शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

Kulbhushan Jadhav: पाकिस्ताननं वकिलावर केलेला खर्च वाचून धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 11:37 IST

कुलभूषण जाधव यांना हेर सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानकडून कोट्यवधी रुपये खर्च

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं भारताच्या बाजूनं निकाल दिला आहे. जाधव यांच्या शिक्षेला देण्यात आलेली स्थगिती न्यायालयानं कायम ठेवली आहे. याशिवाय जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे आदेश पाकिस्तानला न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे पाकिस्ताननं या प्रकरणात कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.पाकिस्तानच्या वतीनं अधिवक्ता खावर कुरेशींनी कुलभूषण प्रकरणात युक्तिवाद केला. ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलेल्या कुरेशींनी पाकिस्तानची बाजू मांडली. आंतरराष्ट्रीय न्यायालयात युक्तिवाद करणारे ते सर्वात कमी वयाचे अधिवक्ते ठरले. कुलभूषण भारताचे हेर असल्याचे सिद्ध करण्यासाठी कुरेशी यांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. त्यासाठी पाकिस्ताननं २० कोटी रुपये मोजले. मात्र तरीही कुरेशी अपयशी ठरले. 

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तान खर्च करत असलेल्या रकमेची माहिती गेल्या वर्षी उपलब्ध झाली होती. पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात याचा उल्लेख होता. ब्रिटनमध्ये राहणारे अधिवक्ते खावर कुरेशींना या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी २० कोटी दिले जात असल्याचं अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलं होतं. मात्र इतकी रक्कम खर्च करुनही आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानचा मुखभंग झाला. 
या प्रकरणात भारताच्या वतीनं हरिश साळवेंनी युक्तिवाद केला. न्यायालयात हरिश साळवेंनी केलेला युक्तिवाद अतिशय महत्त्वाचा ठरला. त्यामुळेच १६ न्यायाधीशांच्या खंडपीठानं १५-१ असा निकाल दिला आणि भारताला मोठा दिलासा मिळाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर हरिश साळवे पुन्हा एकदा चर्चेत आले. देशातील प्रख्यात वकिलांपैकी एक असलेल्या साळवेंची एक दिवसाची फीज २५-३० लाख रुपये असल्याचं बोललं जातं. मात्र त्यांनी कुलभूषण प्रकरणात भारताची बाजू मांडण्यासाठी केवळ १ रुपया घेतला. सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री असताना त्यांना ट्विटरवर एकानं याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी स्वराज यांनी साळवे घेत असलेल्या फीजची माहिती दिली होती. हरिश साळवेंनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये युक्तिवाद केलेला आहे. २०१५ मध्ये हिट अँड रन प्रकरणात सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्याला थेट आर्थर रोड तुरुंगात नेण्याची तयारी केली जात होती. मात्र साळवे यांनी न्यायालयात सलमानची बाजू मांडली आणि नाट्यमय घडामोडी घडल्या. यानंतर सलमानला जामीन मिळाला. यासोबत साळवेंनी व्होडाफोन कर प्रकरण, रिलायन्स गॅस वाद अशा महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये युक्तिवाद केला आहे.

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवIndiaभारतPakistanपाकिस्तानSushma Swarajसुषमा स्वराज