शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

भारताचा विजय मोठाच, पण कुलभूषण जाधव यांची लगेच सुटका नाही, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 19:57 IST

आयसीजेच्या निकालावर कुठलाही आक्षेप घेता येत नाही.

ठळक मुद्देकुरापतखोर पाकिस्तानला आज आंतरराष्ट्रीय न्यायालयानं 'जोर का झटका' दिला आहे.आता कुलभूषण जाधव यांना वकील देणं पाकिस्तानसाठी बंधनकारक आहे.परंतु, या निकालानंतरही कुलभूषण जाधव यांची लगेच सुटका होणं कठीण आहे.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना जाळ्यात अडकवून भारताची कोंडी करायला निघालेल्या पाकिस्तानचं आज पुन्हा जागतिक स्तरावर वस्त्रहरण झालं आहे. खोटं बोलण्यात, कांगावा करण्यात पटाईत असलेल्या कुरापतखोर पाकिस्तानला आज आंतरराष्ट्रीय न्यायालयानं 'जोर का झटका' दिला आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवरील स्थगिती कायम ठेवत, त्यांना सुनावल्या गेलेल्या सर्व शिक्षांचा पुनर्विचार करावा, त्यांना कायदेशीर मदत द्यावी, त्यांचे राजनैतिक अधिकार कायम राहतील याची काळजी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत. भारताच्या मुत्सद्देगिरीला मिळालेलं मोठं यश म्हणूनच या निकालाकडे पाहिलं जातंय. परंतु, या निकालानंतरही कुलभूषण जाधव यांची लगेच सुटका होणं कठीण असल्याचं मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडलं आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल पाकिस्तानला झटका देणारा आहे. आयसीजेच्या निकालावर कुठलाही आक्षेप घेता येत नाही. त्यामुळे त्यांनी दिलेल्या निर्देशांचं पाकिस्तानला पालन करावंच लागेल. परंतु, कुलभूषण जाधव यांची सुटका करण्याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालय आदेश देऊ शकत नाही. अर्थात, न्यायालयीन प्रक्रियेचं पालन करून त्यांना पुन्हा खटला चालवावा लागेल. त्यात कुलभूषण जाधव यांना वकील द्यावा लागेल. ही बाब निश्चितच महत्त्वाची आहे, असं उज्ज्वल निकम यांनी नमूद केलं. या कार्यवाहीत पाकिस्तानकडून टाळाटाळ झाल्यास संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती त्यांना कायदेशीर प्रक्रियेसाठी भाग पाडू शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.   

 

पाकिस्ताननं व्हिएन्ना करारातील अटींचं सपशेल उल्लंघन केल्याचं निरीक्षण आंतरराष्ट्रीय न्यायालयानं नोंदवलं आहे. कुलभूषण जाधव यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका झाली आहे हे नक्की. परंतु, तेवढ्यावरच भारतानं समाधान मानून उपयोगाचे नाही, याकडेही उज्ज्वल निकम यांनी लक्ष वेधलं. पाकिस्तान कुरापती करण्यात चलाख आहे. त्यामुळे तो कुलभूषण यांना पूर्ण बचावाची संधी देईल का, याबद्दल शंका आहे. याआधीही, कुलभूषण जाधव यांचं वकीलपत्र घेण्यास कुठलाही वकील तयार झाला नव्हता. अशा परिस्थितीत, त्यांना पूर्ण न्याय मिळेल, याची खात्री करूनच पावलं टाकणं गरजेचं आहे. २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी हाफिज सईदविरोधात पुरावे देऊनही पाकिस्तान त्याच्यावर कारवाई करत नाही. यातून त्यांचा ढोंगीपणा सहज लक्षात येतो. त्यामुळे हे यश मोठं असलं तरी त्याने हुरळून जाऊ नये, असं ते म्हणाले. 

 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तानIndiaभारत