांची लगेच सुटका होणं कठीण असल्याचं मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडलं आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल पाकिस्तानला झटका देणारा आहे. आयसीजेच्या निकालावर कुठलाही आक्षेप घेता येत नाही. त्यामुळे त्यांनी दिलेल्या निर्देशांचं पाकिस्तानला पालन करावंच लागेल. परंतु, कुलभूषण जाधव यांची सुटका करण्याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालय आदेश देऊ शकत नाही. अर्थात, न्यायालयीन प्रक्रियेचं पालन करून त्यांना पुन्हा खटला चालवावा लागेल. त्यात कुलभूषण जाधव यांना वकील द्यावा लागेल. ही बाब निश्चितच महत्त्वाची आहे, असं उज्ज्वल निकम यांनी नमूद केलं. या कार्यवाहीत पाकिस्तानकडून टाळाटाळ झाल्यास संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती त्यांना कायदेशीर प्रक्रियेसाठी भाग पाडू शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.   

 

पाकिस्ताननं व्हिएन्ना करारातील अटींचं सपशेल उल्लंघन केल्याचं निरीक्षण आंतरराष्ट्रीय न्यायालयानं नोंदवलं आहे. कुलभूषण जाधव यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका झाली आहे हे नक्की. परंतु, तेवढ्यावरच भारतानं समाधान मानून उपयोगाचे नाही, याकडेही उज्ज्वल निकम यांनी लक्ष वेधलं. पाकिस्तान कुरापती करण्यात चलाख आहे. त्यामुळे तो कुलभूषण यांना पूर्ण बचावाची संधी देईल का, याबद्दल शंका आहे. याआधीही, कुलभूषण जाधव यांचं वकीलपत्र घेण्यास कुठलाही वकील तयार झाला नव्हता. अशा परिस्थितीत, त्यांना पूर्ण न्याय मिळेल, याची खात्री करूनच पावलं टाकणं गरजेचं आहे. २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी हाफिज सईदविरोधात पुरावे देऊनही पाकिस्तान त्याच्यावर कारवाई करत नाही. यातून त्यांचा ढोंगीपणा सहज लक्षात येतो. त्यामुळे हे यश मोठं असलं तरी त्याने हुरळून जाऊ नये, असं ते म्हणाले. 

 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तानIndiaभारत